शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिवंडीत भाजपचाच बोलबाला ; तर काँग्रेस - राष्ट्रवादीची पाटी कोरी

By नितीन पंडित | Updated: December 20, 2022 16:31 IST

भाजप ८ , शिंदे गट ४ तर ठाकरे गटाला अवघ्या एक जागेवर समाधान

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.१४ पैकी आठ जागांवर भाजपाचे सरपंच निवडून आले असून चार ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाने बाजी मारली आहे.तर ठाकरे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले असून या ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एकही जागा मिळवता आली नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली आहे. 

कामतघर येथील वऱ्हाळ देवी मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार अधिक पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरवात झाली.या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपा विरोधात शिंदे गट असेच समीकरण होते.त्यामुळे या ग्राम पंचायती निवडणुका केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती.विशेष म्हणजे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्वाची असलेल्या कोनग्रामपंचयात निवडणुकीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केल्याने पाटील यांनी कोनगावावर पुन्हा आपली पकड घट्ट केली असून या ठिकाणी भाजपच्या रेखा सदाशिव पाटील या विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावर पसरले आहे.तर भाजपमधून बंडखोरी करीत शिंदे गटाशी हात मिळवणी केलेल्या डॉ रुपाली अमोल कराळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.त्यामुळे भाजप व शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कोनग्रामपंचायत निवडणुकीत अखेर भाजपने आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे तर कशेळी ग्राम पंचायतीवर मागील वीस वर्षांपासून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली असून त्यांची पत्नी वैशाली देवानंद थळे या विजयी झाल्या आहेत.

कोन ग्राम पंचायतीबरोबरच तालुक्यातील कोपर,कारीवली,कांबे,दुगाड,आमने,आवळे-विश्वगड,सापे अशा एकूण आठ ग्राम पंचायतींवर भाजप विजयी झाली असून कोपर हेमंत घरत,कारीवली संजीव नाईक,कांबे भारती भोईर, दुगाड प्रेम प्रकाश मुकणे,आमणे शिशुपाल केणे, आवळा-विश्वगड प्रीती पवन देसले,सापे गोरख सुतारअसे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.तर अकलोली ग्राम पंचयातीवर अपक्ष स्थानिक ग्राम समितीने यश मिळविला असून संचित सचिन म्हसकर या विजयी झाल्या आहेत.तर कशेळी,खानिवली,कासने,खालींग या चार ग्राम पंचायतींवर शिंदे गट विजयी झाला आहे.कशेळी ग्रामपंचायतीवर वैशाली देवानंद थळे,खानिवली निकिता राहुल दळवी,कासणे भगवान भोईर व खालींग राजाराम शेलार असे शिंदे गटाचे चार सरपंच विजयी झाले आहेत.तर उद्धव ठाकरे गटाला कुहे या एकमात्र ग्राम पंचायतीवर विजय मिळविता आला असून अजय आहेडा हे विजयी झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBhiwandiभिवंडी