शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपाचे नेते फक्त निवडणुकीत, एकनाथ शिंदे यांचा टोला, उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 04:25 IST

शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले.

ठाणे : शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले. इतर पक्षांचे नेते केवळ निवडणुकांपुरते लोकांना दिसतात. शिवसेना हा एकमेव पक्ष लोकांच्या सुखदु:खाशी निगडित असून लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता लगावला.ठाणे पालिका आणि पाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती विजय संपादन केला. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते. ठाणे महापालिकेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळाले. दोन्ही ठिकाणी भाजपाशी संघर्ष करावा लागला. भाजपाला तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता, असा सवाल केला असता शिंदे म्हणाले की, कोणाला इशारा देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवली नाही. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांचाही शिवसेना विकास करेल, असा विश्वास लोकांनी शिवसेनेवर दाखवला आहे. त्या विश्वासाला शिवसेना पात्र ठरेल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जो विश्वास लोकांनी दाखवला, तो सार्थ करून दाखवणार.देशभर भाजपाची घोडदौड सुरू असताना ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मिळालेल्या यशाचे रहस्य काय, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघेसाहेबांनी ठाण्याच्या कानाकोपºयांत खूप काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांवर इथल्या जनतेने प्रेम केले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांत चांगली कामे केली. शिवसेना वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामे करत असते. निवडणुकीनंतरही उद्धव आणि आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत असतात. हे ठाणे जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे. इतर पक्षांचे नेते निवडणुकीपुरते लोकांसमोर येतात. पण, शिवसेना सतत लोकांसोबत आहे. भाजपाला रोखण्यासाठी यापुढे शिवसेनेने राष्टÑवादी, मनसे अशा पक्षांना सोबत घेणे गरजेचे वाटते का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, आम्हाला कोणाला रोखण्याचे काम करायचे नाही. विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवायची आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे महापालिकेत कधीही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही, ते तुमच्या कार्यकाळात मिळाले. जिल्हा परिषदेतही एकहाती सत्ता आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत? मध्यंतरी, तुम्ही उपमुख्यमंत्री होणार, अशीही चर्चा होती... या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री वगैरे काही नाही. कोणाची नियुक्ती करायची, याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांचा आहे. मी फक्त त्यांच्या आदेशाचे पालन करणारा सामान्य कार्यकर्ता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे