शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

योजनेच्या ब्ल्यू प्रिंटचा पाणी विभागालाच थांगपत्ता नाही

By admin | Updated: November 14, 2016 04:07 IST

ज्या वेळेस सरकार किंवा पालिका एखादी मोठी योजना शहरात राबविते तेव्हा त्याची कागदपत्रे, डिझाईन्स, ब्ल्यू प्रिंट तयार केली जाते.

ज्या वेळेस सरकार किंवा पालिका एखादी मोठी योजना शहरात राबविते तेव्हा त्याची कागदपत्रे, डिझाईन्स, ब्ल्यू प्रिंट तयार केली जाते. जेणेकरुन भविष्यात कुठली अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. ती समस्या नेमकी कुठे आहे हे निश्चित कळू शकते. मात्र उल्हासनगर म्हणजे गोंधळ असे समीकरणच झाले आहे. जेव्हा ३०० कोटीची पाणीयोजना राबविली गेली त्याची ब्ल्यू प्रिंटच पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जलवाहिन्यांचे जाळे, व्हाल्व, मुख्य जलवाहिनी, त्यांचा मार्ग याचा थांगपत्ता पालिका अभियंत्यासह कर्मचाऱ्यांनाही लागत नाही. ठप्प पडलेली योजना सुरू झाल्यावर कशी पूर्ण होणार असा प्रश्न विभागासमोर आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ. ज्योती कालानी यांनी करून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी अद्याप तिलाही मुहूर्त मिळालेला नाही.महापालिकेकडे स्वत:चा स्रोत नाही उल्हासनगर पालिकेकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने त्यांना एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. पालिकेची पाणी बिलाची थकबाकी वाढल्याने एमआयडीसीकडून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असला तरी लोकसंख्येच्या प्रमाणत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. जलकुंभ भरत नसल्याने नाईलास्तव ८० टक्के नागरिकांना थेट जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. दबंग नगरसेवकांचा पाणी पुरवठा वितरणात हस्तक्षेप वाढल्याने त्याचा परिणामही पाणीपुरवठयावर होत असल्याची प्रतिक्रीया अधिकारी देतात. तत्कालीन अधिकारी वादात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी तत्कालिन शहर अभियंता माधव जवादे, कार्यकारी अभियंता सावकारे, कलई सेलवन, गिरगावकर यांच्यासह सहकारी अभियंत्यांनी मेहनत घेतली.मात्र त्या दरम्यान योजनेत मोठया प्रमाणात अनियमिता दिसून आल्याने भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे. त्यामुळे हे अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे. १२७ कोटीची योजना ३०० कोटीवर नेण्यात यांनी अहम भूमिका वठविल्याचेही बोलले जात आहे.टँकरवर दोन कोटींचा खर्च पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यावर शहर टँकरमुक्त करण्याची युतीची घोषणा कधीच हवेत विरुन गेली. आजही टँंकरवर दीड ते दोन कोटीचा खर्च करण्यात येत आहे. टँंकरची पळवापळवीही कायम असून एका प्रभागात दिवसाला २७ टँंकर फेऱ्याची नोंद आहे. तर त्यांनी अर्धा अधिक फेऱ्या बनावट दाखविल्या जात असून श्रीमंतांच्या घरी व बांधकामाच्या ठिकाणी टँंकर जात असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने करून तसे पुरावे पालिकेला दिले होते. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. ‘कोणार्क’ला काळ्या यादीत टाका३०० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत अनियमितता असल्याचे उघड झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून नगरसेवकांनी महासभेत कोणार्क कंपनीच्या कामावर अविश्वास दाखवत काळया यादीत टाकण्याची मागणी वेळोवेळी केली. मात्र पालिका प्रशासनाने कंपनीला पाठीमागे घातल्यानेच योजना ठप्प पडून शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याची टीका होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशी सुरू झाली नसून कुठेतरी पाणी मुरत असल्याचा सशंय नागरिक व्यक्त करीत आहेत. जलकुंभावर सीसीटीव्ही कॅमेरे : उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. कपातीमुळे पाणी पळविण्याच्या घटना सर्रास घडल्या आहेत. अखेर तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी जलकुंभांना पोलीस संरक्षण देत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला होता. आठवडयातून दोन वेळेस तेही अर्धा ते एक तास पाणी मिळत होते. तर झोपडपट्टी भागातील नागरिकांची तहान हातपंपाच्या दूषित पाण्यावर भागविली जात होती. आजही हीच परिस्थिती शहरात आहे. झोपडपट्टी भागात अर्धातास तर लालचक्की, जिजामाता गार्डन, लेफर्स कॉलनी, साई बलराम दरबार, नेहरू चौक, सी ब्लॉक, आनंदनगर, नेताजी चौक,भाटिया चौक, नेताजी गार्डन व उच्च वर्गीय विभागात दिवसाला ३ ते ४ तास पाणी पुरवठा होतो.