शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये ३२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:25 IST

महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के असून दर ३० महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

मीरा रोड : महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के असून दर ३० महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा आजार जरी गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास आणि योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्णपणे बरा होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०२२ पर्यंत दरवर्षी शहरी भागातील दीड लाख महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडणार असल्याचा अंदाज आहे.या आकडेवारीत ग्रामीण आणि दुर्गम भागांतील महिलांचा समावेश नाही. नियमितपणे शारीरिक तपासणी केल्यास कॅन्सरचे प्रमाण आणि परिणामी मृत्यूचे प्रमाणदेखील कमी होईल, अशी माहिती स्तनकर्करोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती अग्रवाल यांनी जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्र मप्रसंगी दिली.सोशल मीडियावर मातृ दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला असला, तरी आपल्या आईला अथवा नात्यातल्या महिलेला भविष्यात कर्करोग होऊ नये, यासाठी आपण जागरूक नाही. आरोग्याविषयी असलेली अनास्थाच याला कारणीभूत आहे. आपण जेव्हा आजारी पडू तेव्हा बघू या, या अविचारी मानसिकतेमुळे अनेक महिला कर्करोगाला बळी पडत आहेत. त्या अनुषंगाने महिलांमध्ये याबाबत जागृती आणण्यासाठी ‘मॉम्स आॅफ इंडिया’ या फेसबुकवरील ग्रुपच्या माध्यमातून ३०० महिलांसाठी एक मार्गदर्शन शिबिर रविवारी मीरा रोड येथे आयोजित केले होते.यावेळी सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारसुद्धा उपस्थित होते. यावेळी आई आणि मुलींचा एकत्रित फॅशन शो आयोजित केला होता.>नवजात बालकाच्या काळजीचे प्रशिक्षणडॉ. शेख यांनी नवजात बालकांची कशी काळजी घ्यावी, याबाबत उपस्थित मातांना वैद्यकीय मार्गदर्शन केले. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधिवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र ती जन्म देणाºया मातेचीच जबाबदारी आहे, असेच मानले जाते. मातेनेच त्या बाळासाठी कष्ट उपसायचे आणि वडिलांनी फक्त शाळेत जाताना मुलाला आपले नाव द्यायचे, असा समाज आणि समजही आहे, असे म्हणता येईल, अशी खंत डॉ. शेख यांनी व्यक्त केली.जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे ज्ञान येते तसेच अंधश्रद्धा आणि चुकीच्या पद्धतीदेखील येत असतात. या पद्धती चुकीच्या आहेत, याची माहिती नव्या पिढीला असायला हवी. विशेषत: ग्रामीण भागामध्ये अशा गैरसमजुती मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे बाळाच्या आणि मातेच्याही जीवाला धोका होऊ शकतो, याची जाणीव आपणास असली पाहिजे, असे मत रवी हिरवाणी यांनी उपस्थितांसमोर मांडले.