शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

बेघर मुलांसाठी मंडळाची निर्मिती व्हावी : सुसीबेन शहा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 14, 2024 17:14 IST

ठाणे: बेघर मुलांची समस्या सोडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबई, पुणे अशी शहरे बेघर मुलांपासून मुक्त व्हायला हवीत यासाठी ...

ठाणे: बेघर मुलांची समस्या सोडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबई, पुणे अशी शहरे बेघर मुलांपासून मुक्त व्हायला हवीत यासाठी आमचे प्रयत्न होत राहतील. इतर समुदाय आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, परंतु मुलं ही व्हॉइस लेस असतात. त्यासाठी आपणच त्यांचा आवाज बनण्याची गरज आहे. बेघर मुलांसाठी मंडळाची निर्मिती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन याची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी ग्वाही दिली

जनकवी पी. सावळाराम सभागृहात संपन्न झालेल्या चौथ्या सत्रात शहा बोलत होत्या. या सत्राचे अध्यक्ष ॲड.सुयश प्रधान होते. या सत्रात बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण आणि रिमांड होम डोंगरी येथील अधीक्षक रोहीत कंठीकर, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे हे वक्ते सहभागी झाले होते. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील 'बिईंग मी समिती' व 'जीवन संवर्धन फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी "फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रेंथ: नेव्हिगेशन अँड नेटवर्किंग फॉर हॉमलेस चिल्ड्रेन" या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. पहिल्या सत्रात जीवन संवर्धन फाउंडेशनच्या डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी बेघर मुले ही संकल्पना विस्ताराने विशद केली. या बेघर मुलांचा प्रश्न खूप गंभीर असून ही राष्ट्राच्या विकासात बाधा ठरत आहे.

यासाठी अश्या मुलांच्या आयुष्यात तिमिरातून तेजाकडे जाणारी वाट निर्माण करणे, हे आपले कर्तव्य आहे. अशी भूमिका मांडली. या राष्ट्रीय परिषदेमध्ये सादर केल्या जाणाऱ्या शोध निबंधांचा गोषवारा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश भगूरे यांनी महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक कार्यासह राबवले जाणारे समाजाभिमुख कार्यक्रम, विद्यार्थी केंद्री उपक्रमात विद्यार्थ्यांचा ४०% सहभाग तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी बाबींचा आढावा घेतला. तिसऱ्या सत्राच्या अध्यक्ष डॉ.प्रज्ञा दया पवार यांनी जात, वर्ग व लिंगभेदातून आपण भनंगपणाकडे जात आहोत याचे एक उदाहरण म्हणजे आजची बेघर लोकांची वाढलेली संख्या असे अधोरेखित केले. डॉ. इंदूप्रकाश सिंग यांनी बेघरांवर कोणतेही संशोधन जेव्हा या विषयात आपण काम करायला सुरुवात केली तेव्हा उपलब्ध नव्हते त्यामुळे सरकारी कार्यक्रमातून जी कामे होत नाहीत त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत असे मत व्यक्त केले.