शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

भाजपा शिवसेनेत का रे दुरावा..!

By admin | Updated: November 26, 2015 01:45 IST

राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली.

भिवंडी: राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली. केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना टोले हाणताना विरोधाने शहराचा विकास होत नाही, असे उद्गार काढले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वंजारपट्टीनाका येथे बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि राजीव गांधी चौक ते कल्याण रोड, साईबाबा मंदिरापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजपा व शिवसेनेत झालेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षात निर्माण झालेली कटुता कमी झालेली नाही.या कार्यक्रमाबाबत महापालिका प्रशासनास विश्वासात न घेतल्याचा ठपका महापौर तुषार चौधरी यांनी ठेवला व कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभाष माने तसेच आमदार रुपेश म्हात्रे यांनी ‘हा उद्घाटनाचा कार्यक्रम शासकीय नसून भारतीय जनता पार्टीचा आहे असा शेरा मारला आहे.’ स्थायी समिती सभापती प्रशांत लाड यांनी ‘शहरात तीन एमएमआरडीए सदस्य असतांना एकालाही या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली नसल्या बद्दल खंत व्यक्त केली.’ उप महापौर अहमद सिद्दिकी, काँग्रेसचे गट नेते जावेद दळवी व मनोज म्हात्रे यांनी ‘वंजार पट्टीनाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव प्रलंबित असतांना हा कार्यक्रम घाईघाईने उरकण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असून त्याचा निषेध करतो.’ असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे होर्डींग्ज शहर भाजपाकडून सर्वत्र लावण्यात आले असले तरी मित्र पक्ष शिवसेनेकडून तसे कोणतेही बॅनर किंवा पोस्टर्स लावलेले गेले नव्हते. तसेच भाजपाकडूनही सेनेच्या कोणत्या नेत्याला आपल्या पोस्टर्सवर स्थान दिले गेले नसल्याने ‘फे्रंडली फायर’चेच चित्र पहायला मिळाले.(प्रतिनिधी)अनिधकृत बांधकामे रोखलीच पाहिजेतमुख्यमंत्री म्हणाले की, अनिधकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकीकडे ग्रामीण भागातून लोकांचे लोंढे शहराकडे येत आहेत आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर त्यातून राहणाऱ्या नागरिकांचे कसे पुनवर्सन करावे हा प्रश्न पडला आहे.पण हे आता थांबले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत अनिधकृत बांधकामे रोखली गेली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.मुख्यमंत्र्यांनी यावेळी भिवंडी शहरासाठी १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या ५६८ कोटींच्या प्रस्तावाचा सुसाध्यता अहवाल पाहून तो केंद्राकडे त्वरीत मान्यतेसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच कांजूर फाटा ते वंजारपट्टी या भिवंडीतील प्रमुख मार्गाचे कॉक्रि टीकरण करण्याच्या सुचना एमएमआरडीएला देण्यात येतील. रस्ते सुधारण्यासाठी आमदार महेश चौगुले यांना बजेटमधून १०कोटी रु पये अतिरिक्त देण्यात येतील, असे सांगितले.राज्याला ६० टक्के सकल उत्पन शहरातून मिळते मात्र शहरीकरणाचे फायदे नागरिकांना मिळत नाहीत. गेल्या काही वर्षांत आपल्या मानसिकतेमुळे आपण शहरांमध्ये योग्य आणि पुरेशा सुविधा देऊ शकलेलो नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राधान्यक्र म ठरविला आहे. पिण्याच्या पाण्याचे नेटवर्क सुधारून पाण्याचे समन्यायी वाटप, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन, रोजगार या आघाड्यांवर आम्ही शहरांचा विकास करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज शहरातील मैला आणि सांडपाणी हा नदी-नाले- ओढे यांच्यात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे स्त्रोत पुन्हा शुध्द करावे लागतील. २०१७ पर्यंत राज्यातील सर्व शहरे आणि गावे हागणदारीमुक्त झालीच पाहिजे असे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.एकूण ७७५ मीटर लांबीच्या वंजारपट्टी पुलाला नाशिक हायवे आणि दुसरीकडे शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. यामुळे नाशिक आणि वाडाकडे जाणारी वाहतूक सुलभतेने होणार असून या भागातील उद्योग व्यवसायांना देखील याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण कमी होईल.