शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नवघरमधील प्रस्तावित तरणतलावावर भाजपाची कोलांटउडी; विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर करण्यात आलेला नवघर येथील

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर करण्यात आलेला नवघर येथील प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली. याविरोधात सेना व काँग्रेस या विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाल्याने काही वेळेपुरता सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. 

पालिकेने माजी खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या क्रिडा संकुलात पहिले तरणतलाव साकारण्यात आले आहे. या तरणतलावाचे कंत्राट खाजगी संस्थेला दिल्याने संस्थेकडुन त्यासाठी सुमारे ५ हजार रुपये वार्षिक रक्कम जलतरणपटूंकडुन वसुल केली जाते. पालिकेच्या तरणतलावासाठी एवढी भरमसाठी रक्कम वसुल करणे आक्षेपार्ह असुन नाममात्र दर त्यासाठी निश्चित केला जावा, अशी मागणी भाजपाचेच मोरस रॉड्रीक्स यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे केली. मात्र या तरणतलावाला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव विकासकाच्या माध्यमातून साकारण्यात यावे, अशी मागणी सेना नगरसेवक दिनेश नलावडे व माजी नगरसेवक राजेश वेतोस्कर यांनी केली होती. त्यासाठी गटनेत्या निलम ढवण यांनी देखील आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या तलावाच्या विकासासाठी चालु अंदाजपत्रकात २ कोटींची तरतूदही केली. त्याच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. मात्र त्याला पुढील सभेत घेण्याचे स्पष्ट करीत भाजपाने त्यावर कोलांटउडी घेतली. हा तरणतलाव साकारला असता तर त्याचे श्रेय सेनेला जाण्याची भिती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्यानेच त्यांनी त्यावर चर्चा न करताच त्याला बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय विरोधकांनी घेतल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यांनी भाजपाच्या या मनसूब्याला तीव्र विरोध करीत नवघरच्या तलावाचा निधी इतरत्र वर्ग करण्याचा हा सत्ताधाय््राांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रस्तावित तरणतलाव नवघर येथील मोठ्या लोकवस्तीत साकारण्यात येणार असल्याने तो तेथील जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार होता. परंतु, सत्ताधाय््राांनी त्याला बगल देत विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला. दहिसर चेकनाका परिसरात लोढा अ‍ॅक्वा येथे प्रस्तावित तरणतलावाच्या विकासानंतरच नवघर येथील तलावाचा विकास करण्यासह भाजपाचा शहरात ६ तरणतलाव बांधण्याचा मानस असल्याचा दावा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी केला. त्यावर विरोधकांनी, या तरणतलावाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने नवघरच्या तलावाला विरोध का, असा प्रश्न सत्ताधाय््राांना केला. विरोधकांनी त्यावर गोंधळ घालताच महापौरांनी विरोधकांना ठराव मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सेनेचे दिनेश नलावडे यांनी तलाव साकारण्याचा तर सत्ताधारी भाजपाचे मोहन म्हात्रे यांनी त्याच्या विरोधात ठराव मांडला. त्यावर पार पडलेल्या मतदानात म्हात्रे यांचा ठराव बहुमताने मंजुर करण्यात आला. यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी देखील नवघरच्या तलावाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन पुढील सभेत त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी केली. पाटील यांच्या या विधानामुळे विरोधकांना हायसे वाटले असले तरी पाटील यांनी ठरावावेळी म्हात्रे यांच्या ठरावावर मतदान केल्याने त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली.