शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट; मनपा, वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:05 IST

कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

भिवंडी - भिवंडी शहरात महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिस यांच्या मधील समन्वयाअभावी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना या वाहतूक कोंडीचे नियोजन करायचे कोणी, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

 शहरात वाहन स्थळांचे योग्य नियोजन कुठेच केले नसल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय, भिवंडी न्यायालय, पोलीस उपायुक्त कार्यालय,तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती,स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालय,तिन्ही नोंदणी रजिष्टार कार्यालय व महानगरपालिका या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी दररोज शेकडो चार चाकी व त्याहून अधिक पटीने दुचाकी वाहन भिवंडी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून येत असतात. वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांसमोर आपली वाहन नक्की उभी करायची कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे.त्यातच रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना टोईंग व्हॅन वाले उचलून नेत असल्याने नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.टोविंग व्हॅनच्या कारवाईने नागरिक धास्तावले आहेत.

       वाहतूक कोंडीतून नागरिकांचे सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभारली आहे मात्र ही सिग्नल यंत्रणा सध्या बंद आहे, त्यामुळे सिग्नल यंत्रणेवर महापालिकेने केलेला लाखोंचा खर्च वाया गेला असून वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे अशीच राहिली आहे.शहरात वाहतूक कोंडीच्या संकटाला समस्त नागरिकांना ,शाळकरी विद्यार्थी चाकरमानी यांना सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीTrafficवाहतूक कोंडी