शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

भाजपा कार्यकर्त्यांसाठी महामंडळ, मुख्यमंत्रीही दूर, अच्छे दिनाची प्रतीक्षा संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:04 AM

डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती.

अनिकेत घमंडीडोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. पण जसजशा पुढील निवडणुका समीप येत आहेत तसतशी कार्यकर्त्यांमध्येच अच्छे दिन कधी येणार अशी चर्चा सुरु असून महामंडळांचेही गाजर दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे महामंडळ दूर असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट होत नसल्याने नगरसेवक-कार्यकर्ते नाराज असल्याची उघड चर्चा आहे.नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात मनसेचे डोंबिवलीतील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले, पण तेथे गेलेल्या डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांची मात्र मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नसल्याची सल ‘लोकमत’शी बोलतांना जुन्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमधून पक्षाला तीन आमदार, एक खासदार मिळाले. मुरबाडची आमदारकीही भाजपाने राखली. त्यामुळे कार्यकर्त्यांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. सत्तेची तीन वर्षे उलटली. पण अद्यापही महामंडळांचा निर्णय नाही, आता काय पदरी मिळणार? सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही गाजरच मिळाल्याची चर्चा उघडपणे सुरु आहे. २०१४ मध्ये लोकसभेला युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभेमध्ये सत्ता येण्यासाठी कार्यकर्ते राबले. केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपाची सत्ता आली, त्यामुळे अच्छे दिन येणार अशी आशा निर्माण झाली. पण कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार ५०० कोटींच्या पॅकेजचे दाखवलेल्या गाजर उपक्रमाची कार्यकर्त्यांनीही आधी मजा लुटली, पण त्यानंतर त्यांच्यामध्येही आता तीन वर्षांनंतर सर्वसामान्यांप्रमाणेच आपल्यालाही गाजर मिळाल्याची भावना आहे.मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेत निधीच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही डोंबिवलीकरांना घेऊन जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण बालेकिल्ला म्हणवल्या जाणाºया कल्याण-डोंबिवलीतील भाजपाच्या नगरसेवकांना मात्र मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने उघडपणे खंत व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीत ज्या पद्धतीचे राजकारण झाले ते पाहता पक्षाला जर पुन्हा यश मिळवायचे असेल तर आतापासून किमान प्रश्न समजून घेण्याची तयारी करायला हवी. पण ज्यांनी त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे ते मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांना लगेच वेळ देतात. मनसेच्या नेत्यांना भेटतात, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बेटण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही, याबद्दलची तीव्र नाराजी पक्षात आहे.>दगाफटक्याची भीतीलोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा तोंडावर आल्या असून भाजपामध्ये असलेली खंत वाढत गेली तर मात्र पक्षाची कोंडी वाढेल. त्यातच विधानसभाही लोकसभेच्या निवडणुकांसोबतच घेतली; तर मात्र कार्यकर्त्यांना जोमाने काम करावे लागेल. तो उत्साह, जोश टिकवून ठेवण्यासाठी आतापासूनच विशेष प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पक्षासमोरील अडचणी आणि अंतर्गत कुरबुरी वाढल्या तर निवडणुकांना सामोरे जाताना दगाफटका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस