शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

बाळ्या मामा आमचाच- जितेंद्र आव्हाडांच्या गौप्य स्फोटाने भिवंडीचे राजकारण ढवळले

By नितीन पंडित | Updated: April 6, 2023 18:24 IST

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला.

भिवंडी:

दि.६-सध्या राज्यात विचित्र राजकीय परिस्थिती असून कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांना पक्षात आणले जात आहे.शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हा आमचाच होता,राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष होता, मात्र गोदामांवरील कारवाईची भीती दाखवून त्याच्यावर राष्ट्रवादी सोडण्याची वेळ आली. त्यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला.

आव्हाडांच्या या राजकीय गौप्य स्फोटाने भिवंडीतील राजकारण चांगलेच ढवळले आहे.आव्हाडांच्या या भाषणाची क्लिप भिवंडीत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.विशेष म्हणजे आव्हाडांच्या या वक्तव्याची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संदर्भात सुरेश म्हात्रे यांना विचारणा झाली असल्याची माहिती बाळ्या मामा यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.             शिवसेनेत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या व्यासपीठावरून आव्हाडांनी आपले मत व्यक्त करतांना कार्यकर्त्यांवर कशा प्रकारे दबाव आणला जातो,हे सांगताना शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचे उदाहरण दिले.बाळ्या मामा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते, भिवंडी लोकसभेचे खासदार व सध्या केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून बाळ्यामामा ओळखले जातात. भिवंडी लोकसभेत भाजपचे मंत्री असलेल्या पाटलांना लोकसभा निवडणुकीत केवळ बाळ्या मामा हे एकमेव विरोधक असल्याने बाळ्या मामा यांना शिंदे गटात घेतले तर भाजपसाठी ते फायदेशीर ठरणार यासाठी बाळ्या मामांवर दबाव आणला अशी चर्चा बाळ्या मामा यांच्या शिंदे गटात प्रवेश करताना जिल्हाभर झाली होती.त्यानंतर ठाणे येथील जाहीर सभेत आव्हाडांनी बाळ्या मामा यांच्यावरची कारवाई थांबावी म्हणून शरद पवार यांनी माझ्याकडेच निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यासाठी सांगितले असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.आव्हाडांच्या या गौप्यस्फोटामुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून आमचा बाळ्या मामा या आव्हाडांच्या विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे असल्याने मंत्री कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीतील राजकीय धोका अजूनही टळला नसल्याचे आव्हाडांच्या वक्तव्याने अधोरेखित झाले आहे.त्यामुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात आव्हाडांच्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.