शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

अंत्यविधीसाठी नदीतून घेऊन जावा लागतो मृतदेह, चरीव येथील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 06:56 IST

आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही.

- वसंत पानसरेकिन्हवली : माणूस जिवंत असेपर्यंत त्याला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसंगी जीवनात संघर्ष करावा लागतो. पण किन्हवलीतील चरीव गावातील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आहेत. गावापासून अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण तिथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते. आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही. जर तेथील काही जमीन रस्त्यासाठी दिली तर मृतदेह नदीपात्रातून घेऊन जावा लागणार नाही, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.चरीव येथे अंत्यविधीसाठी असणारी स्मशानभूमी नादुरुस्त असून मोडकळीस आली आहे. पाच वर्षांपूर्वी या स्मशानभूमीची दुरुस्ती केली होती. पण आज त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील लाद्याही उखडल्या आहेत. शेडवरील पत्राच उडाल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास त्रास सहन करावा लागतो. या नदीपात्राच्या बाजूला असलेल्या शेतावर जाण्यासाठी कामगार बांधाचा वापर करतात. पण तेथून मृतदेह घेऊन जाता येत नाही. रस्ताच नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना नदीच्या खोल पात्रातून मृतदेह घेऊन जावा लागतो. पावसाळ्यात मृतदेह घेऊन जाताना काही अघटित घडले तर कोण जबाबदार, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.गावात दुसरी स्मशानभूमी आहे, पण ती लांब असून तेथे आदिवासी मृतदेह जाळतात. त्यामुळे याच स्मशानभूमीचा ग्रामस्थांना आधार आहे. जर सतत पाऊस पडत राहिल्यास नदी भरून वाहते. अशा वेळी कुणाचे निधन झाल्यास पाऊस थांबण्याची आणि नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते, असेही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.शहापूर तालुक्यात फक्त दोन ग्राममंडळ असून त्यापैकी एक चरीव आहे. आजमितीस दोन हजार लोकसंख्या असलेले गाव अनेक सुविधांपासून वंचितच आहे. येथील ग्राम मंडळ कमिटी बरखास्त केली असून सध्या प्रशासक म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहेत. सरकारच्या अनेक योजना भ्रष्ट अधिकारी व मुजोर लोकप्रतिनिधी यांच्यामुळे पोहोचल्या नसून आजही गाव विकासापासून कोसो दूर आहे.दरम्यान, गावाचा कारभार हा प्रशासकाच्या हातात असल्याने गावातील विकासकामांवरही होतो.स्मशानभूमीसाठी रस्त्याचा प्रस्ताव पुढे पाठवला असून पावसाळ््यानंतर रस्त्याचे कामकेले जाईल.- एस. एच टोहके, प्रशासक

टॅग्स :thaneठाणे