शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लॉकडाऊन वाढवण्यास भाजपचा विरोध : रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:16 IST

आगामी काळात लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हाच योग्य उपाय आहे, असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

अनिकेत घमंडीडोंबिवली: कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावाला महापालिकेची आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. अत्यंत ढिसाळ पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढवणे योग्य ठरणार नाही. त्याला आमचा ठाम विरोध आहे. पुन्हा लॉकडाऊनमुळे महापालिकेची व सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळेल आणि त्यानंतर आर्थिक गाडा रुळावर आणण्यामध्ये खूप वेळ जाईल. आगामी काळात लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हाच योग्य उपाय आहे, असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.चव्हाण म्हणाले की, प्रशासनातील विशेषत: आरोग्य विभागातील अधिकारी तसेच ज्यांच्याकडे कोविड १९ चे काम दिले आहे ते अधिकारी जबाबदारीने वागत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये रातोरात कोविड सेंटर उभे केले. तसेच डोंबिवली-कल्याणमध्ये का होऊ शकत नाही? क्रीडासंकुलातील २०० बेड्स च्या सेंटरसाठी एवढा वेळ का लागतोय? ठाण्यात हजार खाटांचे रुग्णालय पंधरवड्यात तयार होते तर मग इथे का होत नाही? यासाठी पालकमंत्री शिंदेंनी लक्ष घालणे गरजेचे आहे.कोविडसाठी सहा अधिकारी पाठवले आहेत असे सांगण्यात येते, तर मग ते अधिकारी आहेत कुठे? आम्हाला त्यांची नावेही माहिती नाहीत. त्यांनी कधीही संपर्क साधला नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.>महापालिकेच्या आस्थापना विभागातील ९० रिक्त पदे आतापर्यंत का भरली नाहीत? युतीच्या राज्यामध्ये ती प्रलंबित फाइल तातडीने मंजूर करवून घेतली होती. तसेच आता आरोग्य धोक्यात आले असताना जो निधी सूतिकागृहासाठी चव्हाण यांनी मंजूर करून घेतला होता, तो कोट्यवधींचा निधी ६७ ‘क’प्रमाणे का वापरला जात नाही? त्यातून रुग्णालये अद्ययावत होऊ शकतात. त्याला खोडा कोण घालत आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस