शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गटबाजीतून शिवसेनेला सत्तेवरून खेचण्याचा भाजपाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:01 IST

अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ १५ नोव्हेंबरला संपत असून नव्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्यात चुरस आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ १५ नोव्हेंबरला संपत असून नव्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्यात चुरस आहे. शिवसेनेतील या दोन्ही गटांतील शत्रुत्वाचा लाभ उठवत शिवसेनेची या नगरपालिकेतील सत्ता खालसा करण्याचे मनसुबे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रचले आहेत.अंबरनाथच्या नव्या नगराध्यक्षपदासाठी १५ ते २० नोव्हेंबरच्या काळात निवडणूक होण्याची शक्यता आहे. १० ते १५ दिवसांवर ही निवडणूक आल्याने आता शिवसेनेतील इच्छुकांनी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वाळेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य हे नगरसेवक आहेत. त्यांचे लहान भाऊ राजेंद्र वाळेकर हे शहराचे उपनगराध्यक्ष आहेत, तर त्यांची पत्नी मनीषा वाळेकर या तिसºयांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. लहान मुलगा निखिल हाही नगरसेवक आहे. वाळेकर यांनी गेली अनेक वर्षे शहरप्रमुखपद सांभाळले आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांनी नगराध्यक्षपदही भूषवले आहे. पक्षातील त्यांची निष्ठा आणि शहरात राबवण्यात येणारे विविध उपक्रम यांच्या जोरावर वाळेकर यांनी मनीषा वाळेकर यांना नगराध्यक्ष करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. वारिंगे यांच्या घरातही तीन नगरसेवक आहेत. त्यात स्वत: वारिंगे, त्यांची पत्नी पूनम वारिंगे आणि भावाची पत्नी योगिता यांचा समावेश आहे. वारिंगे यांचे लहान बंधू नितीन हे या आधी नगराध्यक्षपदाचे दावेदार होते. त्यांना नगराध्यक्षपदाचे आश्वासन शिवसेना नेतृत्वाकडून दिले गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नितीन यांची राजकीय कारणास्तव हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर पंढरीनाथ यांनी सूत्रे हाती घेतली. पक्ष संघटनेसोबत प्रामाणिकपणे काम केल्याने नगराध्यक्षपदाची माळ आपल्याच कुटुंबीयांच्या गळ्यात पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेवटी, पक्ष जो निर्णय देईल, त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे वारिंगे यांनी स्पष्ट केले. वारिंगे गटाकडून पूनम यांचे नाव पुढे केले गेले आहे.नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने आता शिवसेना नेतृत्व कोणाला संधी देणार, ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल. वाळेकर आणि वारिंगे यांच्यात राजकीय स्पर्धा असली व दोन्ही गट शिवसेनेतील असले, तरी ज्या गटाला उमेदवारी नाकारली जाईल, त्या नाराज गटाला सोबत घेऊन नगराध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न भाजपातर्फे सुरू आहेत. भाजपा शिवसेनेसोबत पालिकेत सत्तेत असला, तरी सत्तेची गणिते बिघडवण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत.नगराध्यक्षपदासाठी २९ नगरसेवकांची गरज असल्याने हा आकडा गाठण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. शिवसेनेच्या नाराज गटाने ६ ते ९ नगरसेवकांची रसद भाजपाला पुरवली, तर सत्तेची गणिते बदलतील, असा विश्वास भाजपाचे स्थानिक नेते करत आहेत. अंबरनाथमधील सेनेची सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न होत असताना आता शिवसेना कसा सुवर्णमध्ये काढते, ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा