शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

"भांडण लावल्याशिवाय भाजपला राजकारण जमत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:33 IST

उच्च न्यायालयाने पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो म्हणून तत्कालीन भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण आरक्षणाचा विषय पुढे ढकलत होते.

भिवंडी : शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणाबाबत भाजप सरकारच्या काळात उच्च न्यायालयाने पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो म्हणून तत्कालीन भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण आरक्षणाचा विषय पुढे ढकलत होते. मुस्लिम आरक्षणाबाबत भाजप नेते विनाकारण दिशाभूल करत असून भाजपला भांडण लावल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी टीका अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी येथे केली.भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने भरवण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रतिभा पाटील, उपायुक्त दीपक कुरळेकर, पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेचे संस्थाध्यक्ष विजय जाधव, कार्याध्यक्ष बी.डी. जाधव, बीएनएन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, बीएनएन महाविद्यालय कौशल्य विभागप्रमुख विनोद भानुशाली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे, महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणामुळे राज्यातील एससी, एसटी, मराठा, ओबीसी यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही.उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के मुस्लिम आरक्षण महाविकास आघाडी सरकार कायदेशीर मार्गाने लागू करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. जवळपास ५०० हून अधिक बेरोजगारांना मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर कौशल्य विभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारचा असून या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. बेरोजगारी हटवण्यासाठी राज्यातील विविध व्यवसायाभिमुख केंद्रांना प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.कौशल्य विकास प्रशिक्षणही आता काळानुसार अत्याधुनिक पद्धतीने देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून कुशल आणि प्रशिक्षित युवक तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोजगारासंदर्भात मोठी घोषणा व योजना जाहीर करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. या मेळाव्यात ६५० युवकांनी सहभाग घेतला असून ४० हून अधिक नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिक