शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडी तालुक्यात दाखल; दुपारच्या जेवणाची महामार्गावर पंगत

By नितीन पंडित | Updated: June 19, 2023 16:55 IST

मुंबई नाशिक महामार्गारील वाहतूक विस्कळित

भिवंडी : शुक्रवारी दिलेल्या तोंडी आश्वासनांची पूर्तता न केल्याने आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडीत दाखल झाला आहे.१३ जून रोजी नाशिक येथून सुरुझलेला मोर्चा कसारा घाट उतरून शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाला होता.त्यावेळी स्थानिक काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या सोबत चर्चा घडवून आणली .परंतु मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासना नंतर ही मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून शासन मागण्यांच्या पूर्तते बाबत परिपत्रक काढून आश्र्वासित करीत नाही. तो पर्यंत बिऱ्हाड मोर्चा सुरू राहील असा निर्धार संघटनेच्या अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी बोलून दाखवला आहे.

शुक्रवार पासून शहापुर तालुक्यात तळ ठोकल्या नंतर सोमवारी सकाळी मोर्चेकरी भिवंडी तालुक्यात दाखल झाले. त्यांनी दुपारचा विसावा मुंबई नाशिक महामार्गावर कासणे येथे घेतला आहे. तेथे जेवणासाठी महामार्गावरच पंगत मांडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.तेथे पडघा पोलिसांनी महामार्गावरील त्या भागातील वाहतूक एकाच मार्गीके वर वळविल्याने वाहतूक कोंडीचा सामना काही प्रमाणात वाहन चालकां ना करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा सातवा दिवस असून शुक्रवारी मंत्रालयात झालेला चर्चेत तोंडी दिलेले आश्वासन सोमवारी संध्याकाळ पर्यंत तुम्हाला पुन्हा रूजू करून घेण्यासाठी परिपत्रक जारी करू असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले होते.परंतु सोमवारी सायंकाळी चार वाजता पर्यंत शासना च्या कोणत्याही प्रतिनिधींनी संपर्क साधला नसल्याची माहिती अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी दिली आहे.तृतीय व चतुर्थ श्रेणी तील कर्मचारी आज सात दिवस उन्हातान्हाची पर्वा न करता आपला संसार घेवून रस्त्यावर उतरले तरी सरकार संवेदना दाखवत नसल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी योगिता पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी