शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-कोणार्क एकत्रच

By admin | Updated: May 9, 2017 00:58 IST

संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क अनगाव : संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले. भाजपाचे स्थानिक पातळीवर नवे आणि जुने गट असले, तरी पक्षाच्या उमेदवारीवर स्वाभाविकपणे कपिल पाटील गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. शिवसेनेला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपाचे सर्वाधिक प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवारीनंतर स्पष्ट झाले. भाजपाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेला प्रसंगी इतर पक्ष मदत करू शकतात. त्याचे प्रत्यंतर मागील सत्ताकाळात आले होते. त्यामुळेच भाजपाने स्वत: ६० जागा लढवताना २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. अर्थात सर्व जागा एकाही पक्षाने लढवलेल्या नाहीत आणि भाजपाकडेही सर्व जागा लढवण्याइतके उमेदवार, कार्यकर्ते नसल्याने कोणार्कशी आघाडी करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच पक्षातील नाराजी वाढत असतानाही पक्षाने हा समझोता स्वीकारला.या पालिकेत सर्वात तगडे आव्हान देऊ शकणारा पक्ष काँग्रेस असला, तरी त्या पक्षाची संघटना विसविशीत झाल्याने स्वबळावर लढण्याचा त्या पक्षाचा निर्णय कितपत लाभदायक ठरतो, ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.भाजपात निष्ठावंत आणि नवभाजपावादी असे दोन गट उघडउघड दिसत असले, तरी पक्षाने सारी सूत्रे खासदार कपिल पाटील यांच्या हाती सोपवल्याने निष्ठावंतानी सुरूवातीला श्रेष्ठींच्या दरबारात गाऱ्हाणे घातले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यातील काही जणांनी उमेदवारीसाठी स्थानिक नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा पर्याय निवडला.शिवसेनेतील उमेदवारीबाबतही काही वाद होते. काहींनी बंडाचा निर्णय घेतला होता. पण जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी नाराजांची समजूत घालण्यात यश मिळवल्याने त्या पक्षातील बंड बऱ्यापैकी शमले. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या शेवटच्या क्षणी ‘वरून’ झालेल्या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे आता स्थानिक नेतेच सांगत आहेत. या स्थानिक नेत्यांचाच सुरूवातीला आघाडीला विरोध होता. पण आता मतविभाजन टळून दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असा दावा त्या पक्षांचे नेते करीत आहेत.याचदरम्यान, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटच्या उमेदवारांनी पालिकेतील निवडणूक विभागाच्या मनमानीविरोधात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे तक्रार केली आहे. अर्ज भरण्यासाठी गेलेल्या आमच्या उमेदवारांना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवून ठेवले. पण नंतर त्यांचे अर्ज घेतले नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्यावर सहारिया यांनी ‘लक्ष घालतो’ असे आश्वासन या पक्षाच्या नेत्यांना दिले आहे.