शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

बविआही उतरली रिंगणात

By admin | Updated: April 24, 2017 02:21 IST

महापालिका निवडणुकीत प्रथमच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार असून शहरात याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

भिवंडी : महापालिका निवडणुकीत प्रथमच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार असून शहरात याबाबत चाचपणी सुरू केली आहे.शहरातील राजकीय पक्षांचे नगरसेवक नागरिकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्याने नवीन पर्याय म्हणून ही बहुजन विकास आघाडी नागरिकांसमोर जाणार आहे.मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेले प्रशासन व नगरसेवक यांच्याविषयी नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचा फायदा घेत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मतदारांसमोर जाणार आहेत. आघाडीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सज्जाद शेख यांनी दिली.महापालिकेने सिटीपार्कच्या जागी बेकायदा डम्पिंग ग्राउंड बनवून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवला आहे. हाच प्रमुख मुद्दा निवडणुकीचा असून हे डम्पिंग ग्राउंड प्रशासनाने सरकारने दिलेल्या जागेवर स्थलांतरित करावे, अशी मागणी केली जाणार आहे. रस्ते, पाणी व अस्वच्छता या विषयांबरोबर नागरिकांना व उद्योगास भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत आम्ही वाचा फोडणार आहोत,अशी माहिती शेख यांनी दिली. महापालिका क्षेत्रात प्रवासी वाहतुकीचा मोठा प्रश्न असून याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता नाही. राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वसई-विरार महापालिकेने शहरातून विरारपर्यंत सिटीबस सुरू केली होती. ही बस पोलीस नियंत्रण कक्षाजवळ उभी राहत होती. परंतु, शहरातील बेकायदा रिक्षाचालकांनी या सेवेस अडथळे निर्माण करून ती बंद पाडली. त्यामुळे वसई, बोरिवली व विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली व ठाणे महापालिकेची परिवहन सेवा शहरात आली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे, असे शेख म्हणाले. प्रभाग क्रमांक-२ च्या परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांच्या शिक्षणासह नोकरदारांना अर्थिक फटका बसत आहे. या परिसरात १५ वर्षांपासून नगरसेवक असलेले इम्रान खान विद्यमान स्थायी समितीचे सभापती आहेत. तरीदेखील त्यांनी या परिसराचा विकास न केल्याने या परिसरातील नागरिकांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या प्रभागात प्रस्थापित व विरोधक गटांमध्ये हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत, असा आरोपही शेख यांनी केला. हमीद शेख यांचे पॅनल डोईजड झाल्याने त्यांना मारण्याची धमकीही इम्राम खान यांनी दिल्याची तक्रार निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी कुणावरही अद्याप कारवाई केलेली नाही.(प्रतिनिधी)