शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:28 IST

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.

भिवंडी - महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिकाºयांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.राजीव गांधी ते टेमघर या मार्गाने मेट्रो रेल्वे जाऊ नये म्हणून साकडे घालण्यासाठी मंगळवारी कल्याणरोडच्या रहिवाशांनी महापौर जावेद दळवी यांची भेट घेतली. मागील महासभेत कल्याणरोड व वंजारपाटीनाका या दोन मार्गाने मेट्रो रेल्वे नेण्यास मान्यता दिली होती. या मागील इतिवृत्तास मान्यता देण्याचा विषय बुधवारच्या महासभेत आला असता शिवसेनेचे नगरसेवक मदनबुवा नाईक, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांच्यासह काही सेना व काँग्रेस नगरसेवकांनी कल्याण रोडवरून मेट्रो नेण्यास विरोध केला. त्यामुळे महासभेत कल्याणरोड मार्ग व वंजारपाटीनाका मार्ग असे दोन गट निर्माण झाले. तसेच सभागृहाबाहेर कल्याणरोड रहिवाशांनी गर्दी केली होती. अखेर सभागृहाने मागील इतिवृत्तास मान्यता दिल्यानंतर महासभेपुढे इतर विषयांची चर्चा झाली. राजीव गांधी चौक ते टेमघर या कल्याणरोड मार्गावर वन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळे व इमारती उभ्या केल्या आहेत. तर वज्रेश्वरी संस्थान आणि इतर संस्थानच्या मालकीच्या जागा या मार्गावर आहेत. त्यामुळे मूळ जमिनीचा सातबारा अथवा सिटीसर्वे उताºयावर अनेक रहिवाशांची नावे नाहीत. त्यामुळे अशा काही ठराविक रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. तसेच रस्ता रूंदीकरणात काही जमीनमालकांना व गाळे धारकांना पंचनामा तसेच नुकसानभरपाई न दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.गोदामांना लागलेल्या आगीचे महासभेत पडसादभिवंडी : गायत्रीनगरमध्ये बुधवारी पहाटे लागलेल्या आगीचे पडसाद महासभेत उमटले. अग्निशमन दलाचे बंब उशिराने घटनास्थळी आल्याने नागरिकांचे जास्त नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवक शरद धुळे आणि अहमद सिध्दीकी यांनी केला.अग्निशमन दलाचा बंब रस्त्यातच बंद पडल्याने नागरिकांना धक्का देऊन घटनास्थळापर्यंत गाडी न्यावी लागली. तसेच घटनास्थळी टँकरचे पाणी पाठवण्यासाठी पालिकेच्या व-हाळा पाणीशुध्दीकरण केंद्रात फोन उचलणारा कोणी जबाबदार अधिकारी नसल्याने परिसरातील नागरिकांनी विहीर व कूपनलिकेच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.ही माहिती नगरसेवकांनी दिल्याने संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी अग्निशमन दलप्रमुख दत्ता साळवी यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना दिले. 

 

टॅग्स :thaneठाणेCorruptionभ्रष्टाचार