शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिजीवी मतदानाकडे पाठ फिरवण्याची भाजपाला भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:46 IST

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती.

कल्याण : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती. त्यामुळे ते निवडून येतीलच, असा विचार भाजपाला पाठिंबा देणाऱ्या बुद्धीजीवी मंडळींनी केला. वाजपेयी यांना मतदान करायला आम्ही गेलो नाही तरी मतदार त्यांना मते देतील, अशा भ्रमात बुद्धिजीवी लोक राहिले. त्याचा परिणाम काय झाला हे सगळ््यांनाच माहिती आहे. त्याची पुनरावृत्ती २०१९ सालच्या निवडणूकीत होऊ नये, याकरिता बुद्धिजीवी वर्गाने मतदान करावे, असे आवाहन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मंगळवारी केले.बुद्धिजीवी वर्ग विविध विषयावर चर्चा खूप करतो. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान करीत नाही. त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, असे सिन्हा म्हणाले. कल्याणच्या पश्चिमेतील मंगेशी सभागृहात भाजपाच्या वतीने ‘बुद्धिजीवी संमेलना’चे आयोजन भाजपाचे आ. नरेंद्र पवार यांनी केले होते. त्यावेळी सिन्हा बोलत होते. या प्रसंगी भाजपाचे खा. कपिल पाटील, नेते जगन्नाथ पाटील, डॉ. शुभा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.सिन्हा म्हणाले की, बुद्धिजीवी वर्गाने मतदान केले तर २०१९ सालच्या निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळणार आहेत. मात्र त्याकरिता भाजपाच्या प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. आपण मत दिले नाही तरी मोदी निवडून येतील या भ्रमात कुणीही राहू नये याकडे सिन्हा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.>फक्त अडीच लाख द्यायचे राहिलेराज्यमंत्री सिन्हा म्हणाले की, नरेंद्र मोदी मागील निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की, परदेशातील काळा पैसा भारतात आणून त्याचा विनियोग विकास कामांसाठी करणार आहे. मोदीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाखांतील १२ लाख ५० हजार रुपये विविध सबसिडी व योजनांच्या माध्यमातून यापूर्वी जमा केले आहेत.उर्वरित २ लाख ५० हजार रुपये अन्य योजनाच्या माध्यमातून द्यायचे बाकी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वी हे १५ लाख हा चुनावी जुमला असल्याचे म्हटले होते तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन’ ही ‘गले की हड्डी’ असल्याचे म्हटले होते.