शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 06:17 IST

कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : चिकाटी आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते. कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे दोनच वर्षांपूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. प्रथमेश हा बिर्ला कॉलेजच्या कला शाखेचा विद्यार्थी असून त्याच्या यशामुळे त्याच्या आईवडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.प्रथमेश हा जन्मत:च अंध आहे. त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरकडे तपासणी केली, तेव्हा तो अंध असल्याचे त्यांना समजले. प्रथमेशचे वडील धीरेंद्र हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. आई प्रतीक्षा ही गृहिणी आहे. त्याला एक बहीण आहे. तीही जन्मत:च अंध आहे. ती सहावीत शिकत आहे. परीक्षेच्या काळात त्याला तीन दिवस खूप त्रासही झाला होता. त्याला परीक्षेच्या काळात रिअ‍ॅक्शन होऊन अतिसाराचा त्रास झाला होता. या परिस्थितीतही त्याने जिद्द न सोडता परीक्षा दिली. त्याला मराठीत ७३, इंग्रजीत ७६, भूगोल ४७, इतिहास ५५, राज्यशास्त्र ४३, ग्रेड विषयात ५० पैकी ४२ गुण मिळाले आहेत. प्रथमेशला इतिहास विषय घेऊन पदवी संपादन करायची आहे. वीर सावरकर संस्थेची २६ मे ला शिवाजी पार्कला मॅरेथॉन स्पर्धा झाली होती. त्यात त्याला विशेष पारितोषिक मिळाले आहे. प्रथमेश सुरुवातीला पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत जात होता. तो अंध असल्याचे समजताच त्याच्या आईने ‘नॅब’चा एक कोर्स पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे संगोपन कसे करायचे हे तिला समजले. नॅबकडून एक शिक्षक येऊन त्याला शिकवत होते. त्याला ब्रेल लिपीतून अभ्यास करावा लागणार असला तरी तो डोळस मुलांच्या शाळेत शिकावा, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी प्रथमेशला सरस्वती मंदिर शाळेत घातले. लहान असताना स्नेहसंमेलनात तो सहभागी होत असे. नॅब ही दहावीपर्यंतचे अभ्यासक्रमाचे रेकार्डिंग देत असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी स्नेहांकितसंस्थेशी संपर्क साधला. या संस्थेने त्याला रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले. अंधत्वावर मात करीत शिक्षण घेत असताना प्रथमेशला आणखीन एक समस्या उद्भवली. त्याची मूत्रपिंड कमी प्रमाणात काम करीत असल्याचे वैद्यकीय तपास अहवालात उघड झाले. इयत्ता सातवी ते नववीपर्यंत प्रथमेशच्या मूत्रपिंडावर उपचार सुरू होते. नववीचे पूर्ण वर्ष तो डायलिसिसवर होता. ७६ तासांचे डायलिसिस घेऊन त्याला शाळेत हजर राहता येत नव्हते.>वडिलांनी दिले मूत्रपिंडमूत्रपिंड निकामी झाल्याने प्रथमेशच्या आईवडिलांसमोर मोठा पेच निर्माण झाला. वडिलांना आपल्या मुलाच्या वेदना सहन होत नव्हत्या. त्यांनी त्याला आपली किडनी दिली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाने प्रथमेशला एक प्रकारे जीवदान मिळाले. त्यानंतरही त्याचा त्रास सहन झाला नाही. त्यांना काही पथ्ये पाळावी लागतात. अन्न-पाणीसोबत ठेवावे लागते. त्याला रक्तदाब व मधुमेहाचाही त्रास आहे. एवढे सर्व सहन करून त्याने दहावीत ७५ टक्के गुण मिळविले होते.