शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

शहरातील कचरा व पाणी प्रश्नावरून आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास धरले धारेवर

By नितीन पंडित | Updated: December 26, 2023 16:26 IST

प्रश्न सुटले नाही तर एक महिन्यात पालिकेवर मोर्चा धडकणार.

नितीन पंडित, भिवंडी: शहरात कचरा समस्या गंभीर बनली असून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.शहरात ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच शहरात अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणी समस्या देखील गंभीर झाली आहे.

अनेक ठिकाणी नळ पाईप लाईन नादुरुस्त असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.नागरिकांच्या या कचरा व पाणी समस्यांची दखल घेत मंगळवारी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या शिष्टमंडळासह मनपा प्रशासनावर धडक दिली. यावेळी आमदार रईस शेख यांनी शहरात साचलेल्या कचऱ्याच्या समस्येबद्दल मनपा आयुक्त अजय वैद्य तसेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना चांगलेच धारेवर धरले.

शहरातील कचरा उचळणाऱ्या ठेकेदाराकडून कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर किडे व दुर्गंधी पसरल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर चावींद्रा डंपिंग ग्राऊंडवर कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने येथून पसरणाऱ्या दुर्गंधीने या परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.

या समस्येवर मनपा प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने अनेक वेळा नागरिकांकडून या डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास नागरिकांकडून विरोध करण्यात येतो.तर कधी कचरा ठेकेदाराकडून घंटा गाडी ठेकेदारांना वेळेवर बिल मिळत नसल्याने घंटा गाडी चालक मालक अचानक कचरा उचलण्याचे काम बंद करत असल्याने शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून मनपा प्रशासन यातून मार्ग काढण्यात अपयशी ठरली आहे असा आरोप देखील यावेळी आमदार रईस शेख यांनी यावेळी करत कचरा ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना मनपा आयुक्त यांनी शहरातील कचरा समस्यां सोडविण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील असून एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार शेख यांना आयुक्त वैद्य यांनी दिले.

तर एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर मनपा प्रशासनाने उपाय योजना केली नाही तर एका महिन्यानंतर मनपा प्रशासनाविरोधात मुख्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल असा इशारा आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास दिला असून आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्त वैद्य त्यांच्याकडे दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी