शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

भाजपाचे नेते फक्त निवडणुकीत, एकनाथ शिंदे यांचा टोला, उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 04:25 IST

शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले.

ठाणे : शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले. इतर पक्षांचे नेते केवळ निवडणुकांपुरते लोकांना दिसतात. शिवसेना हा एकमेव पक्ष लोकांच्या सुखदु:खाशी निगडित असून लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता लगावला.ठाणे पालिका आणि पाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती विजय संपादन केला. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते. ठाणे महापालिकेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळाले. दोन्ही ठिकाणी भाजपाशी संघर्ष करावा लागला. भाजपाला तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता, असा सवाल केला असता शिंदे म्हणाले की, कोणाला इशारा देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवली नाही. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांचाही शिवसेना विकास करेल, असा विश्वास लोकांनी शिवसेनेवर दाखवला आहे. त्या विश्वासाला शिवसेना पात्र ठरेल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जो विश्वास लोकांनी दाखवला, तो सार्थ करून दाखवणार.देशभर भाजपाची घोडदौड सुरू असताना ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मिळालेल्या यशाचे रहस्य काय, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघेसाहेबांनी ठाण्याच्या कानाकोपºयांत खूप काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांवर इथल्या जनतेने प्रेम केले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांत चांगली कामे केली. शिवसेना वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामे करत असते. निवडणुकीनंतरही उद्धव आणि आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत असतात. हे ठाणे जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे. इतर पक्षांचे नेते निवडणुकीपुरते लोकांसमोर येतात. पण, शिवसेना सतत लोकांसोबत आहे. भाजपाला रोखण्यासाठी यापुढे शिवसेनेने राष्टÑवादी, मनसे अशा पक्षांना सोबत घेणे गरजेचे वाटते का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, आम्हाला कोणाला रोखण्याचे काम करायचे नाही. विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवायची आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे महापालिकेत कधीही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही, ते तुमच्या कार्यकाळात मिळाले. जिल्हा परिषदेतही एकहाती सत्ता आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत? मध्यंतरी, तुम्ही उपमुख्यमंत्री होणार, अशीही चर्चा होती... या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री वगैरे काही नाही. कोणाची नियुक्ती करायची, याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांचा आहे. मी फक्त त्यांच्या आदेशाचे पालन करणारा सामान्य कार्यकर्ता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे