शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘भाजपा, काँग्रेसने वनगांना पाठिंबा द्यावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 04:59 IST

आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेसाठी ज्या निवडणुका-पोटनिवडणुका झाल्या त्या वेळी तेथे शिवसेनेने उमेदवार दिले नव्हते. तसाच विचार करून भाजपा, काँग्रेसने पालघरमध्ये उमेदवार न देता किंवा दिलेली उमेदवारी मागे घेऊन वनगा यांच्या मुलाला बिनविरोध निवडून द्यावे.

कल्याण : आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेसाठी ज्या निवडणुका-पोटनिवडणुका झाल्या त्या वेळी तेथे शिवसेनेने उमेदवार दिले नव्हते. तसाच विचार करून भाजपा, काँग्रेसने पालघरमध्ये उमेदवार न देता किंवा दिलेली उमेदवारी मागे घेऊन वनगा यांच्या मुलाला बिनविरोध निवडून द्यावे. वनगा परिवारातील उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरला पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांचा मुलगा आणि कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. पण ही निवडणूक वेगळ्या परिस्थितीत लढविली जात असल्याने सेनेसाठी ती राजकीय फायद्यासाठी नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन, त्यांना उमेदवारी देऊन शिवसेनेतील वनगा यांच्या प्रवेशाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे का, असे विचारता शिंदे म्हणाले, भाजपाने कोणाला पक्षात घ्यावे, हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला शह दिला आहे, असे मला तरी वाटत नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018