शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

भिवंडीतील वऱ्हाळ तलावावर पसरला हिरवा तवंग! महापालिकेचं दुर्लक्ष, कुजक्या दुर्गंधीनं नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:00 IST

भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटन दृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला

नितिन पंडीत -भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटन दृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. 

काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे. 

या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर अधिकारी व लोकप्रतिनिधी पाहत नाही ना अशी शंका निर्माण होते आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली असून येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू असा इशारा देखील ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी