शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

बुद्धिजीवी मतदानाकडे पाठ फिरवण्याची भाजपाला भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:46 IST

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती.

कल्याण : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती. त्यामुळे ते निवडून येतीलच, असा विचार भाजपाला पाठिंबा देणाऱ्या बुद्धीजीवी मंडळींनी केला. वाजपेयी यांना मतदान करायला आम्ही गेलो नाही तरी मतदार त्यांना मते देतील, अशा भ्रमात बुद्धिजीवी लोक राहिले. त्याचा परिणाम काय झाला हे सगळ््यांनाच माहिती आहे. त्याची पुनरावृत्ती २०१९ सालच्या निवडणूकीत होऊ नये, याकरिता बुद्धिजीवी वर्गाने मतदान करावे, असे आवाहन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मंगळवारी केले.बुद्धिजीवी वर्ग विविध विषयावर चर्चा खूप करतो. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान करीत नाही. त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, असे सिन्हा म्हणाले. कल्याणच्या पश्चिमेतील मंगेशी सभागृहात भाजपाच्या वतीने ‘बुद्धिजीवी संमेलना’चे आयोजन भाजपाचे आ. नरेंद्र पवार यांनी केले होते. त्यावेळी सिन्हा बोलत होते. या प्रसंगी भाजपाचे खा. कपिल पाटील, नेते जगन्नाथ पाटील, डॉ. शुभा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.सिन्हा म्हणाले की, बुद्धिजीवी वर्गाने मतदान केले तर २०१९ सालच्या निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळणार आहेत. मात्र त्याकरिता भाजपाच्या प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. आपण मत दिले नाही तरी मोदी निवडून येतील या भ्रमात कुणीही राहू नये याकडे सिन्हा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.>फक्त अडीच लाख द्यायचे राहिलेराज्यमंत्री सिन्हा म्हणाले की, नरेंद्र मोदी मागील निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की, परदेशातील काळा पैसा भारतात आणून त्याचा विनियोग विकास कामांसाठी करणार आहे. मोदीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाखांतील १२ लाख ५० हजार रुपये विविध सबसिडी व योजनांच्या माध्यमातून यापूर्वी जमा केले आहेत.उर्वरित २ लाख ५० हजार रुपये अन्य योजनाच्या माध्यमातून द्यायचे बाकी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वी हे १५ लाख हा चुनावी जुमला असल्याचे म्हटले होते तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन’ ही ‘गले की हड्डी’ असल्याचे म्हटले होते.