शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजपा झुकली; साई पक्षाच्या मागण्या मान्य, रस्ते विकासासाठी १५३ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:29 IST

निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

उल्हासनगर : निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने साई पक्षाच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया साई पक्षाचे नेते आणि उपमहापौर जीवन इदनानी यांनी दिली. कामांची प्रगती पाहून सत्तेतून बाहेर पडण्यावर मार्च अखेरनंतर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. या बैठकीमुळे उल्हासनगरचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली.उल्हासनगरच्या ठप्प विकासकामांवरून साई पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत भाजपाचे प्राण कंठाशी आणले होते. पालिकेवरील सत्ता जाऊ नये म्हणून भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी इदनानी यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला आणि विकासकामांवर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिका आयुक्त राजेद्र निंबाळकर, महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, भाजपचे शहर अध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेता जमनुदास पुरस्वानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, ओमी टीमचे प्रमुख ओमी कालानी, प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते. त्यात १५३ कोटी खर्चून नऊ रस्त्यांचा विकास, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड या रेल्वे स्टेशनचा विकास, अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचा विकास, तेथील बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर