शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

भिवंडी महापालिका आयुक्तांचा त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर; नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन कटिबद्ध  

By नितीन पंडित | Updated: July 17, 2023 18:28 IST

भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे.

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी महापालिकेतील कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही मुख्य कार्यालय सुरू ठेवून विविध कार्यालयांच्या कामांचा आढावा घेत महापालिका प्रशासनाचे कार्य अधिक प्रभावीशाली व गतिमान होण्यासाठी नवनियुक्त मनपायुक्तांनी त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाची माहिती आयुक्त वैद्य यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त दीपक झिंजाड जण संपर्क अधिकारी सुनील झळके उपस्थित होते.

गतिमान प्रशासन,लोकाभिमुख प्रशासन व जबाबदार प्रशासन या त्रिसूत्रीचा वापर आपल्या प्रशासकीय सेवेत करणार असल्याचे आयुक्त वैद्य यांनी जाहीर केले असून मनपाच्या प्रशासकीय कामांना गती देण्याचे काम या माध्यमातून होणार असून लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी नागरिकांनीही महापालिकेचे कर वेळेवर भरणे गरजेचे असल्याने जाबाबदर नागरिक व जबाबदार प्रशासन अशा त्रिसूत्रीचा अवलंब आयुक्त वैद्य यांनी केला असून या माध्यमातून शहर विकास साधण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध राहील असेही मनपा आयुक्तांनी यावेळी जाहीर केले.

शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महत्वाचा असून रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील मनपा प्रशासनाने सुमारे ४० हजार स्के.फूट हुन अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत अन्यथा अशा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन देखील आयुक्तांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

या त्रिसूत्री कार्यक्रमाबरोबरच आयुक्त आपल्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला असून मनपाच्या पाचही प्रभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या नागरिकांपर्यंत पोहोचून सोडविण्याचे प्रयत्न आपण स्वतः करणार असल्याचेही आयुक्त वैद्य यांनी यावेळी सांगितले असून मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास व ताण पडत असल्याने सेवाभावी संस्थांच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.तर शहरातील स्वच्छता, कचरा, खड्डेमय रस्ते,व पाण्याच्या समस्यां याबाबत लवकरच आढावा बैठका घेऊन नागरिकांना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आयुक्त वैद्य यांनी यावेळी दिली.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी