शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बविआही उतरली रिंगणात

By admin | Updated: April 24, 2017 02:21 IST

महापालिका निवडणुकीत प्रथमच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार असून शहरात याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

भिवंडी : महापालिका निवडणुकीत प्रथमच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार असून शहरात याबाबत चाचपणी सुरू केली आहे.शहरातील राजकीय पक्षांचे नगरसेवक नागरिकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्याने नवीन पर्याय म्हणून ही बहुजन विकास आघाडी नागरिकांसमोर जाणार आहे.मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेले प्रशासन व नगरसेवक यांच्याविषयी नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचा फायदा घेत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मतदारांसमोर जाणार आहेत. आघाडीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सज्जाद शेख यांनी दिली.महापालिकेने सिटीपार्कच्या जागी बेकायदा डम्पिंग ग्राउंड बनवून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवला आहे. हाच प्रमुख मुद्दा निवडणुकीचा असून हे डम्पिंग ग्राउंड प्रशासनाने सरकारने दिलेल्या जागेवर स्थलांतरित करावे, अशी मागणी केली जाणार आहे. रस्ते, पाणी व अस्वच्छता या विषयांबरोबर नागरिकांना व उद्योगास भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत आम्ही वाचा फोडणार आहोत,अशी माहिती शेख यांनी दिली. महापालिका क्षेत्रात प्रवासी वाहतुकीचा मोठा प्रश्न असून याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता नाही. राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वसई-विरार महापालिकेने शहरातून विरारपर्यंत सिटीबस सुरू केली होती. ही बस पोलीस नियंत्रण कक्षाजवळ उभी राहत होती. परंतु, शहरातील बेकायदा रिक्षाचालकांनी या सेवेस अडथळे निर्माण करून ती बंद पाडली. त्यामुळे वसई, बोरिवली व विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली व ठाणे महापालिकेची परिवहन सेवा शहरात आली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे, असे शेख म्हणाले. प्रभाग क्रमांक-२ च्या परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांच्या शिक्षणासह नोकरदारांना अर्थिक फटका बसत आहे. या परिसरात १५ वर्षांपासून नगरसेवक असलेले इम्रान खान विद्यमान स्थायी समितीचे सभापती आहेत. तरीदेखील त्यांनी या परिसराचा विकास न केल्याने या परिसरातील नागरिकांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या प्रभागात प्रस्थापित व विरोधक गटांमध्ये हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत, असा आरोपही शेख यांनी केला. हमीद शेख यांचे पॅनल डोईजड झाल्याने त्यांना मारण्याची धमकीही इम्राम खान यांनी दिल्याची तक्रार निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी कुणावरही अद्याप कारवाई केलेली नाही.(प्रतिनिधी)