शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले, ठाणेकर ‘काेंडी’त अडकले; काम लांबल्याने PWD चे अधिकारी मोबाइल बंद करून बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 09:05 IST

१६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १७ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत माजीवडा उड्डाणपुलावरील हा मार्ग बंद ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : माजीवडा उड्डाणपुलावरील एक्सपान्शन  जॉइंट्समधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम तब्बल आठ तास लांबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे बुधवारी ठाणेकरांना सहा ते सात तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बुधवारी पहाटे ५ वाजता पूर्ण हाेणारे काम दुपारी १ वाजता पूर्ण न झाल्यामुळे शेकडो वाहने कोंडीत अडकली. 

नियम धाब्यावर बसवून वाहने उलटसुलट चालवणारे वाहनचालक आणि काम लांबल्यामुळे मोबाइल बंद करून बसलेले पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांनी लोकांच्या मनस्तापात व संतापात भर घातली. घाेडबंदर ते ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच कापूरबावडी ते पातलीपाडा आणि मुंबई-नाशिक महामार्गावर ढोकाळी-हायलँड रोडवर वाहनांच्या माेठ्या रांगा लागल्या हाेत्या.

घोडबंदर ठाणे मार्गावरील माजीवडा ओव्हरब्रिजवरील एक्सपान्शन जॉइंट्समधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम १६ एप्रिल रात्रीपासून ते १७ एप्रिल रोजी पहाटे पाचपर्यंत करण्यात येणार होते. त्यासाठी घोडबंदरकडून माजीवडा उड्डाणपुलावरून मुंबई जेएनपीटीकडे तसेच नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रॉडवे पेट्रोल पंपासमोरील ब्रिज चढणीजवळ प्रवेश बंद केला होता. त्याऐवजी या वाहनांना पेट्रोल पंपासमोरील स्लीप रोडने पुढे सरळ जाऊन  कापूरबावडी सर्कलमार्गे जाण्यासाठीची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक शाखेने १३ एप्रिल रोजी काढली होती. 

१६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १७ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत माजीवडा उड्डाणपुलावरील हा मार्ग बंद ठेवला होता. तांत्रिक अडचणींमुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम सकाळी ११:३० वाजता अंशत: पूर्ण केले. सिमेंट सुकण्यासाठी आणखी दीड तास म्हणजे दुपारी १ वाजेपर्यंत हा पूल बंद ठेवावा लागला. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. सकाळी ७ ते दुपारी १ या सहा तासांत या मार्गावर अवजड वाहनांसह अन्य वाहनांची काेंडी झाली. चालकांनी चुकीच्या पद्धतीने वाहने दामटल्याने कोंडीत भर पडली. 

कापूरबावडी चौकात पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल उभारला आहे. उड्डाणपुलावरील रस्त्याच्या दोन भागांमध्ये बसविलेली लोखंडी पट्टी बदलण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. बुधवारी रामनवमीनिमित्त सुटी असल्याने वाहनांची वर्दळ कमी असावी, असा अंदाज बांधून वाहतूक पोलिसांनी बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कामाची परवानगी दिली होती. परंतु, कामाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे सकाळ झाली तरी काम सुरूच होते. 

काेंडी फाेडण्यासाठी भर उन्हात वाहतूक पाेलिसांची कसरत सुरू हाेती. कामाला विलंब झाल्याने पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे फाेन या काळात नाॅट रिचेबल असल्याने काम कधी पूर्ण होणार याची कुठलीच माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली नाही. 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी