शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट; मनपा, वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:05 IST

कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

भिवंडी - भिवंडी शहरात महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिस यांच्या मधील समन्वयाअभावी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना या वाहतूक कोंडीचे नियोजन करायचे कोणी, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

 शहरात वाहन स्थळांचे योग्य नियोजन कुठेच केले नसल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय, भिवंडी न्यायालय, पोलीस उपायुक्त कार्यालय,तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती,स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालय,तिन्ही नोंदणी रजिष्टार कार्यालय व महानगरपालिका या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी दररोज शेकडो चार चाकी व त्याहून अधिक पटीने दुचाकी वाहन भिवंडी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून येत असतात. वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांसमोर आपली वाहन नक्की उभी करायची कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे.त्यातच रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना टोईंग व्हॅन वाले उचलून नेत असल्याने नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.टोविंग व्हॅनच्या कारवाईने नागरिक धास्तावले आहेत.

       वाहतूक कोंडीतून नागरिकांचे सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभारली आहे मात्र ही सिग्नल यंत्रणा सध्या बंद आहे, त्यामुळे सिग्नल यंत्रणेवर महापालिकेने केलेला लाखोंचा खर्च वाया गेला असून वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे अशीच राहिली आहे.शहरात वाहतूक कोंडीच्या संकटाला समस्त नागरिकांना ,शाळकरी विद्यार्थी चाकरमानी यांना सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीTrafficवाहतूक कोंडी