शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Bhiwandi : स्टेम कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सपा आमदारांची मागणी 

By नितीन पंडित | Updated: December 24, 2022 17:51 IST

Bhiwandi News: भिवंडी शहरात सातत्याने कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठयाचा सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर स्टेम कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या नियुक्तीची चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

- नितीन पंडितभिवंडी - शहरात सातत्याने कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठयाचा सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर स्टेम कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या नियुक्तीची चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेस शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र मागील ६ महिन्यांपासून भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.याबाबत आमदार रईस शेख यांनी स्टेम अधिकाऱी प्रथमेश पाटील व ऋषिकेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारपुस केली असता त्यांना कोणत्याही प्रकारची योग्य उत्तर मिळाले नाही.त्यातच शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार स्टेम कंपनीमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील जल शुद्धीकरण मशिनची देखभाल दुरूस्ती बऱ्याच वर्षांपासुन झाली नसून अनेक मशीन बंद व  नादुरुस्त असल्याने भिवंडी शहरास पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची बाब आमदार शेख यांना समजली असून स्टेममध्ये नियुक्त केलेले अभियंते महेश भोये व अवंतिका शिंदे यांना जलशुद्धीकरण केंद्राचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसुन त्यांच्यावर महाव्यवस्थापक अनिल चौधरी व व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचा आरोप देखील आमदार शेख यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

आमदार शेख यांनी केलेल्या चौकशीत, पंपाची देखभाल दुरूस्ती कामाबाबत फक्त बिले काढण्याची कामे या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असून भिवंडी शहरातून महिन्याभरात ३ कोटी ५० लाख रूपये पाणी देयक भरूनसुद्धा शहराचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

दरम्यान स्टेम कंपनीचे संकेत घरत हे व्यवस्थापकीय संचालक या पदासाठी पात्र नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या अनुभवहीन कार्यपद्धतीमूळे स्टेम कंपनीचे नुकसान होत असुन विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याचा फटका भिवंडी शहरातील लोकांना सोसावा लागत असून भिवंडी शहरात पाणीसमास्येमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व यास पूर्णत: स्टेम कंपनीचे संकेत घरत जबाबदार राहतील.त्यामुळे अवैधरित्या नियुक्त झालेल्या संकेत घरत यांच्या नियुक्तीची चौकशी करुन त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी