शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

अखेर भाजपा झुकली; साई पक्षाच्या मागण्या मान्य, रस्ते विकासासाठी १५३ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:29 IST

निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

उल्हासनगर : निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने साई पक्षाच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया साई पक्षाचे नेते आणि उपमहापौर जीवन इदनानी यांनी दिली. कामांची प्रगती पाहून सत्तेतून बाहेर पडण्यावर मार्च अखेरनंतर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. या बैठकीमुळे उल्हासनगरचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली.उल्हासनगरच्या ठप्प विकासकामांवरून साई पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत भाजपाचे प्राण कंठाशी आणले होते. पालिकेवरील सत्ता जाऊ नये म्हणून भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी इदनानी यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला आणि विकासकामांवर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिका आयुक्त राजेद्र निंबाळकर, महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, भाजपचे शहर अध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेता जमनुदास पुरस्वानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, ओमी टीमचे प्रमुख ओमी कालानी, प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते. त्यात १५३ कोटी खर्चून नऊ रस्त्यांचा विकास, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड या रेल्वे स्टेशनचा विकास, अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचा विकास, तेथील बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर