शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या धक्क्याने भाजपात नाराजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे शिवसेना आणि भाजपाने सत्ता मिळविली असली तरी पदांच्या वाटपावरून अढी काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आला. दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच-पाच सभापतीपदांचे सूत्र ठरलेले असतानाही क प्रभागात शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे.

- प्रशांत मानेकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे शिवसेना आणि भाजपाने सत्ता मिळविली असली तरी पदांच्या वाटपावरून अढी काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आला. दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच-पाच सभापतीपदांचे सूत्र ठरलेले असतानाही क प्रभागात शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. वरिष्ठांचे आदेश असतानाही शिवसेनेच्या स्थानिक राजकारणाने भाजपा नेते नाराज झाले असून महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा सावध भूमिकेत राहणार आहे.२०१५ ला केडीएमसीची निवडणूक पार पडली. यात शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ , मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना भाजपाने संख्याबळाच्या आधारावर सत्ता स्थापन केली. सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे महापौर बसविण्याचा मान मिळविता आला, तर उर्वरित अडीच वर्षातील एक वर्ष भाजपा, तर दीड वर्षे शिवसेनेला मिळणार आहेत. १३ मे ला महापौरपदाचा शिवसेनेचा अडीच वर्षाचा कालावधी संपत आहे. पुढील मान भाजपाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दिलेल्या अनपेक्षित धक्क्याने भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. शुक्रवारी दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक झाली. क प्रभाग वगळता अन्य नऊ प्रभागांत शिवसेना-भाजपाच्या वतीने प्रत्येकी एका सदस्यानेच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली. क प्रभागात भाजपाच्या वतीने सचिन खेमा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात शिवसेनेचे मोहन उगले यांनीही उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली.दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी ५ प्रभाग समित्या असे वाटप झाल्याने निवडणुकीच्या वेळी उगले अर्ज मागे घेतील, अशा भ्रमात भाजपाचे पदाधिकारी होते. परंतु उगले यांनी उमेदवारी अर्ज जैसे थे ठेवला. यामध्ये प्रभागात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेची सरशी झाली आणि भाजपाच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. ही माघार भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असताना स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण खेळत वरिष्ठांचे निर्णय धाब्यावर बसविल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.याप्रकरणी भाजपाकडून महापौर राजेंद्र देवळेकरांना लक्ष केले जात आहे. देवळेकरांनी मात्र पक्षाचे जे काही निर्णय घ्यायचे असतात ते पदाधिकारी घेत असतात, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयाला परवानगी मिळविण्यामध्ये मी व्यस्त होतो.संबंधित प्रभागात आमचे संख्याबळ जास्त असून त्या निर्णयाबाबत मला काहीही माहिती नाही. यासंदर्भात योग्य माहिती पक्षाचे गटनेतेच देऊ शकतील, असे सांगत आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.वरिष्ठांच्या आदेशाला स्थानिकांची तिलांजलीप्रभाग समित्या प्रत्येकी पाच वाटून घ्यायच्या ठरल्या होत्या. तसे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून आले होते. परंतु शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याला तिलांजली दिल्याचे प्रभाग समितीच्या निवडणुकीत पाहावयास मिळाले. यामुळे भाजपामध्ये नाराजी आहे ही वस्तुस्थिती आहे.महापौर राजेंद्र देवळेकरांनी काही लोकांना खुश करण्यासाठी आपल्या मर्जीप्रमाणे राजकारण केले आहे. आता येत्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम्हाला सावध भूमिकेत राहणे गरजेचे आहे, असे मत भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी ‘लोकमत’कडे मांडले.‘वरिष्ठांच्या आदेशानुसार होणार कृती’महापौरपदाची निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार आहे. यंदाचे पद भाजपाच्या वाट्याला जाणार असले तरी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचे जे आदेश येतील, त्याप्रमाणे कृती होईल, असे मत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मांडले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा