शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाजपाचे नेते फक्त निवडणुकीत, एकनाथ शिंदे यांचा टोला, उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 04:25 IST

शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले.

ठाणे : शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’कडे काढले. इतर पक्षांचे नेते केवळ निवडणुकांपुरते लोकांना दिसतात. शिवसेना हा एकमेव पक्ष लोकांच्या सुखदु:खाशी निगडित असून लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता लगावला.ठाणे पालिका आणि पाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती विजय संपादन केला. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते. ठाणे महापालिकेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळाले. दोन्ही ठिकाणी भाजपाशी संघर्ष करावा लागला. भाजपाला तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता, असा सवाल केला असता शिंदे म्हणाले की, कोणाला इशारा देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवली नाही. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांचाही शिवसेना विकास करेल, असा विश्वास लोकांनी शिवसेनेवर दाखवला आहे. त्या विश्वासाला शिवसेना पात्र ठरेल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जो विश्वास लोकांनी दाखवला, तो सार्थ करून दाखवणार.देशभर भाजपाची घोडदौड सुरू असताना ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मिळालेल्या यशाचे रहस्य काय, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघेसाहेबांनी ठाण्याच्या कानाकोपºयांत खूप काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांवर इथल्या जनतेने प्रेम केले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांत चांगली कामे केली. शिवसेना वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामे करत असते. निवडणुकीनंतरही उद्धव आणि आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत असतात. हे ठाणे जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे. इतर पक्षांचे नेते निवडणुकीपुरते लोकांसमोर येतात. पण, शिवसेना सतत लोकांसोबत आहे. भाजपाला रोखण्यासाठी यापुढे शिवसेनेने राष्टÑवादी, मनसे अशा पक्षांना सोबत घेणे गरजेचे वाटते का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, आम्हाला कोणाला रोखण्याचे काम करायचे नाही. विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवायची आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे महापालिकेत कधीही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही, ते तुमच्या कार्यकाळात मिळाले. जिल्हा परिषदेतही एकहाती सत्ता आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत? मध्यंतरी, तुम्ही उपमुख्यमंत्री होणार, अशीही चर्चा होती... या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री वगैरे काही नाही. कोणाची नियुक्ती करायची, याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांचा आहे. मी फक्त त्यांच्या आदेशाचे पालन करणारा सामान्य कार्यकर्ता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे