शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

खड्ड्यांविरोधात भाजप रस्त्यावर, शिवसेनेचाही विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:41 IST

शहरातील खड्ड्यांच्या मुद्यावर सोमवारी भाजपने महापालिका मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

ठाणे : शहरातील खड्ड्यांच्या मुद्यावर सोमवारी भाजपने महापालिका मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात आंदोलन केले. अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय... अशा आशयाचे फलक हातात धरून भाजपने प्रशासनाचा निषेध केला. दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीतही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला खड्ड्यांच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले. यावेळी सभापती राम रेपाळे यांनी खड्ड्यांची योग्य दुरुस्ती करावी, तसेच ज्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील, अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत राहणारे ठाणेकर खड्ड्यांच्या सिटीत राहतात की काय, असा समज सामान्य ठाणेकरांचा होऊ लागला आहे. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीतही भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांना झाले तरी काय, खाली डोके वर पाय, अशा आशयाचे फलक भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात झळकविण्यात आले. ठाण्यातील खड्डे कसे गोलगोल, अधिकारी करत आहे झोलझोल अशा आशयाचे गाणे गाऊनही त्यांनी यावेळी निषेध नोंदविला. भाजपचे गटनेते नारायण पवार, नगरसेवक अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर, नम्रता कोळी, भरत चव्हाण आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.दुसरीकडे हे आंदोलन सुरू असताना स्थायी समितीच्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचे पडसाद उमटले. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी खड्ड्यांचे छायाचित्र सादर करून ठाणेकर रस्त्यातून प्रवास करतात की बोटीतून, असा सवाल करीत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ही स्मार्ट सिटी आहे की खड्ड्यांची सिटी आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. परंतु, ते सर्वच प्रयोग सपशेल अपयशी ठरत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मागविले जात आहे, त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु, असे असतानाही खड्डे बुजविल्यानंतर पुन्हा काही तासांतच खड्डे कसे पडतात, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे ही पालिकेची फसवणूक नाही का, असा सवाल करून ज्यांच्याकडून अशा चुका झाल्या असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. यापूर्वी खड्ड्यांची बिले ही भांडवली खर्चातून काढली जात होती. मात्र, यासाठी आयुक्तांना आदेश द्यावे लागले असून ती बिले भांडवली खर्चातून देऊ नये, असे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, स्थायी समिती, महासभेची मंजुरी नसतानी ही बिले काढलीच कशी गेली, असा सवाल करीत त्यांनी प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले.>‘ती’ बिले थांबवामहासभेत बोलताना नगरअभियंता रवींद्र खडताळे यांनी शहरात रस्त्यांवर खड्डे पडले असल्याचे मान्य केले. मात्र, मागील १५ दिवसांत ९०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने जगातील कोणतेही तंत्रज्ञान अशा परिस्थितीत खड्डे बुजवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, शहरातील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, तसेच ज्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील, अशा ठेकेदारांवर कारवाई करतानाच, त्यांची बिले काढली जाऊ नयेत, असे आदेश सभापती राम रेपाळे यांनी प्रशासनाला दिले.