शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचे भाजपकडून लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:14 IST

भिवंडीमध्ये श्रेयवादाची लढाई। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी आॅनलाइन उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केलेल्या कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल पूर्ण झाला असताना उद्घाटनावरून शिवसेना-भाजप या पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.सोमवारी या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आॅनलाइन लोकार्पण करणार होते; मात्र शनिवारी भाजप आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी उद्घाटन करीत वाहतुकीसाठी पूल खुला केला. शहरातील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्ही मागणी करीत असताना फडणवीस यांचे योगदान मोठे असून त्यांनी या उड्डाणपुलास मंजुरी देऊन भूमिपूजन केले होते. असे असताना स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते आॅनलाइन करणार आहे. कोरोनाकाळात बाहेर न पडलेले मुख्यमंत्री यांना दीड महिन्यापासून तयार असलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना लोकार्पणासाठीही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. महाविकास आघाडी सरकार जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप आमदार चौघुले यांनी केला आहे.दरम्यान, हा पूल सुरुवातीपासूनच श्रेयवादाने वादग्रस्त ठरला असून, याच्या भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करताच त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी या पुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी भाजपने या पुलाचे लोकार्पण करून या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.खरे श्रेय फडणवीसयांना - संतोष शेट्टीफडणवीस मुख्यमंत्री असताना प्रथमच भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले; परंतु त्यातील सुरू असलेल्या कामांना शिवसेना सरकार स्थगिती देऊन भिवंडीच्या नागरिकांवर अन्याय करीत असल्याने या उड्डाणपुलाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे असल्याने भाजपने लोकार्पण केले, अशी प्रतिक्रिया शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.