शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

अंत्यविधीसाठी नदीतून घेऊन जावा लागतो मृतदेह, चरीव येथील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 06:56 IST

आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही.

- वसंत पानसरेकिन्हवली : माणूस जिवंत असेपर्यंत त्याला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसंगी जीवनात संघर्ष करावा लागतो. पण किन्हवलीतील चरीव गावातील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आहेत. गावापासून अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण तिथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते. आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही. जर तेथील काही जमीन रस्त्यासाठी दिली तर मृतदेह नदीपात्रातून घेऊन जावा लागणार नाही, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.चरीव येथे अंत्यविधीसाठी असणारी स्मशानभूमी नादुरुस्त असून मोडकळीस आली आहे. पाच वर्षांपूर्वी या स्मशानभूमीची दुरुस्ती केली होती. पण आज त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील लाद्याही उखडल्या आहेत. शेडवरील पत्राच उडाल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास त्रास सहन करावा लागतो. या नदीपात्राच्या बाजूला असलेल्या शेतावर जाण्यासाठी कामगार बांधाचा वापर करतात. पण तेथून मृतदेह घेऊन जाता येत नाही. रस्ताच नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना नदीच्या खोल पात्रातून मृतदेह घेऊन जावा लागतो. पावसाळ्यात मृतदेह घेऊन जाताना काही अघटित घडले तर कोण जबाबदार, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.गावात दुसरी स्मशानभूमी आहे, पण ती लांब असून तेथे आदिवासी मृतदेह जाळतात. त्यामुळे याच स्मशानभूमीचा ग्रामस्थांना आधार आहे. जर सतत पाऊस पडत राहिल्यास नदी भरून वाहते. अशा वेळी कुणाचे निधन झाल्यास पाऊस थांबण्याची आणि नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते, असेही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.शहापूर तालुक्यात फक्त दोन ग्राममंडळ असून त्यापैकी एक चरीव आहे. आजमितीस दोन हजार लोकसंख्या असलेले गाव अनेक सुविधांपासून वंचितच आहे. येथील ग्राम मंडळ कमिटी बरखास्त केली असून सध्या प्रशासक म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहेत. सरकारच्या अनेक योजना भ्रष्ट अधिकारी व मुजोर लोकप्रतिनिधी यांच्यामुळे पोहोचल्या नसून आजही गाव विकासापासून कोसो दूर आहे.दरम्यान, गावाचा कारभार हा प्रशासकाच्या हातात असल्याने गावातील विकासकामांवरही होतो.स्मशानभूमीसाठी रस्त्याचा प्रस्ताव पुढे पाठवला असून पावसाळ््यानंतर रस्त्याचे कामकेले जाईल.- एस. एच टोहके, प्रशासक

टॅग्स :thaneठाणे