शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:28 IST

मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.

पालघर : जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यानंतर आता वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममधील २० ते ३० कोंबड्या मागील ५-६ दिवसांपासून मृत्युमुखी पडत असल्याचे समोर आले आहे. या पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या तपासणीसाठी पुणे आणि नंतर तेथून भोपाळ येथील सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील पाषाणे गावातील एका पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्याची बाब उघड झाल्यानंतर, या मृत कोंबड्या तपासणीसाठी भोपाळ येथील सुरक्षा पशुधन संस्थेकडे पाठविण्यात आल्या होत्या. या कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या पोल्ट्री फार्ममधील एक हजार कोंबड्या नष्ट करीत परिसरातील एक किलोमीटर क्षेत्रातील सर्वच कुक्कुटवर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित प्रशासन विभागाला दिले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यानंतर ही बर्ड फ्लूची लाट पालघरमध्ये शिरकाव करते की काय? अशी भीती पोल्ट्री फार्मधारक आणि चिकन विक्रेते दुकानांमध्ये आहे. दरम्यान, मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.

यानंतर त्या मृत कोंबड्यांचे नमुने प्राणी रोग तपासणी विभाग पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ते  आता अधिक तपासासाठी सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळकडे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात याचा अहवाल येण्याचे अपेक्षित असल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. कांबळे यांनी लोकमतला दिली.

कृती आराखडाही तयार - डॉ. कांबळेभोपाळ येथून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास शासनाच्या मानक कार्य पद्धतीनुसार पुढील कार्यवाहीसाठी आम्ही तयार आहोत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरआरपी (रॅपिड रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली असून, आमचा कृती आराखडाही पुढील कारवाईसाठी तयार करण्यात आल्याचे  पशुधन संशोधन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले. भोपाळहून नेमका काय अहवाल येतो याकडे अधिकारी, व्यावसायिक यांचे लक्ष लागले आहे. जर बर्ड फ्लू निष्पन्न झाल्यास परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू