शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

ऐन पावसाळ्यात भिवंडी मनपाची पाणीकपात

By admin | Updated: September 5, 2015 22:24 IST

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम व मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्याने दोन दिवस पाणी मिळत

भिवंडी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम व मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्याने दोन दिवस पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढत आहेत.शहरातील पाण्याचे स्रोत महानगरपालिका प्रशासनाने कमी केल्याने वाढत्या लोकसंख्येसाठी स्टेम व मुंबई मनपाकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या शहरातील नागरिकांना वऱ्हाळा तलावातील दोन एमएलडी, स्टेम व मुंबई मनपा या दोन ठिकाणांहून एकूण १०८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तो करताना नियोजन नसल्याने काही ठिकाणी २४ तास तर काही ठिकाणी २ तासही पाणी सोडले जात नाही. मुंबई महानगरपालिकेने २० टक्के पाणीकपात केली आहे. तसेच दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी ९ वाजेपर्यंत स्टेमचे पाणी बंद असते. त्यानंतर, रिकाम्या जलवाहिनीतून आलेले पाणी काही ठिकाणी पोहोचण्यास उशीर लागल्याने ते शुक्रवारी पोहोचते. अशा जलवाहिनीवरील पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केले पाहिजेत, अशी मागणी त्या भागातील रहिवासी करीत आहेत. प्रभाग समिती ५ मधील जुन्या भिवंडीतील रहिवाशांना नियमित पाणी देण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी अनेक ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाइंगमध्ये व सायझिंगमध्ये सोडलेले आहे. तसेच वाहने धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरधारकांनी पाणी चोरले आहे. इमारत बांधकामासही चोरीचे कनेक्शन दिले आहे.