शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी भाजपाचे शिवसेनेला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:04 IST

ठाणे आणि कल्याण हे भाजपचे बालेकिल्ले असून तिथे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईलच. राज्यातील अशा सर्वच मतदारसंघात निवडणूकीच्या दृष्टीने तयारीला लागा, केंद्र आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचवा, असा सल्लाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना दिला.

ठळक मुद्दे ठाणे-कल्याण भाजपाचा बालेकिल्लारावसाहेब दानवेंचा दावाठाण्यात घेतली निवडणूक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ म्हणजे भाजपाचे बालेकिल्ले आहेत. या मतदारसंघांत निवडणूक लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा निर्णय सरकारमधील दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित बैठकीतून घेतील. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही पक्षांत तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केला.ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ते ठाण्यात आले होते. या आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक विस्तारक नेमला असून त्याच्यामार्फत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बैठका घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेनेला भाजपाचे समर्थन असून समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणूक लढवणार असल्याचे सांगून शिवसेनेशी राज्यात युती कायम ठेवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा काढून राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो. यात कोणीही कोणाचा मुद्दा हायजॅक करू शकत नाही. प्रत्येकजण आपल्या पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील ४८ पैकी १३ मतदारसंघांचा गेल्या १५ दिवसांमध्ये आढावा घेतला असून बुधवारी ठाण्यासह तीन ठिकाणचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. भाजपा हादेखील स्वतंत्र राजकीय पक्ष असल्यामुळे राज्यभरात निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरूआहे. निवडणूक लढवताना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे, हे मुख्य लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. त्याचा मित्रपक्षाला (शिवसेनेलाही) फायदाच होईल. समविचारी पक्षांसोबत एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जायचा भाजपाचा विचार आहे. विरोधी पक्षाला फायदा होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यापैकी कोणाचे नाव द्यायचे, या वादावर दोन्ही पक्षांतील नेते चर्चेतून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, देणार नाहीत. यात अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. गोटे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणBJPभाजपा