शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी

By सदानंद नाईक | Updated: August 22, 2022 18:46 IST

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे.

उल्हासनगर - रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील वालधुनी नदीवरील एकमेव पादचारी पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ वाढली असून पूल धोकादायक झाला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती केली नाहीतर, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता चाकरमानी, शाळा, महाविद्यालयाच्या मुले व्यक्त करीत आहेत. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे सी.एच.एम. कॉलेजकडुन जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पादचारी पुल चाकरमानी, नागरिक, शाळा व महाविद्यालयातील मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आला होता. दरम्यान पुलाच्या मधोमध असलेले लोखंडी खांब काढून टाकण्यात आल्याने, मोटरसायकली, ऑटो रिक्षा यांची ये-जा पादचारी पुलावरून सुरू झाली. त्यामुळे पुलावरील दगडी फरसी उखळली असून जादाच्या भाराने पूल कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. दरम्यान पश्चिमेकडील दुसरा व जुना संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल पाडून, त्याठिकाणी नवीन पुल बनविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा एकमेव पादचारी पुल सुरू आहे.

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे. स्टेशनकडे जाणारा मात्र वालधुनी नदीवरील हा एकमेव पादचारी पूल जुना असून जादाच्या वाहतुकीने धोकादायक झाल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या पुलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने, पुलाचे काम जलद सुरू करण्याची मागणी होत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिकेने सी.एच.एम कॉलेज कडुन पादचारी पुलावरुन जाणाऱ्या मोठ्या वाहनाना बंदी घालावी. अशी मागणीने जोर पकडला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर