शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

भिकाऱ्यांच्या लसीकरणाचा मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 23:43 IST

कागदपत्रांची वानवा : तोडगा काढण्याची यंत्रणेने व्यक्त केली गरज

अजित मांडके

ठाणे  : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, याच जिल्ह्यात रस्त्यावर, मंदिराशेजारी, फुटपाथवर, रेल्वेत, सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचे लसीकरण कसे करायचे, असा पेच शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे ना धड पॅनकार्ड ना आधारकार्ड, मग नोंदणी कशी करायची, लस कशी द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे. परंतु, या संदर्भात काहीतरी तोडगा काढावा लागेल, असे जिल्हा यंत्रणा सांगत आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षे वयोगटापुढील मात्र त्यांना काही आजार असल्यास त्यांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक पुरावा म्हणून मागितला जात आहे. त्यानंतरच लसीकरण केले जात आहे. परंतु, ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात आज शेकडो भिकारी सिग्नलवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, मंदिराबाहेर भीक मागताना दिसत आहेत. या भिकाऱ्यांसाठी ठाण्यात एक शेल्टर होम बांधले आहे, तर जिल्हा यंत्रणाच्या माध्यमातून जांभूळगाव येथे एक शेल्टर होम आहे. त्याठिकाणी ७४ भिकारी वास्तव्यास आहेत. यामध्ये ठाण्याच्या शेल्टरमध्ये २० आणि जांभूळगाव येथील शेल्टरमध्ये ५४ जणांचे वास्तव्य आहे, तर जिल्ह्यात आजडीला सुमारे ३०८ भिकारी असल्याची माहिती जिल्हा यंत्रणेच्या वतीने देण्यात आली. या भिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणारजिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जांभळूगाव येथे असलेल्या शेल्टर होममध्ये असलेल्या भिकाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. परंतु, जिल्ह्यात बेवारस फिरणाऱ्या भिकाऱ्यांच्या लसीकरणासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून त्यांना सुरुवातीला पकडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना एका छताखाली आणावे लागणार. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाशी चर्चा करून कशाप्रकारे लसीकरणाच्या प्रक्रियेत आणले जाईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

ठाण्यात बेवारस नागरिकांची संख्या अधिकठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बेवारस नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यातही ठाण्यात आजघडीला २०१८ मध्ये केलेल्या सर्व्हेत १५८ भिकारी असल्याची नोंद आहे, तर कल्याण, डोंबिवलीत ६७, उल्हासनगर ५६ आणि भिवंडीत ६७ भिकारी असल्याचे समोर आले आहे. 

भिकाऱ्यांना लसीकरणासाठी आधी त्याचे नियोजन आखावे लागणार आहे. यासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची मदत घेऊन या भिकाऱ्यांना पकडून त्यांना शेल्टरमध्ये आणावे लागेल. नंतर जिल्हाधिकारी, महापालिका यांच्याशी चर्चा करून भिकाऱ्यांना लसीकरण कसे करता येऊ शकेल, याची मोहीम हाती घ्यावी लागेल.     - महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या