शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:28 IST

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.

भिवंडी - महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिकाºयांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.राजीव गांधी ते टेमघर या मार्गाने मेट्रो रेल्वे जाऊ नये म्हणून साकडे घालण्यासाठी मंगळवारी कल्याणरोडच्या रहिवाशांनी महापौर जावेद दळवी यांची भेट घेतली. मागील महासभेत कल्याणरोड व वंजारपाटीनाका या दोन मार्गाने मेट्रो रेल्वे नेण्यास मान्यता दिली होती. या मागील इतिवृत्तास मान्यता देण्याचा विषय बुधवारच्या महासभेत आला असता शिवसेनेचे नगरसेवक मदनबुवा नाईक, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांच्यासह काही सेना व काँग्रेस नगरसेवकांनी कल्याण रोडवरून मेट्रो नेण्यास विरोध केला. त्यामुळे महासभेत कल्याणरोड मार्ग व वंजारपाटीनाका मार्ग असे दोन गट निर्माण झाले. तसेच सभागृहाबाहेर कल्याणरोड रहिवाशांनी गर्दी केली होती. अखेर सभागृहाने मागील इतिवृत्तास मान्यता दिल्यानंतर महासभेपुढे इतर विषयांची चर्चा झाली. राजीव गांधी चौक ते टेमघर या कल्याणरोड मार्गावर वन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळे व इमारती उभ्या केल्या आहेत. तर वज्रेश्वरी संस्थान आणि इतर संस्थानच्या मालकीच्या जागा या मार्गावर आहेत. त्यामुळे मूळ जमिनीचा सातबारा अथवा सिटीसर्वे उताºयावर अनेक रहिवाशांची नावे नाहीत. त्यामुळे अशा काही ठराविक रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. तसेच रस्ता रूंदीकरणात काही जमीनमालकांना व गाळे धारकांना पंचनामा तसेच नुकसानभरपाई न दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.गोदामांना लागलेल्या आगीचे महासभेत पडसादभिवंडी : गायत्रीनगरमध्ये बुधवारी पहाटे लागलेल्या आगीचे पडसाद महासभेत उमटले. अग्निशमन दलाचे बंब उशिराने घटनास्थळी आल्याने नागरिकांचे जास्त नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवक शरद धुळे आणि अहमद सिध्दीकी यांनी केला.अग्निशमन दलाचा बंब रस्त्यातच बंद पडल्याने नागरिकांना धक्का देऊन घटनास्थळापर्यंत गाडी न्यावी लागली. तसेच घटनास्थळी टँकरचे पाणी पाठवण्यासाठी पालिकेच्या व-हाळा पाणीशुध्दीकरण केंद्रात फोन उचलणारा कोणी जबाबदार अधिकारी नसल्याने परिसरातील नागरिकांनी विहीर व कूपनलिकेच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.ही माहिती नगरसेवकांनी दिल्याने संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी अग्निशमन दलप्रमुख दत्ता साळवी यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना दिले. 

 

टॅग्स :thaneठाणेCorruptionभ्रष्टाचार