शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

भाजपा-कोणार्क एकत्रच

By admin | Updated: May 9, 2017 00:58 IST

संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क अनगाव : संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले. भाजपाचे स्थानिक पातळीवर नवे आणि जुने गट असले, तरी पक्षाच्या उमेदवारीवर स्वाभाविकपणे कपिल पाटील गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. शिवसेनेला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपाचे सर्वाधिक प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवारीनंतर स्पष्ट झाले. भाजपाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेला प्रसंगी इतर पक्ष मदत करू शकतात. त्याचे प्रत्यंतर मागील सत्ताकाळात आले होते. त्यामुळेच भाजपाने स्वत: ६० जागा लढवताना २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. अर्थात सर्व जागा एकाही पक्षाने लढवलेल्या नाहीत आणि भाजपाकडेही सर्व जागा लढवण्याइतके उमेदवार, कार्यकर्ते नसल्याने कोणार्कशी आघाडी करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच पक्षातील नाराजी वाढत असतानाही पक्षाने हा समझोता स्वीकारला.या पालिकेत सर्वात तगडे आव्हान देऊ शकणारा पक्ष काँग्रेस असला, तरी त्या पक्षाची संघटना विसविशीत झाल्याने स्वबळावर लढण्याचा त्या पक्षाचा निर्णय कितपत लाभदायक ठरतो, ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.भाजपात निष्ठावंत आणि नवभाजपावादी असे दोन गट उघडउघड दिसत असले, तरी पक्षाने सारी सूत्रे खासदार कपिल पाटील यांच्या हाती सोपवल्याने निष्ठावंतानी सुरूवातीला श्रेष्ठींच्या दरबारात गाऱ्हाणे घातले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यातील काही जणांनी उमेदवारीसाठी स्थानिक नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा पर्याय निवडला.शिवसेनेतील उमेदवारीबाबतही काही वाद होते. काहींनी बंडाचा निर्णय घेतला होता. पण जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी नाराजांची समजूत घालण्यात यश मिळवल्याने त्या पक्षातील बंड बऱ्यापैकी शमले. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या शेवटच्या क्षणी ‘वरून’ झालेल्या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे आता स्थानिक नेतेच सांगत आहेत. या स्थानिक नेत्यांचाच सुरूवातीला आघाडीला विरोध होता. पण आता मतविभाजन टळून दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असा दावा त्या पक्षांचे नेते करीत आहेत.याचदरम्यान, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटच्या उमेदवारांनी पालिकेतील निवडणूक विभागाच्या मनमानीविरोधात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे तक्रार केली आहे. अर्ज भरण्यासाठी गेलेल्या आमच्या उमेदवारांना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवून ठेवले. पण नंतर त्यांचे अर्ज घेतले नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्यावर सहारिया यांनी ‘लक्ष घालतो’ असे आश्वासन या पक्षाच्या नेत्यांना दिले आहे.