शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

उड्डाणपुलाचे भाजपकडून लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:14 IST

भिवंडीमध्ये श्रेयवादाची लढाई। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी आॅनलाइन उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केलेल्या कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल पूर्ण झाला असताना उद्घाटनावरून शिवसेना-भाजप या पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.सोमवारी या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आॅनलाइन लोकार्पण करणार होते; मात्र शनिवारी भाजप आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी उद्घाटन करीत वाहतुकीसाठी पूल खुला केला. शहरातील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्ही मागणी करीत असताना फडणवीस यांचे योगदान मोठे असून त्यांनी या उड्डाणपुलास मंजुरी देऊन भूमिपूजन केले होते. असे असताना स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते आॅनलाइन करणार आहे. कोरोनाकाळात बाहेर न पडलेले मुख्यमंत्री यांना दीड महिन्यापासून तयार असलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना लोकार्पणासाठीही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. महाविकास आघाडी सरकार जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप आमदार चौघुले यांनी केला आहे.दरम्यान, हा पूल सुरुवातीपासूनच श्रेयवादाने वादग्रस्त ठरला असून, याच्या भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करताच त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी या पुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी भाजपने या पुलाचे लोकार्पण करून या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.खरे श्रेय फडणवीसयांना - संतोष शेट्टीफडणवीस मुख्यमंत्री असताना प्रथमच भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले; परंतु त्यातील सुरू असलेल्या कामांना शिवसेना सरकार स्थगिती देऊन भिवंडीच्या नागरिकांवर अन्याय करीत असल्याने या उड्डाणपुलाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे असल्याने भाजपने लोकार्पण केले, अशी प्रतिक्रिया शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.