शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:11 IST

डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे.

डोंबिवली : डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे. नाहीतर भविष्यात डोंबिवलीचे भोपाळ होऊ शकते, अशी भीती माजी खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. कल्याण- डोंबिवली पालिकेकडे पैसे नसतील, त्यामुळे विकासकामे होत नसतील तर बिल्डरांचा ओपन लॅण्ड टॅक्स कमी का केला? त्याच न्यायाने नागरिकांचा करही कमी करायला हवा. बिल्डर आणि सामान्यांना समान न्याय द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.कल्याण-डोंबिवलीचा मी लोकप्रतिनिधी होतो. त्यामुळे मी डोंबिवलीला घाणेरडे शहर म्हणू शकणार नाही. एवढे साक्षर शहर असतानाही येतील नागरिक लोकप्रतिनिधींना प्रश्न का विचारत नाहीत. परंपरागत मतदारांनी आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला हवे. एवढी वर्षे सत्ता असूनही आज आपण मागे का? याचा जाब आपण विचारणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी केला.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वातार्लापात परांजपे बोलत होते. ते म्हणाले, मी खासदार असताना गटार आणि पायवाटा अशा नगरसेवकांच्या कामांपेक्षा खासदार पदाला शोभतील, अशा कामांवर जास्त भर दिला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ८० टक्के मतदार हे रेल्वेने प्रवास करणारे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्रासदायक ठरणाऱ्या प्रवासातून दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रकल्पांना मी प्राधान्य दिले. त्यात कल्याण ते ऐरोली रेल्वेमार्ग, पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचे काम, कल्याणच्या पुढे तिसरी रेल्वे मार्गिका, ठाकुर्लीतील उड्डाणपूल, सरकते जिने यासाठी पाठपुरावा केला. मोठा गाव ते माणकोली पूल, रिंगरूट, कल्याण-शीळ मागार्चे रुंदीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी प्रयत्नशील होतो. २०१९पर्यंत हे प्रकल्प पूर्ण झाले तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा त्यामागील उद्देश होता. खासदारपदी निवडून आल्यानंतर डॉ. शिंदे यांना मी हे प्रकल्प पूर्ण करून घेण्याबाबत बोललो. पण तसे झाले नाहीत. नवीन प्रकल्प तर अद्याप दूरच आहेत, असे सांगत विकास करून घेण्यात ते कमी पडत आहेतच. पण सत्तेतील भाजपाकडूनही कामे होताना दिसत नाहीत. येत्या १० वर्षांत मतदारसंघात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचा खासदार म्हणून विचार करून काम करायला हवे. परंतु, शिवमंदिर महोत्सव सोडला तर डॉ. शिंदे यांचे काम काय?, असा परखड सवालही परांजपे यांनी या वेळी केला.खासदारांची प्रत्येक बैठक पालकमंत्र्यांच्या कुशीतचकल्याण लोकसभा मतदारसंघाततील रेल्वे, रस्ते, पायाभूत प्रकल्प पूर्ण करून घेण्यात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सत्ताधारी भाजपा अपयशी ठरल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली. डॉ. शिंदे हे तर पालकमंत्र्यांचे बोट धरूनच प्रवास करत आहेत. त्यांची प्रत्येक बैठक ही पालकमंत्र्यांच्या कुशीत होते, अशी तिरकस टीकाही परांजपे यांनी केली.सत्ताधाºयांकडे विकासाचा अजेंडा, दृष्टीकोनच नाही. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार परस्परांशी स्पर्धा करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्या अशा बेजबाबदार वागण्याचे दुष्परिणाम दोन्ही मतदारसंघांतील विकासकामांवर होत आहेत, असे ते म्हणाले.मी खासदार असताना प्रत्येक प्रकल्पासाठी एकटाच केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातील संबंधितांची भेट घेत असे. एकदाही माझ्यावर तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांना सोबत घेऊन जाण्याची वेळ आली नाही. परंतु, डॉ. शिंदे यांची प्रत्येक बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्हे तर कुशीतच होते, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.‘पक्ष सांगेल तिथून लढणार’आगामी काळातील राजकीय वाटचालीसंदर्भात परांजपे म्हणाले, मला पक्ष सांगेल तेथून मी निवडणूक लढवणार. ठाणे आणि कल्याणमधील नागरिकांशी आताही माझा संपर्क आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण असे लोकसभेचे दोन पर्याय माझ्यापुढे आहेत. पक्षाने सांगितले तर खासदार म्हणून अन्यथा आमदार म्हणूनही लढेन. पण पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री आयुक्तांकडे,तर राज्यमंत्री अतिरिक्त आयुक्तांकडेकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विकास तीन वर्षांपासून खुंटला आहे. कारण सत्ताधाºयांचा प्रशासन आणि अधिकारी यांच्या वचक राहिलेला नाही. अधिकारी आणि लोकनेते यांच्यात ताळमेळ दिसत नाही. कारण पालकमंत्री हे ठाणे महापालिका आयुक्तांकडे, कल्याण-डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे, तर खासदार डॉ. शिंदे हे पालकमंत्र्यांकडे जाऊन बसतात. त्यामुळे विकास होताना दिसत नाही. पूर्वी अधिकारी आमच्याकडे येत असत आणि आमचा संवादही होत असे, याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले.‘शिंदे, हिंदुराव यांचा पुढाकार हवा’ : विरोधक म्हूणन कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील प्रश्न हाती घ्यायला हवेत. पण तसे होताना दिसत नाही. आंदोलने केली जात नाहीत. आमदार जगन्नाथ शिंदे आणि प्रमोद हिंदुराव यांनी कल्याण-डोंबिवलीत जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, पण तेही पुढाकार घेत नाहीत, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.दिवा आणि बुलेट ट्रेन : मुंबईहून अहमदाबादला जाणाºया बुलेट ट्रेनशी दिव्याचा काय संबंध, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यासाठी जर दिव्यात भूसंपादन सुरू असेल, तर खासदारांनी याबाबत जागरूक असायला हवे. मीही याबाबत माहिती घेईन, अशी भूमिका त्यांनी मांडली.सध्या कोणतीही आॅफर नाही! : भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा थेट प्रश्न विचारताच त्यांनी हसत सांगितले, मला अजूनही कोणत्याही पक्षाची आॅफर नाही. माध्यमांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. येत्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे