शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

CoronaVirus News : लॉकडाऊन वाढवण्यास भाजपचा विरोध : रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:16 IST

आगामी काळात लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हाच योग्य उपाय आहे, असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

अनिकेत घमंडीडोंबिवली: कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावाला महापालिकेची आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. अत्यंत ढिसाळ पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढवणे योग्य ठरणार नाही. त्याला आमचा ठाम विरोध आहे. पुन्हा लॉकडाऊनमुळे महापालिकेची व सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळेल आणि त्यानंतर आर्थिक गाडा रुळावर आणण्यामध्ये खूप वेळ जाईल. आगामी काळात लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हाच योग्य उपाय आहे, असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.चव्हाण म्हणाले की, प्रशासनातील विशेषत: आरोग्य विभागातील अधिकारी तसेच ज्यांच्याकडे कोविड १९ चे काम दिले आहे ते अधिकारी जबाबदारीने वागत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये रातोरात कोविड सेंटर उभे केले. तसेच डोंबिवली-कल्याणमध्ये का होऊ शकत नाही? क्रीडासंकुलातील २०० बेड्स च्या सेंटरसाठी एवढा वेळ का लागतोय? ठाण्यात हजार खाटांचे रुग्णालय पंधरवड्यात तयार होते तर मग इथे का होत नाही? यासाठी पालकमंत्री शिंदेंनी लक्ष घालणे गरजेचे आहे.कोविडसाठी सहा अधिकारी पाठवले आहेत असे सांगण्यात येते, तर मग ते अधिकारी आहेत कुठे? आम्हाला त्यांची नावेही माहिती नाहीत. त्यांनी कधीही संपर्क साधला नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.>महापालिकेच्या आस्थापना विभागातील ९० रिक्त पदे आतापर्यंत का भरली नाहीत? युतीच्या राज्यामध्ये ती प्रलंबित फाइल तातडीने मंजूर करवून घेतली होती. तसेच आता आरोग्य धोक्यात आले असताना जो निधी सूतिकागृहासाठी चव्हाण यांनी मंजूर करून घेतला होता, तो कोट्यवधींचा निधी ६७ ‘क’प्रमाणे का वापरला जात नाही? त्यातून रुग्णालये अद्ययावत होऊ शकतात. त्याला खोडा कोण घालत आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस