शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

नवघरमधील प्रस्तावित तरणतलावावर भाजपाची कोलांटउडी; विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर करण्यात आलेला नवघर येथील

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर करण्यात आलेला नवघर येथील प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली. याविरोधात सेना व काँग्रेस या विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाल्याने काही वेळेपुरता सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. 

पालिकेने माजी खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या क्रिडा संकुलात पहिले तरणतलाव साकारण्यात आले आहे. या तरणतलावाचे कंत्राट खाजगी संस्थेला दिल्याने संस्थेकडुन त्यासाठी सुमारे ५ हजार रुपये वार्षिक रक्कम जलतरणपटूंकडुन वसुल केली जाते. पालिकेच्या तरणतलावासाठी एवढी भरमसाठी रक्कम वसुल करणे आक्षेपार्ह असुन नाममात्र दर त्यासाठी निश्चित केला जावा, अशी मागणी भाजपाचेच मोरस रॉड्रीक्स यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे केली. मात्र या तरणतलावाला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव विकासकाच्या माध्यमातून साकारण्यात यावे, अशी मागणी सेना नगरसेवक दिनेश नलावडे व माजी नगरसेवक राजेश वेतोस्कर यांनी केली होती. त्यासाठी गटनेत्या निलम ढवण यांनी देखील आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या तलावाच्या विकासासाठी चालु अंदाजपत्रकात २ कोटींची तरतूदही केली. त्याच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आर्थिक व प्रशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. मात्र त्याला पुढील सभेत घेण्याचे स्पष्ट करीत भाजपाने त्यावर कोलांटउडी घेतली. हा तरणतलाव साकारला असता तर त्याचे श्रेय सेनेला जाण्याची भिती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्यानेच त्यांनी त्यावर चर्चा न करताच त्याला बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय विरोधकांनी घेतल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यांनी भाजपाच्या या मनसूब्याला तीव्र विरोध करीत नवघरच्या तलावाचा निधी इतरत्र वर्ग करण्याचा हा सत्ताधाय््राांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रस्तावित तरणतलाव नवघर येथील मोठ्या लोकवस्तीत साकारण्यात येणार असल्याने तो तेथील जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार होता. परंतु, सत्ताधाय््राांनी त्याला बगल देत विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला. दहिसर चेकनाका परिसरात लोढा अ‍ॅक्वा येथे प्रस्तावित तरणतलावाच्या विकासानंतरच नवघर येथील तलावाचा विकास करण्यासह भाजपाचा शहरात ६ तरणतलाव बांधण्याचा मानस असल्याचा दावा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी केला. त्यावर विरोधकांनी, या तरणतलावाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने नवघरच्या तलावाला विरोध का, असा प्रश्न सत्ताधाय््राांना केला. विरोधकांनी त्यावर गोंधळ घालताच महापौरांनी विरोधकांना ठराव मांडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सेनेचे दिनेश नलावडे यांनी तलाव साकारण्याचा तर सत्ताधारी भाजपाचे मोहन म्हात्रे यांनी त्याच्या विरोधात ठराव मांडला. त्यावर पार पडलेल्या मतदानात म्हात्रे यांचा ठराव बहुमताने मंजुर करण्यात आला. यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी देखील नवघरच्या तलावाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन पुढील सभेत त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी केली. पाटील यांच्या या विधानामुळे विरोधकांना हायसे वाटले असले तरी पाटील यांनी ठरावावेळी म्हात्रे यांच्या ठरावावर मतदान केल्याने त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली.