शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांचे स्टॉल हटविणारे हात तोडू!

By admin | Updated: May 4, 2016 00:49 IST

गावदेवी मैदानातील दुष्काळग्रस्तांना गेल्या चार दिवसांपासून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टॉल हटविण्याच्या धमक्या दिल्याने, मंडप काढण्याचा दम

ठाणे : गावदेवी मैदानातील दुष्काळग्रस्तांना गेल्या चार दिवसांपासून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टॉल हटविण्याच्या धमक्या दिल्याने, मंडप काढण्याचा दम दिल्याने, वीज जोडणी घेतल्यास कारवाई करू असा इशारा दिल्याने अखेर शिवसेना, मनसेने तातडीने धाव घेत दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला. स्टॉल हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात तोडू, असा सणसणीत इशाराच मनसेच्या नेत्यांनी दिला; तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याने महापौर संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेनेचे नेते यांनी तातडीने धाव घेत दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले. दुष्काळग्रस्तांना येथे राहण्यासाठी हवी ती मदत देऊ, परवानग्या देऊ, असे आश्वासन खुद्द महापौरांनीच दिले. ‘दुष्काळग्रस्तांच्या पोटावर नेत्यांचा पाय,’ अशा शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये मंगळवारी बातमी प्रसिद्ध होताच ठाण्यातील जागरूक नागरिकांनी सकाळी सकाळी दुष्काळग्रस्तांना ‘लोकमत’चे अंक नेऊन दिले आणि सुजाण ठाणेकर तुमच्या पाठीशी उभे राहतील, असा आत्मविश्वास दिला. त्यानंतरही लोकमत काय आहे, याचा अंदाज न आलेल्या भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने सकाळी थेट त्यांच्या स्टॉलवर येऊन ते स्टॉल हटविण्याच्या धमक्या तर दिल्याच, परंतु पालिकेच्या अतिक्रमण विभागाला सांगून हा स्टॉल हटविला जाईल, असा दम देखील दिला. स्टॉलला असलेली वीज जोडणी मंडपवाल्याला सांगून जबरदस्तीने बंद करण्यात आली. पुन्ही वीज दिल्यास तुझ्यावर केस करु, अशी धमकीही मंडपवाल्याला दिली. यामुळे आधीच परिस्थितीने गांजलेले, घाबरलेले हे दुष्काळग्रस्त हादरुन गेले. परंतु शिवसेना, मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.भाजप कार्यकर्त्यांकडून दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या त्रासाचे वर्णन आणि त्यांच्या नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका ‘लोकमत’ने मांडल्यावर शिवसेना, मनसेच्या नेत्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. या दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते गावदेवी मैदानात दाखल झाले. युवा सेनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी तत्काळ धावून आले. महापौर संजय मोरे, शहराध्यक्ष हेमंत पवार, विभागप्रमुख प्रकाश पायरे, युवासेनेचे नितीन लांडगे, किरण जाधव, अर्जुन डाभी, तसेच मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते तेथे पोचले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी दुष्काळग्रस्तांना होत असलेल्या त्रासाची माहिती महापौराना दिली. ती ऐकताच, तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल आणि कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन महापौर मोरे यांनी दिले. एवढेच नव्हे, तर दम देऊन बंद पाडलेले स्टॉल सुरू करायला दोन्ही पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील महिलांनी तयार केलेले थालीपीठ विकत घेऊन खाल्ले. दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलमध्ये कायदेशीर परवानगीचाच मुद्दा असेल तर ती देण्यासाठी खुद्द महापौरांनी त्यासाठीचा अर्ज मागवून घेतला आणि पालिकेकडून या स्टॉलना लागणारी रितसर परवानगी दिली जाईल, असे सांगितले. कायदेशीर कार्यवाही तत्त्काळ पूर्ण करण्याचे आदेशही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दुष्काळग्रस्तांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी आलेले पालिकेचे अधिकारीही तेथे