शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी

By सदानंद नाईक | Updated: August 22, 2022 18:46 IST

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे.

उल्हासनगर - रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील वालधुनी नदीवरील एकमेव पादचारी पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ वाढली असून पूल धोकादायक झाला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती केली नाहीतर, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता चाकरमानी, शाळा, महाविद्यालयाच्या मुले व्यक्त करीत आहेत. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे सी.एच.एम. कॉलेजकडुन जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पादचारी पुल चाकरमानी, नागरिक, शाळा व महाविद्यालयातील मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आला होता. दरम्यान पुलाच्या मधोमध असलेले लोखंडी खांब काढून टाकण्यात आल्याने, मोटरसायकली, ऑटो रिक्षा यांची ये-जा पादचारी पुलावरून सुरू झाली. त्यामुळे पुलावरील दगडी फरसी उखळली असून जादाच्या भाराने पूल कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. दरम्यान पश्चिमेकडील दुसरा व जुना संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल पाडून, त्याठिकाणी नवीन पुल बनविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा एकमेव पादचारी पुल सुरू आहे.

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे. स्टेशनकडे जाणारा मात्र वालधुनी नदीवरील हा एकमेव पादचारी पूल जुना असून जादाच्या वाहतुकीने धोकादायक झाल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या पुलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने, पुलाचे काम जलद सुरू करण्याची मागणी होत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिकेने सी.एच.एम कॉलेज कडुन पादचारी पुलावरुन जाणाऱ्या मोठ्या वाहनाना बंदी घालावी. अशी मागणीने जोर पकडला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर