शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

सेनेचा भाजपाला दे धक्का?

By admin | Updated: January 30, 2017 02:02 IST

भाजपाशी यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आणि मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेला टाळी देण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद कल्याण

प्रशांत माने, कल्याणभाजपाशी यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आणि मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेला टाळी देण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही उमटू लागले आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देऊन औकात दाखवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच, अचानकपणे मनसेतील हालचालींनाही वेग आला असून बदलत्या समीकरणांबाबत पक्षात खलबते सुरू आहेत. त्यामुळे सव्वा वर्षासाठी हे पद मनसेलाही दिले जाऊ शकते, असे संकेत देण्यास शिवसेनेच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्याची अंमलबजावणी करू, असे सांगत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळले; तर भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी केडीएमसीतील युती कायम राहील. युती तोडण्याचा निर्णय पुढील निवडणुकीसाठी असल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजपामधील संबंध विकोपाला गेले आहेत. मुंबईतील सभांमध्ये औकात दाखवण्यापासून पाणी पाजण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत संतापाची भावना आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी परस्परांवर चिखलफेक करत उणीदुणी काढली होती. या लढाईत भाजपाच्या जागा वाढल्या खऱ्या, पण शिवसेनेची सत्ता उलथणे, त्यांना शक्य झाले नाही. शिवसेनेलाही बहुमत सिद्ध करण्यासाठी संख्याबळ अपुरे पडल्याने नाइलाजास्तव भाजपाच्या गळ्यात गळे घालून पुन्हा युती करणे भाग पडले. सत्तेतील ही युती केवळ नावाला असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत असून महासभेच्या वेळी या दोन्ही पक्षांमधील मतभेद आणि त्यातून उद्भवणारे तंटे पाहता बहुतांश वेळा भाजपा या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकदा तरी भाजपाला धडा शिकवावा, अशी येथील शिवसैनिकांची भावना आहे. त्यासाठी उपमहापौरपदाच्या निवडणुकीची संधी आयती चालून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.भाजपाचे उपमहापौर विक्रम तरे यांनी वर्षाचा कालावधी संपल्याने पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या गटनेत्यांकडून तो राजीनामा महापौर राजेंद्र देवळेकरांकडे देण्यात आला. तो त्यांनी मंजूर केला. त्यामुळे लवकरच या रिक्त पदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. ती फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.त्यासाठी महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येथे युती कायम ठेवली, तर १० पालिकांच्या निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती तोडावी आणि जे पक्ष सहकार्य करतील, त्यांना संधी द्यावी, असा मतप्रवाह पक्षात आहे.मनसेचा पाठिंबा?सद्य:स्थितीत १२२ जागांपैकी नऊ अपक्षांच्या सहकार्याने शिवसेना ५७, भाजपा ४७, मनसे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, बसपा १ आणि एमआयएम १ असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ६३ संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे मनसेने पाठिंबा दिला, तर शिवसेना उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.