शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘एकसंध देशासाठी भाजपाला हटवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:07 IST

भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला.

उल्हासनगर : देशाला एकसंध ठेवण्यासाठी भाजपामुक्त देश करा, असे आवाहन पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकत्रित जयंतीनिमित्त कवाडे शहरात आले होते.उल्हासनगर पीआरपी पक्षाच्या वतीने कॅम्प नं.-१, जुना बस स्टॉपजवळ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कवाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या रोखठोक भाषणात मोदी-फडणवीस सरकारवर आसूड ओढले. देशात जातीजातींमध्ये कधी नव्हे एवढा तणाव निर्माण झाला असून नागरिकांची मने कलुषित झाली आहेत. प्रत्येक नागरिक एकमेकांकडे जातीच्या चष्म्यांतून बघू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला. देशाला ज्ञानाचा मार्ग सांगणारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आदींची दिवसाढवळ्या हत्या होऊन अद्याप आरोपी सापडत नाही किंवा त्यांना शोधायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.कोरेगाव-भीमा घटनेतील आरोपी सापडत नाही. मात्र, शांततेत महाराष्ट्र बंद करणाऱ्या ५८ हजार दलित नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरू केली. शेतकरी, कामगार, दलित, मुस्लिम समाजाची मुस्कटदाबी होत असल्याचे ते म्हणाले.