उपस्थित होते. त्यांनी जेव्हा दुष्काळग्रस्तांचा जगण्याचा संघर्ष पाहिला, तेव्हा तेही हेलावून गेले. नगरसेविकेच्या पतीने सकाळी बंद केलेली वीज जोडणी तात्पुरती चालू करुन देण्यात आली. मनसेचे अविनाश जाधव यांनी स्वत: स्टूलवर उभे राहून तेथे बल्ब लावला आणि प्रतिकात्मकरित्या त्यांच्या आयुष्यात प्रकाश फुलविला. (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्तांना सहकार्यच : महापौर ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांना आम्ही स्टॉलबाबत कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या दुष्काळग्रस्तांचा स्टॉल ना रस्त्यावर आहे ना फुटपाथवर. तो मैदानाच्या कम्पाऊण्डमध्ये असल्याने त्याचा त्रास कोणालाही नाही. मैदान ज्या महोत्सवाला देण्यात आले आहे. त्यांनाही या स्टॉलमुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही. हे दुष्काळग्रस्त कोणाकडून दयेची याचना करीत नाहीत. ते स्वाभिमानाने जगत आहेत. कष्ट करुन पोट भरत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वांनीच सहकार्य केलेच पाहिजे. त्यांना पालिकेकडून कायदेशीर परवानगी दिली जाईल. तात्पुरत्या वीजजोडणीची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यांना जी मदत लागेल ती सर्व केली जाईल. जोपर्यंत ते इथे आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांना कोणताही त्रास होऊन देणार नाही. - संजय मोरे, महापौर, ठाणे‘लोकमत’चे आभार! जगण्याचा संघर्ष करणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या त्रासाला ‘लोकमत’ने वाचा फोडली आणि हा प्रश्न ठाणेकरांपुढे मांडल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आम्ही आभारी आहोत, अशा शब्दांत शिवसेनेच्या वेगवेगळ््या नेत्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. ‘लोकमत’ वेळोवेळी आमच्या अडचणींसाठी धावून आला. आजही त्यांनी केलेले सहकार्य आमच्यासाठी मोलाचे आहे, अशा शब्दांत कमलताई परदेशी यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. गावदेवीतील वडापावच्या गाड्या कशा चालतात? दुष्काळग्रस्तांना हुसकावण्याचा प्रयत्न करणे हे अयोग्यच आहे. आम्ही त्यांच्या बाजुने उभे राहणार आहोत. नव्हे, प्रत्येकानेच त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. गावदेवी मैदानाच्या आजूबाजूला वडापावच्या गाड्या लागल्या आहेत. तेथेही स्टोव्ह, गॅस असतात. त्यांना आशीर्वाद देणाऱ्यांना तिथे कधी आग लागण्याचा धोका जाणवला नाही का? तेथे हे प्रश्न निर्माण होत नाहीत का? अशा वेळी फक्त दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलवरील स्टोव्ह, गॅसमुळेच कशी आग लागेल? - प्रकाश पायरे, विभागप्रमुख, शिवसेना‘आम्ही गरीबांच्या पाठीशी उभे’शिवसेना निश्चितपणे दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभी राहणार. भाजपाने जे मुद्द्े उपस्थित केले, ते योग्य नाहीत. यांना गोरगरिबांकडे लक्ष देता येत नाहीत का?- हेमंत पवार, शहरप्रमुख, शिवसेना केळकरांनी भूमिका मांडावी एकीकडे पक्षाच्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करायचा आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे सोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करायचा? त्यांनी तसे करु नये. या प्रकरणात आमदार संजय केळकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मनसे सुरूवातीपासूनच दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे आणि कायमच राहील. - अभिजीत पानसे, ठाणे शहर संपर्कप्रमुख, मनसेहात लावण्याचा प्रयत्न केला, तर...आम्ही दुष्काळग्रस्तांना नक्कीच पाठिंबा देऊ. एकीकडे मुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार, नगरसेवक त्यांना हुसकविण्याचा प्रयत्न करतात. अशी दुटप्पी भूमिका भाजपाने घेऊ नये. दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलला हात लावण्याचा प्रयत्न कोणी केला, तर आम्ही त्यांचा हात काढल्याशिवाय राहणार नाही. - अविनाश जाधव, शहराध्यक्ष, मनसे