शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडी तालुक्यात दाखल; दुपारच्या जेवणाची महामार्गावर पंगत

By नितीन पंडित | Updated: June 19, 2023 16:55 IST

मुंबई नाशिक महामार्गारील वाहतूक विस्कळित

भिवंडी : शुक्रवारी दिलेल्या तोंडी आश्वासनांची पूर्तता न केल्याने आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडीत दाखल झाला आहे.१३ जून रोजी नाशिक येथून सुरुझलेला मोर्चा कसारा घाट उतरून शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाला होता.त्यावेळी स्थानिक काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या सोबत चर्चा घडवून आणली .परंतु मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासना नंतर ही मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून शासन मागण्यांच्या पूर्तते बाबत परिपत्रक काढून आश्र्वासित करीत नाही. तो पर्यंत बिऱ्हाड मोर्चा सुरू राहील असा निर्धार संघटनेच्या अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी बोलून दाखवला आहे.

शुक्रवार पासून शहापुर तालुक्यात तळ ठोकल्या नंतर सोमवारी सकाळी मोर्चेकरी भिवंडी तालुक्यात दाखल झाले. त्यांनी दुपारचा विसावा मुंबई नाशिक महामार्गावर कासणे येथे घेतला आहे. तेथे जेवणासाठी महामार्गावरच पंगत मांडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.तेथे पडघा पोलिसांनी महामार्गावरील त्या भागातील वाहतूक एकाच मार्गीके वर वळविल्याने वाहतूक कोंडीचा सामना काही प्रमाणात वाहन चालकां ना करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा सातवा दिवस असून शुक्रवारी मंत्रालयात झालेला चर्चेत तोंडी दिलेले आश्वासन सोमवारी संध्याकाळ पर्यंत तुम्हाला पुन्हा रूजू करून घेण्यासाठी परिपत्रक जारी करू असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले होते.परंतु सोमवारी सायंकाळी चार वाजता पर्यंत शासना च्या कोणत्याही प्रतिनिधींनी संपर्क साधला नसल्याची माहिती अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी दिली आहे.तृतीय व चतुर्थ श्रेणी तील कर्मचारी आज सात दिवस उन्हातान्हाची पर्वा न करता आपला संसार घेवून रस्त्यावर उतरले तरी सरकार संवेदना दाखवत नसल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी योगिता पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी