शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

...त्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

By admin | Updated: November 14, 2016 04:02 IST

चिराग वाडकर हा अहमदनगर येथे राहणारा १२ वर्षांचा मुलगा. पतंग उडवताना त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याच्यावर हात गमावण्याची वेळ

कल्याण : चिराग वाडकर हा अहमदनगर येथे राहणारा १२ वर्षांचा मुलगा. पतंग उडवताना त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याच्यावर हात गमावण्याची वेळ आली. तीन वर्षांपासून तो एका हाताने कामे करीत होता. शाळेने त्याला हात देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याला पुण्यातील नातेवाइकांनी कल्याण येथे शिबिरात पाठवले. त्याला कृत्रिम हालचाल करणारा ‘एलएन ४’ हा हात मिळाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. चिरागप्रमाणे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम रोटरी क्लब आॅफ कल्याण, जैन चॅरिटेबल ट्रस्टने रविवारी केले. निमित्त होते, ते ‘गिफ्ट आॅफ हॅण्ड’च्या वाटपाचे.कल्याण पश्चिमेतील महावीर सभागृहात रोटरी क्लब आॅफ कल्याण, जैन चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब आॅफ पुणे डाउन-टाउन यांच्यातर्फे हे शिबिर झाले. देशभरातून अनेक जण या शिबिरात आले होते. लहान मुलांपासून मोठ्यांना या शिबिरात कृत्रिम हात देण्यात आले. कोपरापासून खाली हात नसलेल्यांना ‘एलएन ४’, तर खांद्यापासून हात नसलेल्यांना माहीममधील डिस्ट्रिक्ट डिसअ‍ॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून हात उपलब्ध करून देण्यात आला. ही संस्था उदयपूर येथून मापाप्रमाणे हात बनवून घेते. हात मिळाल्याने या अपंगांना आता स्वावलंबी होता येणार आहे. अपंगांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हेच आमचे समाधान होते, असे आयोजकांनी सांगितले. चिराग वाडकर याने सांगितले की, हात गेल्याने मी निराश झालो होतो. माझी आई घरकाम करते. वडील घर सोडून निघून गेले आहेत. आईला मीच आधार आहे. मला शिकून मोठे व्हायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘एलएन ४’ या कृत्रिम हातीच मदत होणार आहे. वाडकर यांच्याप्रमाणेच प्रकाश आम्रकोळी हे जळगावहून या शिबिरात सहभागी झाले होते. १५ वर्षांपूर्वी कारखान्यात काम करताना त्यांचा एक हात यंत्रात अडकला. त्यामुळे हात गमावण्याची वेळ आली. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना एसएमएसद्वारे त्यांना कल्याणला कृत्रिम हात वाटपाच्या शिबिराची माहिती दिली. कृत्रिम हात मिळाल्याने बरीचशी कामे करता येणार असल्याचा विश्वास प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.डोंबिवलीतील डीएनसी शाळेत शिकणारा प्रतीक कारंडे याच्या एका हाताला बोटे नाहीत. दुसरामनगटापासून हात नाही. त्याला बोटांसाठी सर्जरी करावी लागणार असली तरी त्याला कृत्रिम हात देण्यात आला. त्याच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले. या कृत्रिम हातामुळे त्याला १५ ते २० टक्के फरक पडेल, असे त्याच्या पालकांनी सांगितले.या कार्यक्रमात ३५० जणांना कृत्रिम हातांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर २५० जणांनी हातासाठी नोंदणी केली. दरम्यान, हा जागतिक विक्रम ठरणार आहे, असा दावा आयोजकांनी केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर या ठिकाणांहूनही हात घेण्यासाठी अपंग व्यक्ती आल्या होत्या. बाजारभावाप्रमाणे हात घेण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च होता. संस्थेला ते अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना ते मोफत हात देण्यात आले. या कार्यक्रमास रोटेरियन दिलीप घाडगे, संजय पानसे, नगरसेवक सचिन खेमा, किशोर वैद्य, एस.पी. जैन, सुश्रुत वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.