शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जन्मभूमीची आठवण येते, मात्र कर्मभूमीच हक्काची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:45 IST

नागरिकत्वाची शासन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माझ्यासह पत्नी ईश्वरी,

पाकिस्तानमधील कराची शहरात राहून बलुचिस्तान येथील हाफ चौकी येथे आॅटो पार्टचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सिंधी व इतर समाजांकडे बघण्याची दृष्टी वेगळी असल्याने, कुटुंब पाकिस्तानात सुरक्षित राहणार नाही, असे वाटत होते. वडील मोेतीराम यांचा १९६५ साली मृत्यू झाल्यानंतर काही वर्षांत आईदेखील निवर्तली. कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी भाऊ व बहिणीसह तात्पुरत्या व्हिसावर भारतात येण्याचा निर्णय घेतला. १९९५ साली सर्व कुटुंबासह भारतात आलो. सुरुवातीला नोकरी केली. त्यानंतर पुन्हा वडिलोपार्जित असलेला आॅटोपार्टचा व्यवसाय सुरू केला. भारतात ११ वर्षे वास्तव्य पूर्ण केल्यानंतर नागरिकत्व मिळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला.

नागरिकत्वाची शासन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माझ्यासह पत्नी ईश्वरी, मुलगा आनंद, दिलीप व त्यांच्या कुटुंबाला नागरिकत्व मिळाले. मात्र, नरेश नावाच्या तिसºया मुलासह त्याच्या कुटुंबाला अद्यापही नागरिकत्व मिळालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज पडून आहे. नागरिकत्वासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. केंंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकत्व मिळण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होण्याची आशा आहे. तसे झाल्यास हजारो सिंधीबांधव भारतीय होतील. पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील वडिलोपार्जित आॅटोपार्टचा व्यवसाय भावाचा मुलगा दिलीप सांभाळत असून माझ्या वाटणीची तेथील सर्व संपत्ती विकून टाकली. कधीकधी जन्मभूमीची आठवण येते, पण कर्मभूमीत मिळालेल्या प्रेमामुळे व येथील खुल्या वातावरणामुळे या भूमीवर प्रेम जडले आहे. भारतात आल्यानंतर खºया अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ कळला. माझ्या नरेश या मुलासह त्याच्या कुटुंबाला लवकरच नागरिकत्व मिळावे, हीच इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नागरिकत्व कायद्याला भारतभर विरोध होत असला तरी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमधील लाखो सिंधी, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख व पारशी भारताकडे डोळे लावून बसले आहे. आजही ज्या मातीत खेळलो, बागळलो, मोठा मित्रपरिवार आहे, त्या मातृभूमीची ओढ कायम आहे. मात्र, कट्टरतावादामुळे इतर धर्मांना धोका निर्माण झाला. त्यामुळेच हजारो जण भारतात आले. आणखी लक्षावधी येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळेच जन्मभूमीऐवजी कर्मभूमी स्वत:ची हक्काची वाटू लागली आहे. भारतातील स्वतंत्र वातावरण पाहिल्यावर आमचे सिंधीबांधव पाकिस्तानमध्ये कसे राहतात, असा प्रश्न नेहमी मला पडतो.ढालाराम देवानी(वय ७७, रा. उल्हासनगर)माझी पाकिस्तानातील आई भारतात मोकळा श्वास घेईलदेशाच्या फाळणीनंतर ९० टक्क्यांपेक्षा जास्त सिंधी व इतर समाज भारतात आला. मात्र जे पाकिस्तानात राहिले, त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागल्याचे चित्र उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. मोठे भाऊ चंद्रमल देवानी यांच्या संपूर्ण कुटुंबाने तात्पुरता व्हिसा काढून भारतात राहणे पसंत केले. कालांतराने त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. मात्र माझे कुटुंब आई व एक भाऊ कुटुंबासह पाकिस्तानात राहत होता. २००८ मध्ये एक वर्षाच्या व्हिसावर कुटुंबासह भारतात आलो असून नागरिकत्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला. मात्र माझी ७७ वर्षांची आई, मोठा भाऊ परशुराम तसेच त्यांचे कुटुंब अद्यापही कराची शहरात राहते आहे. तेथे लहानमोठी नोकरी वा व्यवसाय करून ते जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत.

देशाच्या फाळणीच्या वेळी भारतात न आल्याची मोठी किंमत कुटुंबाला मोजावी लागली. केंद्र शासनाने नागरिकत्व विधेयकाला मंजुरी दिल्याने, पाकिस्तानातील सिंधीसह इतर समाजांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकट्या उल्हासनगरात तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या सिंधी समाजातील लोकांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यामुळे आता माझी आई व मोठा भाऊ लवकरच भारतात येण्याची, येथील लोकशाही व्यवस्थेत मोकळा श्वास घेण्याची आशा पल्लवित झाली आहे. २००८ मध्ये मी जेव्हा पत्नी सविता व मुलगा मनीषसह भारतात आलो, तेव्हा मुलगा पाच वर्षांचा होता. आज तो १७ वर्षांचा असून कॉलेजला जातो. नागरिकत्व मिळाले नसल्याने शिक्षण, व्यवसाय, नोकरी करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच घरासह इतर मालमत्ता खरेदी करता येत नाही. त्यामुळे कट्टर हिंदू व देशभक्त असताना केवळ नागरिकत्व न मिळाल्याने मन मारून राहावे लागते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकत्वासाठी अर्ज केला असून नागरिकत्व मिळण्याच्या प्रक्रियेतून जाताना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक प्रक्रिया पार पाडल्यावर नागरिकत्व मिळते. ज्यावेळी सिंधी समाजाला नागरिकत्व मिळते, तेव्हा तो त्यांच्या कुटुंबाचा पुनर्जन्मच असतो. जल्लोषात तो क्षण साजरा केला जातो. सुरुवातीला सात वर्षांनंतर व त्यानंतर ११ वर्षे भारतात राहिल्यानंतर नागरिकत्व मिळण्याची अट होती. नवीन कायद्यामुळे पाच वर्षांत नागरिकत्व प्राप्त होणार आहे. अनेक सिंधी कुटुंबांना भारतात येऊन २० वर्षे उलटली तरी नागरिकत्व मिळालेले नाही. केंद्र शासनाने कायदा केल्यानंतर नागरिकत्वाची प्रक्रिया सुलभ केली व एक खिडकी योजना लागू केल्यास हजारो सिंधी नागरिकांना फायदा मिळणार आहे. सिंधी समाज कट्टर हिंदू असून पाकिस्तानमध्ये राहूनही हिंदूंचे सर्व सण धूमधडाक्यात साजरे करतो. केंद्र शासनाच्या निर्णयाचे शतश: स्वागत.- शब्दांकन : सदानंद नाईकप्रकाश देवानी(वय ४५, रा. उल्हासनगर)

टॅग्स :thaneठाणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRohingyaरोहिंग्या