शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

भिकाऱ्यांच्या लसीकरणाचा मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 23:43 IST

कागदपत्रांची वानवा : तोडगा काढण्याची यंत्रणेने व्यक्त केली गरज

अजित मांडके

ठाणे  : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, याच जिल्ह्यात रस्त्यावर, मंदिराशेजारी, फुटपाथवर, रेल्वेत, सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचे लसीकरण कसे करायचे, असा पेच शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे ना धड पॅनकार्ड ना आधारकार्ड, मग नोंदणी कशी करायची, लस कशी द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे. परंतु, या संदर्भात काहीतरी तोडगा काढावा लागेल, असे जिल्हा यंत्रणा सांगत आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षे वयोगटापुढील मात्र त्यांना काही आजार असल्यास त्यांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक पुरावा म्हणून मागितला जात आहे. त्यानंतरच लसीकरण केले जात आहे. परंतु, ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात आज शेकडो भिकारी सिग्नलवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, मंदिराबाहेर भीक मागताना दिसत आहेत. या भिकाऱ्यांसाठी ठाण्यात एक शेल्टर होम बांधले आहे, तर जिल्हा यंत्रणाच्या माध्यमातून जांभूळगाव येथे एक शेल्टर होम आहे. त्याठिकाणी ७४ भिकारी वास्तव्यास आहेत. यामध्ये ठाण्याच्या शेल्टरमध्ये २० आणि जांभूळगाव येथील शेल्टरमध्ये ५४ जणांचे वास्तव्य आहे, तर जिल्ह्यात आजडीला सुमारे ३०८ भिकारी असल्याची माहिती जिल्हा यंत्रणेच्या वतीने देण्यात आली. या भिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणारजिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जांभळूगाव येथे असलेल्या शेल्टर होममध्ये असलेल्या भिकाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. परंतु, जिल्ह्यात बेवारस फिरणाऱ्या भिकाऱ्यांच्या लसीकरणासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून त्यांना सुरुवातीला पकडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना एका छताखाली आणावे लागणार. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाशी चर्चा करून कशाप्रकारे लसीकरणाच्या प्रक्रियेत आणले जाईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

ठाण्यात बेवारस नागरिकांची संख्या अधिकठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बेवारस नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यातही ठाण्यात आजघडीला २०१८ मध्ये केलेल्या सर्व्हेत १५८ भिकारी असल्याची नोंद आहे, तर कल्याण, डोंबिवलीत ६७, उल्हासनगर ५६ आणि भिवंडीत ६७ भिकारी असल्याचे समोर आले आहे. 

भिकाऱ्यांना लसीकरणासाठी आधी त्याचे नियोजन आखावे लागणार आहे. यासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची मदत घेऊन या भिकाऱ्यांना पकडून त्यांना शेल्टरमध्ये आणावे लागेल. नंतर जिल्हाधिकारी, महापालिका यांच्याशी चर्चा करून भिकाऱ्यांना लसीकरण कसे करता येऊ शकेल, याची मोहीम हाती घ्यावी लागेल.     - महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या