शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शिवसेनेत का रे दुरावा..!

By admin | Updated: November 26, 2015 01:45 IST

राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली.

भिवंडी: राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली. केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना टोले हाणताना विरोधाने शहराचा विकास होत नाही, असे उद्गार काढले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वंजारपट्टीनाका येथे बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि राजीव गांधी चौक ते कल्याण रोड, साईबाबा मंदिरापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजपा व शिवसेनेत झालेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षात निर्माण झालेली कटुता कमी झालेली नाही.या कार्यक्रमाबाबत महापालिका प्रशासनास विश्वासात न घेतल्याचा ठपका महापौर तुषार चौधरी यांनी ठेवला व कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभाष माने तसेच आमदार रुपेश म्हात्रे यांनी ‘हा उद्घाटनाचा कार्यक्रम शासकीय नसून भारतीय जनता पार्टीचा आहे असा शेरा मारला आहे.’ स्थायी समिती सभापती प्रशांत लाड यांनी ‘शहरात तीन एमएमआरडीए सदस्य असतांना एकालाही या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली नसल्या बद्दल खंत व्यक्त केली.’ उप महापौर अहमद सिद्दिकी, काँग्रेसचे गट नेते जावेद दळवी व मनोज म्हात्रे यांनी ‘वंजार पट्टीनाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव प्रलंबित असतांना हा कार्यक्रम घाईघाईने उरकण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असून त्याचा निषेध करतो.’ असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे होर्डींग्ज शहर भाजपाकडून सर्वत्र लावण्यात आले असले तरी मित्र पक्ष शिवसेनेकडून तसे कोणतेही बॅनर किंवा पोस्टर्स लावलेले गेले नव्हते. तसेच भाजपाकडूनही सेनेच्या कोणत्या नेत्याला आपल्या पोस्टर्सवर स्थान दिले गेले नसल्याने ‘फे्रंडली फायर’चेच चित्र पहायला मिळाले.(प्रतिनिधी)अनिधकृत बांधकामे रोखलीच पाहिजेतमुख्यमंत्री म्हणाले की, अनिधकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकीकडे ग्रामीण भागातून लोकांचे लोंढे शहराकडे येत आहेत आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर त्यातून राहणाऱ्या नागरिकांचे कसे पुनवर्सन करावे हा प्रश्न पडला आहे.पण हे आता थांबले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत अनिधकृत बांधकामे रोखली गेली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.मुख्यमंत्र्यांनी यावेळी भिवंडी शहरासाठी १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या ५६८ कोटींच्या प्रस्तावाचा सुसाध्यता अहवाल पाहून तो केंद्राकडे त्वरीत मान्यतेसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच कांजूर फाटा ते वंजारपट्टी या भिवंडीतील प्रमुख मार्गाचे कॉक्रि टीकरण करण्याच्या सुचना एमएमआरडीएला देण्यात येतील. रस्ते सुधारण्यासाठी आमदार महेश चौगुले यांना बजेटमधून १०कोटी रु पये अतिरिक्त देण्यात येतील, असे सांगितले.राज्याला ६० टक्के सकल उत्पन शहरातून मिळते मात्र शहरीकरणाचे फायदे नागरिकांना मिळत नाहीत. गेल्या काही वर्षांत आपल्या मानसिकतेमुळे आपण शहरांमध्ये योग्य आणि पुरेशा सुविधा देऊ शकलेलो नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राधान्यक्र म ठरविला आहे. पिण्याच्या पाण्याचे नेटवर्क सुधारून पाण्याचे समन्यायी वाटप, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन, रोजगार या आघाड्यांवर आम्ही शहरांचा विकास करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज शहरातील मैला आणि सांडपाणी हा नदी-नाले- ओढे यांच्यात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे स्त्रोत पुन्हा शुध्द करावे लागतील. २०१७ पर्यंत राज्यातील सर्व शहरे आणि गावे हागणदारीमुक्त झालीच पाहिजे असे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.एकूण ७७५ मीटर लांबीच्या वंजारपट्टी पुलाला नाशिक हायवे आणि दुसरीकडे शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. यामुळे नाशिक आणि वाडाकडे जाणारी वाहतूक सुलभतेने होणार असून या भागातील उद्योग व्यवसायांना देखील याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण कमी होईल.