शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजपा, ओमी टीममध्ये लक्षवेधीवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 02:25 IST

महासभेत पंचम कलानी यांची पाणीटंचाई व बोअरवेलवरील लक्षवेधी महापौरांनी स्वीकारली नसल्याच्या निषेधार्थ ओमी टीमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. या प्रकाराने ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला असून भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सिंधू भवनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केल्याने वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर : महासभेत पंचम कलानी यांची पाणीटंचाई व बोअरवेलवरील लक्षवेधी महापौरांनी स्वीकारली नसल्याच्या निषेधार्थ ओमी टीमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. या प्रकाराने ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला असून भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सिंधू भवनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केल्याने वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिकेत भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. मात्र तिन्ही पक्षातील वाद चव्हाटयावर येत असल्याने शहर विकासावर परिणाम होत आहे. महासभेपूर्वी ओमी कलानी यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन कबरस्तानासह अन्य विकासात्मक कामावर चर्चा केली. तर दुसऱ्याच दिवशी मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यार् पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह महापौर मीना आयलानी, भाजपा शहराध्यक्ष कुमार आयलानी उपस्थित होते. ओमी टीम-भाजपा व साई पक्षात श्रेयाची लढाई सुरू असून शहराचे हित बाजूला पडल्याची टीका होत आहे.महासभेत एकूण ८ लक्षवेधी चर्चेसाठी आल्या होत्या. त्यापैकी महापौर व पिठासीन अधिकारी मीना आयलानी यांनी भाजपा नगरसेविका मीना सोंडे यांची डम्पिंग ग्राउंडवरील व शिवसेनेचे सुनील सुर्वे यांची दुसरी लक्षवेधी स्वीकारली. तर इतर लक्षवेधी फेटाळल्या. पंचम कलानी यांनी पाणीटंचाई व बोअरवेलबाबतची लक्षवेधी महापौरांकडे दिली होती. मात्र महापौरांनी ती स्वीकारली नाही. शहरात पाणीटंचाई असताना आपली लक्षवेधी का स्वीकारली नाही, याचा जाब कलानी यांनी विचारला. यापेक्षा इतर लक्षवेधी चांगल्या असल्याचे सांगून, तुमच्या लक्षवेधीवरही महासभेत चर्चा करू, असे उत्तर महापौरांनी दिले.पाणीटंचाई असतानाही लक्षवेधी स्वीकारली नसल्याचा राग कलानी यांच्यासह टीमच्या नगरसेवकांना आला. कलानी यांनी नगरसेवक राजेश वधारिया, लक्ष्मी सिंग, जयश्री पाटील, छाया चक्रवर्ती, कविता तोरणे, कविता गायकवाड, रेखा ठाकूर व सरोजनी टेकचंदानी आदींनी सभात्याग केला. शहरातील अर्ध्याअधिक बोअरवेल बंद असून त्यांची दुरूस्ती आधीच्या कंत्राटदाराने करायला हवी होती, असे ओमी टीमचे म्हणणे होते. भाजपाच्या एका नगरसेवकाच्या मुलाने या कामाचे कंत्राट घेतल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्याने एकच खळबळ उडाली.सिंधू भवन वादातसपना गार्डन येथे ४ कोटीच्या निधीतून सिंधू भवनाचे काम सुरू असून निविदेप्रमाणे भवनाचे काम सुरू नसल्याचा आरोप भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला. त्यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करून, सिंधू भवनाच्या कामात ओमी टीमच्या पदाधिकाºयाच्या जवळच्या कंत्राटदाराचा सहभाग असल्याचे त्यांनी सोशल मिडीयावर सांगून टाकले. याप्रकाराने भाजपा व ओमी टीममधील वाद चव्हाटयावर आला.भाजपातील गट एकत्र येण्याची शक्यता?शहर भाजपात दोन गट असून विधानसभा निवडणुकीत पक्षातील एका गटाच्या विरोधी कामामुळे कुमार आयलानी यांचा पराभव झाल्याचे बोलले जात होते.तसेच ओमी कलानी यांना भाजपात आणण्यासाठी याच निष्ठांवत गटाचा हात होता. मात्र पक्षातील दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ओमी टीम बाजूला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकाराने ओमी टीमला जाणारे महापौरपदासह आमदार पदावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर