शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पाटील यांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:54 IST

सशर्त माघार : मुख्यमंत्री, कपिल पाटील, किसन कथोरे यांची मध्यस्थी

मुरलीधर भवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी काँगे्रसविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बंडखोरी ही केवळ काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार नव्हती, तर कुणबीसेनेचे प्रमुख असल्याने ते कुणबी मते घेऊन भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचाही विजयरथ रोखण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून पाटील यांची बंडखोरी भाजपने शमवली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पुढाकारापश्चात पाटील यांनी काही अटींवर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे.

विश्वनाथ पाटील यांनी २००९ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ८९ हजार मते पडली होती. ही मते कुणबीसेनेच्या जोरावर त्यांनी घेतली होती. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी लढवली. तेव्हा त्यांना तीन लाख मते मिळाली होती. ही मते केवळ काँग्रेसची नव्हती, तर त्यामध्ये कुणबी मतांचाही समावेश होता. यावेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह कपिल पाटील यांच्याशी जवळीक साधली. त्यांची मुंबईत भेटही झाली. भेटीपश्चात विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भाजपच्या सांगण्यावरूनच दाखल केल्याची चर्चा काँग्रेसकडून व्यक्त केली गेली; मात्र प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी भाजपसाठीही अडचणीची ठरू शकत होती. कुणबी समाजाचा मतदार हा सामाजिक बांधीलकी म्हणून कुणबीसेनेच्या उमेदवाराकडे वळला असता आणि त्याचा फटका भाजपला बसला असता.

विश्वनाथ पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याने त्यांची बंडखोरी शमवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही. कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा परिसरांत वर्चस्व असलेले भाजप आमदार कथोरे यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. कथोरे यांनी पाटील यांच्यासमवेत गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी कपिल पाटील हेदेखील उपस्थित होती.यावेळी विश्वनाथ पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ठाणे व कोकण परिसरातील सिंचनासाठी निधी देण्याचे, कुणबी आर्थिक विकास महामंडळास निधी देण्याचे आणि विधान परिषद व राज्यसभेत कुणबीसेनेला प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले. पेसा कायद्यातील आरक्षणाचा विचार करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. आपण मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला कुणबीसेनेचा पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीत कुणबीसेना घटक पक्ष असेल, अशी मान्यता कुणबीसेनेला दिली आहे. कुणबीसेनेचा पाठिंबा राज्यभरातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना असेल, असे पाटील यांनी सांगितले.कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील महायुतीच्या उमेदवारांना कुणबीसेनेने पाठिंबा दिल्याने विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी