शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:11 IST

डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे.

डोंबिवली : डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे. नाहीतर भविष्यात डोंबिवलीचे भोपाळ होऊ शकते, अशी भीती माजी खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. कल्याण- डोंबिवली पालिकेकडे पैसे नसतील, त्यामुळे विकासकामे होत नसतील तर बिल्डरांचा ओपन लॅण्ड टॅक्स कमी का केला? त्याच न्यायाने नागरिकांचा करही कमी करायला हवा. बिल्डर आणि सामान्यांना समान न्याय द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.कल्याण-डोंबिवलीचा मी लोकप्रतिनिधी होतो. त्यामुळे मी डोंबिवलीला घाणेरडे शहर म्हणू शकणार नाही. एवढे साक्षर शहर असतानाही येतील नागरिक लोकप्रतिनिधींना प्रश्न का विचारत नाहीत. परंपरागत मतदारांनी आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला हवे. एवढी वर्षे सत्ता असूनही आज आपण मागे का? याचा जाब आपण विचारणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी केला.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वातार्लापात परांजपे बोलत होते. ते म्हणाले, मी खासदार असताना गटार आणि पायवाटा अशा नगरसेवकांच्या कामांपेक्षा खासदार पदाला शोभतील, अशा कामांवर जास्त भर दिला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ८० टक्के मतदार हे रेल्वेने प्रवास करणारे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्रासदायक ठरणाऱ्या प्रवासातून दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रकल्पांना मी प्राधान्य दिले. त्यात कल्याण ते ऐरोली रेल्वेमार्ग, पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचे काम, कल्याणच्या पुढे तिसरी रेल्वे मार्गिका, ठाकुर्लीतील उड्डाणपूल, सरकते जिने यासाठी पाठपुरावा केला. मोठा गाव ते माणकोली पूल, रिंगरूट, कल्याण-शीळ मागार्चे रुंदीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी प्रयत्नशील होतो. २०१९पर्यंत हे प्रकल्प पूर्ण झाले तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा त्यामागील उद्देश होता. खासदारपदी निवडून आल्यानंतर डॉ. शिंदे यांना मी हे प्रकल्प पूर्ण करून घेण्याबाबत बोललो. पण तसे झाले नाहीत. नवीन प्रकल्प तर अद्याप दूरच आहेत, असे सांगत विकास करून घेण्यात ते कमी पडत आहेतच. पण सत्तेतील भाजपाकडूनही कामे होताना दिसत नाहीत. येत्या १० वर्षांत मतदारसंघात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचा खासदार म्हणून विचार करून काम करायला हवे. परंतु, शिवमंदिर महोत्सव सोडला तर डॉ. शिंदे यांचे काम काय?, असा परखड सवालही परांजपे यांनी या वेळी केला.खासदारांची प्रत्येक बैठक पालकमंत्र्यांच्या कुशीतचकल्याण लोकसभा मतदारसंघाततील रेल्वे, रस्ते, पायाभूत प्रकल्प पूर्ण करून घेण्यात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सत्ताधारी भाजपा अपयशी ठरल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली. डॉ. शिंदे हे तर पालकमंत्र्यांचे बोट धरूनच प्रवास करत आहेत. त्यांची प्रत्येक बैठक ही पालकमंत्र्यांच्या कुशीत होते, अशी तिरकस टीकाही परांजपे यांनी केली.सत्ताधाºयांकडे विकासाचा अजेंडा, दृष्टीकोनच नाही. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार परस्परांशी स्पर्धा करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्या अशा बेजबाबदार वागण्याचे दुष्परिणाम दोन्ही मतदारसंघांतील विकासकामांवर होत आहेत, असे ते म्हणाले.मी खासदार असताना प्रत्येक प्रकल्पासाठी एकटाच केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातील संबंधितांची भेट घेत असे. एकदाही माझ्यावर तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांना सोबत घेऊन जाण्याची वेळ आली नाही. परंतु, डॉ. शिंदे यांची प्रत्येक बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्हे तर कुशीतच होते, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.‘पक्ष सांगेल तिथून लढणार’आगामी काळातील राजकीय वाटचालीसंदर्भात परांजपे म्हणाले, मला पक्ष सांगेल तेथून मी निवडणूक लढवणार. ठाणे आणि कल्याणमधील नागरिकांशी आताही माझा संपर्क आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण असे लोकसभेचे दोन पर्याय माझ्यापुढे आहेत. पक्षाने सांगितले तर खासदार म्हणून अन्यथा आमदार म्हणूनही लढेन. पण पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री आयुक्तांकडे,तर राज्यमंत्री अतिरिक्त आयुक्तांकडेकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विकास तीन वर्षांपासून खुंटला आहे. कारण सत्ताधाºयांचा प्रशासन आणि अधिकारी यांच्या वचक राहिलेला नाही. अधिकारी आणि लोकनेते यांच्यात ताळमेळ दिसत नाही. कारण पालकमंत्री हे ठाणे महापालिका आयुक्तांकडे, कल्याण-डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे, तर खासदार डॉ. शिंदे हे पालकमंत्र्यांकडे जाऊन बसतात. त्यामुळे विकास होताना दिसत नाही. पूर्वी अधिकारी आमच्याकडे येत असत आणि आमचा संवादही होत असे, याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले.‘शिंदे, हिंदुराव यांचा पुढाकार हवा’ : विरोधक म्हूणन कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील प्रश्न हाती घ्यायला हवेत. पण तसे होताना दिसत नाही. आंदोलने केली जात नाहीत. आमदार जगन्नाथ शिंदे आणि प्रमोद हिंदुराव यांनी कल्याण-डोंबिवलीत जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, पण तेही पुढाकार घेत नाहीत, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.दिवा आणि बुलेट ट्रेन : मुंबईहून अहमदाबादला जाणाºया बुलेट ट्रेनशी दिव्याचा काय संबंध, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यासाठी जर दिव्यात भूसंपादन सुरू असेल, तर खासदारांनी याबाबत जागरूक असायला हवे. मीही याबाबत माहिती घेईन, अशी भूमिका त्यांनी मांडली.सध्या कोणतीही आॅफर नाही! : भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा थेट प्रश्न विचारताच त्यांनी हसत सांगितले, मला अजूनही कोणत्याही पक्षाची आॅफर नाही. माध्यमांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. येत्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे