शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

राम मंदिरासाठी भाजपाचे शिवसेनेला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:04 IST

ठाणे आणि कल्याण हे भाजपचे बालेकिल्ले असून तिथे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईलच. राज्यातील अशा सर्वच मतदारसंघात निवडणूकीच्या दृष्टीने तयारीला लागा, केंद्र आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचवा, असा सल्लाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना दिला.

ठळक मुद्दे ठाणे-कल्याण भाजपाचा बालेकिल्लारावसाहेब दानवेंचा दावाठाण्यात घेतली निवडणूक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ म्हणजे भाजपाचे बालेकिल्ले आहेत. या मतदारसंघांत निवडणूक लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा निर्णय सरकारमधील दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित बैठकीतून घेतील. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही पक्षांत तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केला.ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ते ठाण्यात आले होते. या आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक विस्तारक नेमला असून त्याच्यामार्फत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बैठका घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेनेला भाजपाचे समर्थन असून समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणूक लढवणार असल्याचे सांगून शिवसेनेशी राज्यात युती कायम ठेवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा काढून राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो. यात कोणीही कोणाचा मुद्दा हायजॅक करू शकत नाही. प्रत्येकजण आपल्या पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील ४८ पैकी १३ मतदारसंघांचा गेल्या १५ दिवसांमध्ये आढावा घेतला असून बुधवारी ठाण्यासह तीन ठिकाणचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. भाजपा हादेखील स्वतंत्र राजकीय पक्ष असल्यामुळे राज्यभरात निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरूआहे. निवडणूक लढवताना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे, हे मुख्य लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. त्याचा मित्रपक्षाला (शिवसेनेलाही) फायदाच होईल. समविचारी पक्षांसोबत एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जायचा भाजपाचा विचार आहे. विरोधी पक्षाला फायदा होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यापैकी कोणाचे नाव द्यायचे, या वादावर दोन्ही पक्षांतील नेते चर्चेतून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, देणार नाहीत. यात अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. गोटे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणBJPभाजपा