शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या जागावाटपातून भाजपाला डावलले

By admin | Updated: October 12, 2016 04:40 IST

भाजपाने ओमी टीमला प्रवेश देत शिवसेनेला धक्का देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात नेल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरून

उल्हासनगर : भाजपाने ओमी टीमला प्रवेश देत शिवसेनेला धक्का देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात नेल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरून स्वतंत्र युतीच्या जागावाटपासाठी बुधवारी गुप्त बैठक बोलावली आहे. युती तुटल्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेनेने या बैठकीचे आमंत्रण भाजपाला दिलेले नाही. त्याचवेळी भाजपाच्या नेत्यांनीही शिवसेनेशी युतीबाबत पक्षानेही कोणताच आदेश दिलेला नाही, असे सांगत बैठकीबाबत कानावर हात ठेवले. भाजपाच्या कोट्यातून केंद्रात मंत्रिपद मिळवल्यानंतर शिवसेनेशी चर्चा करत असल्याबाबत विचारता रिपब्लिकन नेत्यांनी ही स्थानिक चर्चा असल्याचे सांगितले आणि आठवले देतील तो निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना-रिपाइं नेत्यांच्या तोरणा विश्रामगृहावर होणाऱ्या बैठकीत पालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होणार असून खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, चंद्रकांत बोडारे, शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइंचे नेते बी. बी. मोरे, शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, नाना बागुल, अरूण कांबळे आदी नेते बैठकीला उपस्थित राहतील. भाजपाकडून विश्वासघात -महायुतीतील शिवसेना आणि रिपाइंना विश्वासात न घेता भाजपाने ओमी कलानी टीमसोबत निवडणुकीची बोलणी आणि प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. ओमी टीमला प्रवेश दिल्यास युती तोडण्याचे स्पष्ट संकेत आम्ही भाजपाला दिले आहेत. त्यामुळेच बुधवारच्या बैठकीतून भाजपाला डावलण्यात आले असून शिवसेना व रिपाइं यांच्यातच निवडणुकीविषयाची बैठक तोरणा विश्रामगृहावर होणार आहे. - राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख.युतीबाबत आदेश नाही!-शिवसेना-भाजपा आणि रिपाइं युतीबाबत पक्षाचा कोणताच आदेश नाही. त्यामुळे युतीबाबतची चर्चा निष्फळ आहे. पक्ष आदेशानंतर मित्रपक्ष रिपाइंसह शिवसेनेशी निवडणुकीबाबत बोलणी करू. त्यापूर्वी तोरणावर होणाऱ्या बैठकीला जाण्यात अर्थ नाही. पक्ष वाढविण्यासाठी आम्ही मंगळवारी साई व मनसेचे नगरसेवक जयश्री पाटील व रवींद्र दवणे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. - कुमार आयलानी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष.ताकद दाखवण्यासाठी चर्चा-महापालिका निवडणुकीत रिपाइंची ताकद वाढविण्यासाठी स्थानिक नेत्यांना दिलेल्या अधिकारानुसारच शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू आहे. पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचा आदेश अंतिम असून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. आहे. मात्र तेही स्थानिक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतील, असा विश्वास आहे. - भगवान भालेराव, रिपाइं शहर जिल्हाध्यक्ष.