शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-कोणार्क एकत्रच

By admin | Updated: May 9, 2017 00:58 IST

संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क अनगाव : संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले. भाजपाचे स्थानिक पातळीवर नवे आणि जुने गट असले, तरी पक्षाच्या उमेदवारीवर स्वाभाविकपणे कपिल पाटील गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. शिवसेनेला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपाचे सर्वाधिक प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवारीनंतर स्पष्ट झाले. भाजपाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेला प्रसंगी इतर पक्ष मदत करू शकतात. त्याचे प्रत्यंतर मागील सत्ताकाळात आले होते. त्यामुळेच भाजपाने स्वत: ६० जागा लढवताना २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. अर्थात सर्व जागा एकाही पक्षाने लढवलेल्या नाहीत आणि भाजपाकडेही सर्व जागा लढवण्याइतके उमेदवार, कार्यकर्ते नसल्याने कोणार्कशी आघाडी करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच पक्षातील नाराजी वाढत असतानाही पक्षाने हा समझोता स्वीकारला.या पालिकेत सर्वात तगडे आव्हान देऊ शकणारा पक्ष काँग्रेस असला, तरी त्या पक्षाची संघटना विसविशीत झाल्याने स्वबळावर लढण्याचा त्या पक्षाचा निर्णय कितपत लाभदायक ठरतो, ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.भाजपात निष्ठावंत आणि नवभाजपावादी असे दोन गट उघडउघड दिसत असले, तरी पक्षाने सारी सूत्रे खासदार कपिल पाटील यांच्या हाती सोपवल्याने निष्ठावंतानी सुरूवातीला श्रेष्ठींच्या दरबारात गाऱ्हाणे घातले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यातील काही जणांनी उमेदवारीसाठी स्थानिक नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा पर्याय निवडला.शिवसेनेतील उमेदवारीबाबतही काही वाद होते. काहींनी बंडाचा निर्णय घेतला होता. पण जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी नाराजांची समजूत घालण्यात यश मिळवल्याने त्या पक्षातील बंड बऱ्यापैकी शमले. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या शेवटच्या क्षणी ‘वरून’ झालेल्या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे आता स्थानिक नेतेच सांगत आहेत. या स्थानिक नेत्यांचाच सुरूवातीला आघाडीला विरोध होता. पण आता मतविभाजन टळून दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असा दावा त्या पक्षांचे नेते करीत आहेत.याचदरम्यान, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटच्या उमेदवारांनी पालिकेतील निवडणूक विभागाच्या मनमानीविरोधात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे तक्रार केली आहे. अर्ज भरण्यासाठी गेलेल्या आमच्या उमेदवारांना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवून ठेवले. पण नंतर त्यांचे अर्ज घेतले नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्यावर सहारिया यांनी ‘लक्ष घालतो’ असे आश्वासन या पक्षाच्या नेत्यांना दिले आहे.