शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

सेनेसह भाजपची कोंडी..!

By admin | Updated: October 19, 2015 01:09 IST

शिवसेना-भाजप वेगवेगळी लढत असतांना पक्षात तणातणी वाढू नये यासाठी बंडखोरांना शांत करतांना दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेना-भाजप वेगवेगळी लढत असतांना पक्षात तणातणी वाढू नये यासाठी बंडखोरांना शांत करतांना दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यातच तिकिट वाटप आणि मुलाखतीच्यावेळी एकत्र आलेले वरिष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढतांना दिसत नसल्याने स्थानिक नेत्यांची कोंडी झाली होती. तरीही या दोन्ही पक्षांनी ठिकठिकाणच्या बंडखोरांना को. आॅप (स्वीकृत नगरसेवक) चे कॅडबरी आणि परिवहनचे लॉलीपॉप दाखविल्याचे सांगण्यात आले.पण असे किती को.आॅप घेता येतात, आणि किती सदस्य परिवहनवर जाऊ शकतात असा सवाल बंडखोरांनी विचारल्याने नेत्यांची फार पंचाईत झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी कायम आहे. जेथे माघार घेण्यात आली त्या सर्वांना दोन दिवसांनी एकमेकांना सेम कमिटमेंट दिली असल्याचे समजल्याने हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी दाखविले. तसेच गाजर तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे जरी बंडाळी थोपवण्यात त्या पक्षांना यश आलेले असले तरी निकालांनंतर मात्र, पुन्हा कोंडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही असे आश्वासन दिल्याने नेमके किती जणांना त्या पदांवर घेणार असा सवाल आता विचारला जात आहे. >विधानसभा निवडणुकीत विशेषत: डोंबिवलीआणि कल्याण ग्रामीण, पूर्व-पश्चिम या मतदारसंघामध्ये त्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनाही विविध गाजरे दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. काही काळ लोटल्यावर सारे काही अलबेल असल्याचा देखावा करण्यात आला. >डोंबिवलीसह कल्याणमधील अनेकांना दोन्ही पक्षांच्या वतीने आता उमेदवारी मागे घ्या, कुठेतरी अ‍ॅडजेस्ट करतो असे सांगण्यात आले. पण नेमके कुठे आणि कसे हे विचारण्याची हिंमत मात्र कोणीही दाखवलेली नाही, त्यामुळे ज्यांनी माघार घेतली त्यापैकी बहुतांशी सर्वच आपल्याला काही तरी मिळणार या भ्रमात असल्याने हास्यास्पद ठरले आहेत.<जे इच्छुक होते, ते प्रचाराला मोकळया मनाने येत आहेत की नाही हे माहिती नाही. ते विरुद्ध पार्टीला मदत करतील का? ही शंका सर्वांना आहे. प्रसिद्धी माध्यमांकडेही अनेकांनी त्यांचे मन मोकळे केले होते. त्यामुळे नाराज झालेले पक्षासोबत असले तरी प्रत्यक्ष प्रचारात किती असतील याबाबत मात्र शंका असल्याचे ठिकठिकाणच्या उमेदवारांनी सांगितले. < काही ठिकाणी तर पक्षातील वरिष्ठांमुळे काल पक्षात आलेल्याला तिकिट मिळतात, बघू कसे जिंकतात ते, असा प्रचार केल्यानेही काहींची पंचाईत झाली आहे. त्यामुळे नाराजांनी जरी तिकिट मागे घेतलेले असले तरी त्यांची नाराजी ठायी ठायी संबंधित उमेदवाराला भोवत आहे. नाराज झालेल्या व्यक्ती प्रचारापासून अलिप्त असल्या तरीही मतदार खोचक सवाल करत उमेदवाराच्या तोंडचे पाणी पळवतात. त्यामुळे बंडखोरी शमली की, केवळ उमेदवारी मागे घेतली असा सवाल उमेदवारांना पडला आहे.