शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भिवंडीत मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकून धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: August 28, 2023 14:55 IST

कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मनपा प्रशासन कचरा उचलण्यास असमर्थ ठरली असल्याने शहरात घाण,दुर्गंधी व आजार वाढले असतांनाही मनपा प्रशासन कचरा ठेकेदारावर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप भिवंडी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आरफात खान यांनी करत थेट महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर सोमवारी कचरा फेकून धरणे आंदोलन केले. अचानक झालेल्या या कचरा फेको धरणे आंदोलनामुळे मनपा मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती.या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इसाम खान, जावेद खान, सलीम खान आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा सुमारे ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमलेला असताना सुद्धा शहरातील अनेक विभागात कचरा तसाच पडून आहे. कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी करत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

शहरातील अनेक भागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. शांतीनगर या अल्पसंख्याक विभागात पालिका प्रशासना दूजाभाव करीत असून गौसिया मस्जिद परिसरात कचरा उचलला जात नसल्याने पावसाळ्या मध्ये हा कचरा सडून त्या मधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या कचऱ्या मुळे काही संसर्ग आजारांची लागण सुध्दा नागरिकांना होते असल्याचा आरोप आरफात खान यांनी केला आहे.या बाबत पालिका प्रशासना कडे वेळोवेळी तक्रारी करून ही पालिका प्रशासन आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन हे आंदोलन केल्याची माहिती जावेद खान यांनी दिली आहे.सुमारे दोन तास सुरू राहिलेल्या या ठिय्या आंदोलनामुळे पालिका मुख्यालय प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर पालिका आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभागाचे प्रमुख जे एम सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यां सोबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी