शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील कचरा व पाणी प्रश्नावरून आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास धरले धारेवर

By नितीन पंडित | Updated: December 26, 2023 16:26 IST

प्रश्न सुटले नाही तर एक महिन्यात पालिकेवर मोर्चा धडकणार.

नितीन पंडित, भिवंडी: शहरात कचरा समस्या गंभीर बनली असून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.शहरात ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच शहरात अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणी समस्या देखील गंभीर झाली आहे.

अनेक ठिकाणी नळ पाईप लाईन नादुरुस्त असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.नागरिकांच्या या कचरा व पाणी समस्यांची दखल घेत मंगळवारी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या शिष्टमंडळासह मनपा प्रशासनावर धडक दिली. यावेळी आमदार रईस शेख यांनी शहरात साचलेल्या कचऱ्याच्या समस्येबद्दल मनपा आयुक्त अजय वैद्य तसेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना चांगलेच धारेवर धरले.

शहरातील कचरा उचळणाऱ्या ठेकेदाराकडून कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर किडे व दुर्गंधी पसरल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर चावींद्रा डंपिंग ग्राऊंडवर कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने येथून पसरणाऱ्या दुर्गंधीने या परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.

या समस्येवर मनपा प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने अनेक वेळा नागरिकांकडून या डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास नागरिकांकडून विरोध करण्यात येतो.तर कधी कचरा ठेकेदाराकडून घंटा गाडी ठेकेदारांना वेळेवर बिल मिळत नसल्याने घंटा गाडी चालक मालक अचानक कचरा उचलण्याचे काम बंद करत असल्याने शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून मनपा प्रशासन यातून मार्ग काढण्यात अपयशी ठरली आहे असा आरोप देखील यावेळी आमदार रईस शेख यांनी यावेळी करत कचरा ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना मनपा आयुक्त यांनी शहरातील कचरा समस्यां सोडविण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील असून एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार शेख यांना आयुक्त वैद्य यांनी दिले.

तर एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर मनपा प्रशासनाने उपाय योजना केली नाही तर एका महिन्यानंतर मनपा प्रशासनाविरोधात मुख्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल असा इशारा आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास दिला असून आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्त वैद्य त्यांच्याकडे दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी