शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

नाल्यावरील पूल रखडला

By admin | Updated: January 30, 2017 01:56 IST

अंबरनाथ पालिकेच्या बहुचर्चित फातिमा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या बहुचर्चित फातिमा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. या पुलाचे काम सुरू झाले असून वीजवाहिन्यांचे स्थलांतर न झाल्याने या कामात अडचणी येत आहे. या वाहिन्यांच्या स्थलांतरणाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी पालिकेने करूनही ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे. अंबरनाथ पोलीस ठाणे ते फातिमा शाळेपर्यंतच्या ३ कोटी ५० लाखांच्या काँक्रिट रस्त्याचे आणि त्याअंतर्गत असलेल्या मुख्य नाल्यावरील पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, नाल्यावरील पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. एक महिना होऊनही हे काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराने या कामादरम्यान पुलाखालून जाणाऱ्या जल आणि वीजवाहिन्या स्थलांतरित करून त्या पुलाच्या कोपऱ्यावरून टाकण्यासाठी पाठपुरावा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपली जलवाहिनी स्थलांतरित केली. मात्र, महावितरण विभागाची भुयारी वीजवाहिनी अद्याप स्थलांतरित झालेली नाही.वीजवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी येणारा खर्चदेखील भरलेला आहे. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारामार्फत सतत पाठपुरावा करूनही ते काम करण्यास महावितरण चालढकल करत आहे. खर्च दिल्यावर तरी किमान काम लवकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते काम होत नसल्याने पालिका प्रशासन महावितरणपुढे हतबल झाले आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्याची तयारी पालिका प्रशासन करत आहे. मुदतीत वीजवाहिन्या न हलवल्यास त्या निकामी करून पालिका प्रशासन पुलाचे काम करणार आहे. कोहोजगावाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने तो रस्ता जास्त काळ बंद ठेवणे वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे नाही. कंत्राटदाराने हे काम लवकरात लवकर करून देण्याची हमी दिली असली, तरी आता वीजवाहिन्यांच्या स्थलांतरणाअभावी हे काम संथगतीने सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत स्थलांतरणाचे काम न झाल्यास हे काम बंद करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी महावितरणला अंतिम मुदतीचे पत्र देणार आहे. २७ डिसेंबरला या पुलाच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आला. या वाहिन्या सोडून इतर कामांना सुरुवात करण्यात आली. वाहिन्या हलवण्याचे काम झाल्यावर तत्काळ काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे. तसेच या वाहिन्या हलवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता पालिका घेत आहे. सहकार्याची भूमिका घेऊनही महावितरण विभाग हे काम करत नाही. ज्या पद्धतीने या वाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न आहे, तसाच प्रश्न खांब स्थलांतर करण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण केलेले असले तरी खांब अद्याप स्थलांतरित झालेले नाही. याच रस्त्यावर नाना पाटील प्राइड कॉम्प्लेक्ससमोरील ट्रान्सफॉर्मर अद्याप स्थलांतरित न झाल्याने या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढलेली आहे. (प्रतिनिधी)