शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे वगळण्याबाबत भाजपाची भूमिका बदलली?

By admin | Updated: February 22, 2016 00:37 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे पुन्हा वगळण्याबाबत सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दुवा म्हणून मध्यस्थाची भूमिका वठवणाऱ्या

चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे पुन्हा वगळण्याबाबत सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दुवा म्हणून मध्यस्थाची भूमिका वठवणाऱ्या आमदार-खासदारांनी अद्याप भेट घडवून न आणल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी भेट होत नसल्याने या विषयावर भाजपाची भूमिका बदलल्याची चर्चा येथे आहे. या २७ गावांत भाजपाचे राजकीय अस्तित्व नसल्याने संघर्ष समितीला गावे वगळण्याची हमी देऊन बहिष्कार उठवण्यास राजी करून पालिकेच्या निवडणुका लढवण्यात आल्या. त्या पार पडल्या. भाजपाने सात सदस्य पदरात पाडून घेतले. निवडणुकीपूर्वी गावे लगेचच बाहेर काढण्याचे आश्वासन देणारी भाजपा आता चार महिन्यांत कोणतीही हालचाल करीत नसल्याचे पाहून हा पक्ष संघर्ष समितीला झुलवत ठेवून फसवणूक करीत असल्याची भावना या गावांतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करीत असणारे खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, किसन कथोरे, गणपत गायकवाड आणि रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट व्हावी, यासाठी संघर्ष समितीने स्मरणपत्र दिले आहे. मात्र, अद्याप भेटीला मुहूर्त मिळत नसल्याने संशयाचे वातावरण आहे. १ जून २०१५ च्या शासकीय अधिसूचनेनुसार पालिकेत २७ गावांचा समावेश झाल्यानंतर ७ सप्टेंबरला पुन्हा ही गावे वगळण्यासाठी शासकीय अधिसूचना काढली गेली. ती काढताना आधीची समावेशाबाबतची अधिसूचना रद्द करण्यात आली नव्हती किंवा ७ सप्टेंबरच्या गावे वगळण्याच्या अधिसूचनेत तसा उल्लेख नव्हता. (वार्ताहर)मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्याबाबत २७ गावांतील ग्रामस्थांना जाहीर आश्वासन दिलेले आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. मात्र, जास्त वेळ घालवायला नको. कारण, हा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे.- चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीमुख्यमंत्री सतत दौऱ्यावर असल्यामुळे वेळ मिळू शकला नाही. परंतु, लवकरच समितीची त्यांच्यासोबत भेट होईल. भारतीय जनता पक्ष संघर्ष समितीच्या पाठीशी असून गावे वगळण्यासाठी आम्ही एकत्र आहोत.- नरेंद्र पवार, आमदार