शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भिवंडीत भाजपचाच बोलबाला ; तर काँग्रेस - राष्ट्रवादीची पाटी कोरी

By नितीन पंडित | Updated: December 20, 2022 16:31 IST

भाजप ८ , शिंदे गट ४ तर ठाकरे गटाला अवघ्या एक जागेवर समाधान

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.१४ पैकी आठ जागांवर भाजपाचे सरपंच निवडून आले असून चार ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाने बाजी मारली आहे.तर ठाकरे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले असून या ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एकही जागा मिळवता आली नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली आहे. 

कामतघर येथील वऱ्हाळ देवी मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार अधिक पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरवात झाली.या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपा विरोधात शिंदे गट असेच समीकरण होते.त्यामुळे या ग्राम पंचायती निवडणुका केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती.विशेष म्हणजे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्वाची असलेल्या कोनग्रामपंचयात निवडणुकीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केल्याने पाटील यांनी कोनगावावर पुन्हा आपली पकड घट्ट केली असून या ठिकाणी भाजपच्या रेखा सदाशिव पाटील या विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावर पसरले आहे.तर भाजपमधून बंडखोरी करीत शिंदे गटाशी हात मिळवणी केलेल्या डॉ रुपाली अमोल कराळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.त्यामुळे भाजप व शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कोनग्रामपंचायत निवडणुकीत अखेर भाजपने आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे तर कशेळी ग्राम पंचायतीवर मागील वीस वर्षांपासून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली असून त्यांची पत्नी वैशाली देवानंद थळे या विजयी झाल्या आहेत.

कोन ग्राम पंचायतीबरोबरच तालुक्यातील कोपर,कारीवली,कांबे,दुगाड,आमने,आवळे-विश्वगड,सापे अशा एकूण आठ ग्राम पंचायतींवर भाजप विजयी झाली असून कोपर हेमंत घरत,कारीवली संजीव नाईक,कांबे भारती भोईर, दुगाड प्रेम प्रकाश मुकणे,आमणे शिशुपाल केणे, आवळा-विश्वगड प्रीती पवन देसले,सापे गोरख सुतारअसे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.तर अकलोली ग्राम पंचयातीवर अपक्ष स्थानिक ग्राम समितीने यश मिळविला असून संचित सचिन म्हसकर या विजयी झाल्या आहेत.तर कशेळी,खानिवली,कासने,खालींग या चार ग्राम पंचायतींवर शिंदे गट विजयी झाला आहे.कशेळी ग्रामपंचायतीवर वैशाली देवानंद थळे,खानिवली निकिता राहुल दळवी,कासणे भगवान भोईर व खालींग राजाराम शेलार असे शिंदे गटाचे चार सरपंच विजयी झाले आहेत.तर उद्धव ठाकरे गटाला कुहे या एकमात्र ग्राम पंचायतीवर विजय मिळविता आला असून अजय आहेडा हे विजयी झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBhiwandiभिवंडी