शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

खड्ड्यांविरोधात भाजप रस्त्यावर, शिवसेनेचाही विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:41 IST

शहरातील खड्ड्यांच्या मुद्यावर सोमवारी भाजपने महापालिका मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

ठाणे : शहरातील खड्ड्यांच्या मुद्यावर सोमवारी भाजपने महापालिका मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात आंदोलन केले. अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय... अशा आशयाचे फलक हातात धरून भाजपने प्रशासनाचा निषेध केला. दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीतही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला खड्ड्यांच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले. यावेळी सभापती राम रेपाळे यांनी खड्ड्यांची योग्य दुरुस्ती करावी, तसेच ज्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील, अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत राहणारे ठाणेकर खड्ड्यांच्या सिटीत राहतात की काय, असा समज सामान्य ठाणेकरांचा होऊ लागला आहे. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीतही भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांना झाले तरी काय, खाली डोके वर पाय, अशा आशयाचे फलक भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात झळकविण्यात आले. ठाण्यातील खड्डे कसे गोलगोल, अधिकारी करत आहे झोलझोल अशा आशयाचे गाणे गाऊनही त्यांनी यावेळी निषेध नोंदविला. भाजपचे गटनेते नारायण पवार, नगरसेवक अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर, नम्रता कोळी, भरत चव्हाण आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.दुसरीकडे हे आंदोलन सुरू असताना स्थायी समितीच्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचे पडसाद उमटले. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी खड्ड्यांचे छायाचित्र सादर करून ठाणेकर रस्त्यातून प्रवास करतात की बोटीतून, असा सवाल करीत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ही स्मार्ट सिटी आहे की खड्ड्यांची सिटी आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. परंतु, ते सर्वच प्रयोग सपशेल अपयशी ठरत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मागविले जात आहे, त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु, असे असतानाही खड्डे बुजविल्यानंतर पुन्हा काही तासांतच खड्डे कसे पडतात, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे ही पालिकेची फसवणूक नाही का, असा सवाल करून ज्यांच्याकडून अशा चुका झाल्या असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. यापूर्वी खड्ड्यांची बिले ही भांडवली खर्चातून काढली जात होती. मात्र, यासाठी आयुक्तांना आदेश द्यावे लागले असून ती बिले भांडवली खर्चातून देऊ नये, असे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, स्थायी समिती, महासभेची मंजुरी नसतानी ही बिले काढलीच कशी गेली, असा सवाल करीत त्यांनी प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले.>‘ती’ बिले थांबवामहासभेत बोलताना नगरअभियंता रवींद्र खडताळे यांनी शहरात रस्त्यांवर खड्डे पडले असल्याचे मान्य केले. मात्र, मागील १५ दिवसांत ९०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने जगातील कोणतेही तंत्रज्ञान अशा परिस्थितीत खड्डे बुजवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, शहरातील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, तसेच ज्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील, अशा ठेकेदारांवर कारवाई करतानाच, त्यांची बिले काढली जाऊ नयेत, असे आदेश सभापती राम रेपाळे यांनी प्रशासनाला दिले.