शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

शहरातील कचरा व पाणी प्रश्नावरून आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास धरले धारेवर

By नितीन पंडित | Updated: December 26, 2023 16:26 IST

प्रश्न सुटले नाही तर एक महिन्यात पालिकेवर मोर्चा धडकणार.

नितीन पंडित, भिवंडी: शहरात कचरा समस्या गंभीर बनली असून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.शहरात ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच शहरात अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणी समस्या देखील गंभीर झाली आहे.

अनेक ठिकाणी नळ पाईप लाईन नादुरुस्त असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.नागरिकांच्या या कचरा व पाणी समस्यांची दखल घेत मंगळवारी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या शिष्टमंडळासह मनपा प्रशासनावर धडक दिली. यावेळी आमदार रईस शेख यांनी शहरात साचलेल्या कचऱ्याच्या समस्येबद्दल मनपा आयुक्त अजय वैद्य तसेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना चांगलेच धारेवर धरले.

शहरातील कचरा उचळणाऱ्या ठेकेदाराकडून कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर किडे व दुर्गंधी पसरल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर चावींद्रा डंपिंग ग्राऊंडवर कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने येथून पसरणाऱ्या दुर्गंधीने या परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.

या समस्येवर मनपा प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने अनेक वेळा नागरिकांकडून या डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास नागरिकांकडून विरोध करण्यात येतो.तर कधी कचरा ठेकेदाराकडून घंटा गाडी ठेकेदारांना वेळेवर बिल मिळत नसल्याने घंटा गाडी चालक मालक अचानक कचरा उचलण्याचे काम बंद करत असल्याने शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून मनपा प्रशासन यातून मार्ग काढण्यात अपयशी ठरली आहे असा आरोप देखील यावेळी आमदार रईस शेख यांनी यावेळी करत कचरा ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना मनपा आयुक्त यांनी शहरातील कचरा समस्यां सोडविण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील असून एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार शेख यांना आयुक्त वैद्य यांनी दिले.

तर एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर मनपा प्रशासनाने उपाय योजना केली नाही तर एका महिन्यानंतर मनपा प्रशासनाविरोधात मुख्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल असा इशारा आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास दिला असून आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्त वैद्य त्यांच्याकडे दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी