शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

भिवंडी महापालिका आयुक्तांचा त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर; नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन कटिबद्ध  

By नितीन पंडित | Updated: July 17, 2023 18:28 IST

भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे.

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी महापालिकेतील कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही मुख्य कार्यालय सुरू ठेवून विविध कार्यालयांच्या कामांचा आढावा घेत महापालिका प्रशासनाचे कार्य अधिक प्रभावीशाली व गतिमान होण्यासाठी नवनियुक्त मनपायुक्तांनी त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाची माहिती आयुक्त वैद्य यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त दीपक झिंजाड जण संपर्क अधिकारी सुनील झळके उपस्थित होते.

गतिमान प्रशासन,लोकाभिमुख प्रशासन व जबाबदार प्रशासन या त्रिसूत्रीचा वापर आपल्या प्रशासकीय सेवेत करणार असल्याचे आयुक्त वैद्य यांनी जाहीर केले असून मनपाच्या प्रशासकीय कामांना गती देण्याचे काम या माध्यमातून होणार असून लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी नागरिकांनीही महापालिकेचे कर वेळेवर भरणे गरजेचे असल्याने जाबाबदर नागरिक व जबाबदार प्रशासन अशा त्रिसूत्रीचा अवलंब आयुक्त वैद्य यांनी केला असून या माध्यमातून शहर विकास साधण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध राहील असेही मनपा आयुक्तांनी यावेळी जाहीर केले.

शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महत्वाचा असून रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील मनपा प्रशासनाने सुमारे ४० हजार स्के.फूट हुन अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत अन्यथा अशा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन देखील आयुक्तांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

या त्रिसूत्री कार्यक्रमाबरोबरच आयुक्त आपल्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला असून मनपाच्या पाचही प्रभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या नागरिकांपर्यंत पोहोचून सोडविण्याचे प्रयत्न आपण स्वतः करणार असल्याचेही आयुक्त वैद्य यांनी यावेळी सांगितले असून मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास व ताण पडत असल्याने सेवाभावी संस्थांच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.तर शहरातील स्वच्छता, कचरा, खड्डेमय रस्ते,व पाण्याच्या समस्यां याबाबत लवकरच आढावा बैठका घेऊन नागरिकांना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आयुक्त वैद्य यांनी यावेळी दिली.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी