शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेसह भाजपची कोंडी..!

By admin | Updated: October 19, 2015 01:09 IST

शिवसेना-भाजप वेगवेगळी लढत असतांना पक्षात तणातणी वाढू नये यासाठी बंडखोरांना शांत करतांना दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेना-भाजप वेगवेगळी लढत असतांना पक्षात तणातणी वाढू नये यासाठी बंडखोरांना शांत करतांना दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यातच तिकिट वाटप आणि मुलाखतीच्यावेळी एकत्र आलेले वरिष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढतांना दिसत नसल्याने स्थानिक नेत्यांची कोंडी झाली होती. तरीही या दोन्ही पक्षांनी ठिकठिकाणच्या बंडखोरांना को. आॅप (स्वीकृत नगरसेवक) चे कॅडबरी आणि परिवहनचे लॉलीपॉप दाखविल्याचे सांगण्यात आले.पण असे किती को.आॅप घेता येतात, आणि किती सदस्य परिवहनवर जाऊ शकतात असा सवाल बंडखोरांनी विचारल्याने नेत्यांची फार पंचाईत झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी कायम आहे. जेथे माघार घेण्यात आली त्या सर्वांना दोन दिवसांनी एकमेकांना सेम कमिटमेंट दिली असल्याचे समजल्याने हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी दाखविले. तसेच गाजर तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे जरी बंडाळी थोपवण्यात त्या पक्षांना यश आलेले असले तरी निकालांनंतर मात्र, पुन्हा कोंडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही असे आश्वासन दिल्याने नेमके किती जणांना त्या पदांवर घेणार असा सवाल आता विचारला जात आहे. >विधानसभा निवडणुकीत विशेषत: डोंबिवलीआणि कल्याण ग्रामीण, पूर्व-पश्चिम या मतदारसंघामध्ये त्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनाही विविध गाजरे दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. काही काळ लोटल्यावर सारे काही अलबेल असल्याचा देखावा करण्यात आला. >डोंबिवलीसह कल्याणमधील अनेकांना दोन्ही पक्षांच्या वतीने आता उमेदवारी मागे घ्या, कुठेतरी अ‍ॅडजेस्ट करतो असे सांगण्यात आले. पण नेमके कुठे आणि कसे हे विचारण्याची हिंमत मात्र कोणीही दाखवलेली नाही, त्यामुळे ज्यांनी माघार घेतली त्यापैकी बहुतांशी सर्वच आपल्याला काही तरी मिळणार या भ्रमात असल्याने हास्यास्पद ठरले आहेत.<जे इच्छुक होते, ते प्रचाराला मोकळया मनाने येत आहेत की नाही हे माहिती नाही. ते विरुद्ध पार्टीला मदत करतील का? ही शंका सर्वांना आहे. प्रसिद्धी माध्यमांकडेही अनेकांनी त्यांचे मन मोकळे केले होते. त्यामुळे नाराज झालेले पक्षासोबत असले तरी प्रत्यक्ष प्रचारात किती असतील याबाबत मात्र शंका असल्याचे ठिकठिकाणच्या उमेदवारांनी सांगितले. < काही ठिकाणी तर पक्षातील वरिष्ठांमुळे काल पक्षात आलेल्याला तिकिट मिळतात, बघू कसे जिंकतात ते, असा प्रचार केल्यानेही काहींची पंचाईत झाली आहे. त्यामुळे नाराजांनी जरी तिकिट मागे घेतलेले असले तरी त्यांची नाराजी ठायी ठायी संबंधित उमेदवाराला भोवत आहे. नाराज झालेल्या व्यक्ती प्रचारापासून अलिप्त असल्या तरीही मतदार खोचक सवाल करत उमेदवाराच्या तोंडचे पाणी पळवतात. त्यामुळे बंडखोरी शमली की, केवळ उमेदवारी मागे घेतली असा सवाल उमेदवारांना पडला आहे.