शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी

By सदानंद नाईक | Updated: August 22, 2022 18:46 IST

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे.

उल्हासनगर - रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील वालधुनी नदीवरील एकमेव पादचारी पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ वाढली असून पूल धोकादायक झाला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती केली नाहीतर, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता चाकरमानी, शाळा, महाविद्यालयाच्या मुले व्यक्त करीत आहेत. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे सी.एच.एम. कॉलेजकडुन जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पादचारी पुल चाकरमानी, नागरिक, शाळा व महाविद्यालयातील मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आला होता. दरम्यान पुलाच्या मधोमध असलेले लोखंडी खांब काढून टाकण्यात आल्याने, मोटरसायकली, ऑटो रिक्षा यांची ये-जा पादचारी पुलावरून सुरू झाली. त्यामुळे पुलावरील दगडी फरसी उखळली असून जादाच्या भाराने पूल कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. दरम्यान पश्चिमेकडील दुसरा व जुना संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल पाडून, त्याठिकाणी नवीन पुल बनविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा एकमेव पादचारी पुल सुरू आहे.

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे. स्टेशनकडे जाणारा मात्र वालधुनी नदीवरील हा एकमेव पादचारी पूल जुना असून जादाच्या वाहतुकीने धोकादायक झाल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या पुलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने, पुलाचे काम जलद सुरू करण्याची मागणी होत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिकेने सी.एच.एम कॉलेज कडुन पादचारी पुलावरुन जाणाऱ्या मोठ्या वाहनाना बंदी घालावी. अशी मागणीने जोर पकडला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर