शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

बुलेट ट्रेनविरोधी संघर्षाला मोठे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:36 IST

मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सकारात्मक : जमीन संपादन थांबवण्याची स्थानिकांची मागणी

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : बुलेट ट्रेनची राज्याला आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगून जमीन संपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे, असे जाहीर केल्याने बुलेट ट्रेनविरोधातील संघटनांच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक ग्रामपंचायतींनी विरोध नोंदविला असताना जिल्हा प्रशासनातील काही अधिकाºयांकडून जमीन मोजणीदरम्यान पोलीस बळाचा वापर केला जात असल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनची राज्यात आवश्यकता नसल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदर उभारणीबाबत मी जनतेच्या सोबत आहे, असे वचनही मुख्यमंत्र्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हावासीयांना दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेनची राज्यात आवश्यकता नाही, ती ट्रेन राज्यात चालवायचीच असेल तर ती विदर्भ अशी चालवावी, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी केंद्राला लगावला होता.केंद्र सरकारने जपानच्या जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी या कंपनीला बुलेट ट्रेन उभारणीचा ठेका १.०८ लाख कोटी रुपयांना दिला आहे. यासाठी १४१५.७५ हेक्टर जमीन संपादन केली जाणार असून जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. या बाधित होणाºया गावांतील बहुतांशी ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील जमिनी देण्यास विरोध दर्शवला असून तसे ग्रामपंचायतींचे ठराव राज्य व केंद्र शासनासह संबंधित विभागांकडेही पाठवले आहेत. पर्यावरणीय संवेदनशील स्थळे म्हणून ओळखली जाणारी वसईमधील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही भागही या ट्रेन प्रकल्पात येणार असून वैतरणा रेल्वे स्थानकाजवळील १.५६ हेक्टर खारफुटीचे क्षेत्र बाधित होणार आहे.पालघर जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुुुजन विकास आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, जनता दल आदी पक्षांसह आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, भूमी सेना, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, भूमी अधिकार आंदोलन, किसान सभा आदी संघटनांनी विरोध दर्शवीत बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण, मोजणी आदी कामे बंद पाडली आहेत. नुकतेच केळवे रोड येथे अद्ययावत यंत्रसामुग्रीद्वारे छुप्या पद्धतीने सुरू असलेले सर्वेक्षणाचे कामही स्थानिकांनी बंद पाडले होते.ग्रामीण भागातील लोकांचा जमिनी संपादनाला अजूनही विरोध होत असून त्यांच्यामागे शिवसेना ठामपणे उभी आहे. नाणारप्रमाणेच आम्ही बुलेट ट्रेनबाबत जनतेसोबत उभे राहणार आहोत. मुंबई-सुरत ट्रेन मार्गाची आवश्यकता मला वाटत नाही, मात्र राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर राज्याची राजधानी व उपराजधानीला जोडणारी मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन सुरू करावी, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. या वक्तव्यामुळे बुलेट ट्रेनविरोधात आंदोलनांना बळ मिळाले आहे.जिल्ह्यात शेतकºयांचा विरोध असतानाही पोलीस बळाचा वापर करून जमीन मोजणीचे काम छुप्या पद्धतीने सुरूच आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असलो तरी जिल्ह्यात जमीन सर्वेक्षण, संपादनाचे कुठलेही काम करू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्हाधिकाºयांना तत्काळ द्यावेत.- काळूराम धोदडे, आदिवासी एकता परिषद