शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

अंत्यविधीसाठी नदीतून घेऊन जावा लागतो मृतदेह, चरीव येथील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 06:56 IST

आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही.

- वसंत पानसरेकिन्हवली : माणूस जिवंत असेपर्यंत त्याला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसंगी जीवनात संघर्ष करावा लागतो. पण किन्हवलीतील चरीव गावातील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आहेत. गावापासून अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण तिथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते. आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही. जर तेथील काही जमीन रस्त्यासाठी दिली तर मृतदेह नदीपात्रातून घेऊन जावा लागणार नाही, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.चरीव येथे अंत्यविधीसाठी असणारी स्मशानभूमी नादुरुस्त असून मोडकळीस आली आहे. पाच वर्षांपूर्वी या स्मशानभूमीची दुरुस्ती केली होती. पण आज त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील लाद्याही उखडल्या आहेत. शेडवरील पत्राच उडाल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास त्रास सहन करावा लागतो. या नदीपात्राच्या बाजूला असलेल्या शेतावर जाण्यासाठी कामगार बांधाचा वापर करतात. पण तेथून मृतदेह घेऊन जाता येत नाही. रस्ताच नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना नदीच्या खोल पात्रातून मृतदेह घेऊन जावा लागतो. पावसाळ्यात मृतदेह घेऊन जाताना काही अघटित घडले तर कोण जबाबदार, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.गावात दुसरी स्मशानभूमी आहे, पण ती लांब असून तेथे आदिवासी मृतदेह जाळतात. त्यामुळे याच स्मशानभूमीचा ग्रामस्थांना आधार आहे. जर सतत पाऊस पडत राहिल्यास नदी भरून वाहते. अशा वेळी कुणाचे निधन झाल्यास पाऊस थांबण्याची आणि नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते, असेही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.शहापूर तालुक्यात फक्त दोन ग्राममंडळ असून त्यापैकी एक चरीव आहे. आजमितीस दोन हजार लोकसंख्या असलेले गाव अनेक सुविधांपासून वंचितच आहे. येथील ग्राम मंडळ कमिटी बरखास्त केली असून सध्या प्रशासक म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहेत. सरकारच्या अनेक योजना भ्रष्ट अधिकारी व मुजोर लोकप्रतिनिधी यांच्यामुळे पोहोचल्या नसून आजही गाव विकासापासून कोसो दूर आहे.दरम्यान, गावाचा कारभार हा प्रशासकाच्या हातात असल्याने गावातील विकासकामांवरही होतो.स्मशानभूमीसाठी रस्त्याचा प्रस्ताव पुढे पाठवला असून पावसाळ््यानंतर रस्त्याचे कामकेले जाईल.- एस. एच टोहके, प्रशासक

टॅग्स :thaneठाणे