शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उड्डाणपुलावर हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी पूल तीन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 20:45 IST

उड्डाणपुलाच्या उतारावर अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी मंगळवारी काही तासांसाठी वाहतूक अचानक बंद केली.

डोंबिवली: वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कमकुवत उड्डाणपुलाच्या उतारावर अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी मंगळवारी काही तासांसाठी वाहतूक अचानक बंद केली. मात्र वाहतूक विभागाच्या मनमानी कारभाराचा खरपूस समाचार घेत डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला. रात्रीच्या वेळेत कमी वाहतूक असताना ही कामे होऊ शकत नाहीत का? असा सवाल करत डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला.वाहतूक पोलिसांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले. वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे संध्याकाळी ४ वाजल्यापासून कामाला सुरुवात झाली. वेल्डिंग मशिन, लोखंडी खांब आणि कामगारांच्या सहाय्याने काम करण्यात येत होते. वाहनचालकांनी त्या ठिकाणी येऊ नये यासाठी पुलाच्या दोन्ही दिशेला वाहतूक पोलिसांचा चमू ठाण मांडून होता. पण अवेळी घेतलेल्या या कामाच्या निर्णयामुळे शहरातील टंडन रस्ता, केळकर रस्ता, चिपळूणकर पथ, पश्चिमेला द्वारका चौक, कोपर दिशेकडील बाजू आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. हा पूल २८ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय देखील झालेला नसताना वाहतूक विभागाने केवळ हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी शहरातील वाहनचालकांना वेठीस का धरले, असा सवाल करण्यात आला. काम वेळेत न झाल्याने तीन तासांहून अधिक वेळ वाहतूक बंद होती, याबाबत वाहनचालकांना माहिती नसल्याने स्कूल बस, अन्य वाहनांची गैरसोय झाली होती.यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सतेज जाधव म्हणाले की, रात्रीच्या वेळेत पुरेसा कर्मचारी नसतो. त्यातच वेल्डिंग काम करणारी यंत्रणा रात्री येण्यास तयार नसते. अनेक अडथळे होते. त्यातच अवजड वाहने पुलावर चढल्यानंतर त्यांना पुन्हा माघारी फिरवणे कठीण होते, त्यासाठी बॅरिकेड्स लावणे गरजेचे होते. सर्व यंत्रणांच्या सहकार्याने तो निर्णय घेण्यात आला आणि काम करण्यात आले. काम झाल्यावर वाहतूक सुरू होईल, दुचाकीस्वार, चारचाकी, रिक्षा अशी वाहने लगेचच सोडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. परंतु हाईट बॅरिकेड्स टाकणे अत्यावश्यकच होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली